शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

२०० कोटी पीक कर्ज होणार माफ

By admin | Updated: June 27, 2017 01:23 IST

राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे.

पुनर्गठन : ५६ हजार शेतकरी लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ थकबाकीदार शेतकऱ्यांसोबतच कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांंना मिळणार आहे. जिल्ह्यात २०० कोटींच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असून याचा ५६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँक आणि ग्रामीण बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. पुनर्गठित कर्जाची पाच वर्षात टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. हप्ते पाडलेल्या कर्जाची अनेक शेतकऱ्यांना परतफेड करता आली नाही. त्यामुळे पुनर्गठनानंतरही शेतकरी अडचणीत सापडले होते. यातून मार्ग काढण्यासाठी दुसऱ्यांदा पुनर्गठन करण्यात आले. मात्र दुष्काळी स्थितीने ही तोकडी उपाययोजनाही निकामी झाली. यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी अडचणीत सापडले होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी घोषणेत कर्जाची पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरणार असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला आहे. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेले शेतकरी मदतीस पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ५६ हजार शेतकऱ्यांना थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे २०० कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या सर्वांना लाभ होणार आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पुनर्गठनाची माहिती मात्र उपलब्ध झाली नाही. जिल्ह्यात कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांसोबतच आता पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल. अडचणी सुटणार कर्जमाफीनंतर जिल्हा बँकेचा कारभार पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे. यामुळे गत अनेक वर्षांपासून बँकेचे सभासद होण्यास इच्छुक असलेल्यांना कर्जमाफीनंतर बँकेचे नवीन सभासद होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.