शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

२०० कोटी पीक कर्ज होणार माफ

By admin | Updated: June 27, 2017 01:23 IST

राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे.

पुनर्गठन : ५६ हजार शेतकरी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे. जिल्ह्यात २०० कोटींच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून याचा ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. पुनर्गठित कर्जाची पाच वर्षात टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. हप्ते पाडलेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना परतफेड करता आली नाही. त्यामुळे पुनर्गठनानंतरही शेतकरी अडचणीत सापडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दुसऱ्यांदा पुनर्गठन करण्यात आले. मात्र दुष्काळी स्थितीने ही तोकडी उपाययोजनाही निकामी झाली. यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी अडचणीत सापडले होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी घोषणेत कर्जाची पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी मदतीस पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५६ हजार शेतकऱ्यांना थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे २०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या सर्वांना लाभ होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पुनर्गठनाची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यात कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच आता पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. अडचणी सुटणार कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा कारभार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून बँकेचे सभासद होण्यास इच्छुक असलेल्यांना कर्जमाफीनंतर बँकेचे नवीन सभासद होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.