शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

घोडेबाजारात मतदारांना ‘आकड्यां’ची प्रतीक्षा

By admin | Updated: November 8, 2016 01:57 IST

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन

विधान परिषद : मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची संख्या वाढली सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. रिंगणात ‘सक्षम’ तीन उमेदवार असल्याने घोडेबाजाराचा ‘आकडा’ कधी उघडतो, याची प्रतीक्षा लागली आहे. प्रचाराचा धुराळा उडत असला तरी केवळ ‘सर्व फॉर्म्युलिटी’ पूर्ण केली जातील, इतकाच शब्द देऊन उमेदवार ‘आशिर्वादा’ची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांची दिवसागणिक संख्या वाढत आहेत. यवतमाळ विधान परिषद मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच तुल्यबळ लढत होत आहे. काँग्र्रेस, शिवसेना-भाजपा युती व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. हे उमेदवार सर्वच बाबतीत ‘दमखम’ आजमावणारे आहेत. अशा प्रकारची लढत येथे पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे निवडणूक ‘कॅश’ करण्यासाठी मतदारांनी व्यूहरचना आखली आहे. प्रत्येकाने कोणा-कोणाला भेटायचे, याची तयारी केली आहे. केवळ याच मुद्द्यावर एका संघटनेनेही आकार घेतला आहे. उमेदवारांची अडचण ओळखून चिल्लरचा बाजार करण्यापेक्षा आमच्याकडे ठोकचा ‘गठ्ठा’ असल्याचे जाहीरपणे सांगितले जात आहे. यातही कोणी कोणत्या पक्षाशी बोलायचे हे ठरविण्यात आले आहे. शेवटी राजकारणातील बडे मासे छोट्या माश्यांच्या तावडीत सापडले आहेत. यात आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सर्वच जण पक्षश्रेष्ठींपुढे आपली पत कायम ठेवण्यासाठी विधान परिषद उमेदवारांकरिता मतांची आकडेमोड करीत आहेत. शिवसेना नेत्यांवर सर्वाधिक दबाव सर्वाधिक दबाव हा शिवसेना नेत्यांवर आहे. थेट ‘मातोश्री’वरून उमेदवार आल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळेच लढतीतील एका उमेदवारासमोर या नेत्यांनीे ‘तहा’चा प्रस्ताव ठेवला. मात्र ‘गॉडफादर’ने बारामतीतून झाडाझडती घेतल्याने ऐनवेळी हा प्रस्ताव बारगळला. ही वार्तासुद्धा जाणीवपूर्वक पसरविण्यात आली. विधान परिषद निवडणुकीच्या घडामोडीकडे पंचेंद्रीये लावून बसलेल्या मतदारांनी त्यातील तथ्य किती, याची लगेच पडताळणी केली. नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचाय समिती सभापतींकडून प्रत्येक बारिकसारिक हालचाली टिपण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील जुन्या संबंधांना उजाळा दिला जात आहे. संधीचे ‘सोने’ सर्व मिळूनच करायचे, हे ठरले असले तरी ‘वाटा’ कसा मिळवायचा याची तयारी मतांचा गठ्ठा बाळगणाऱ्यांकडून केली जात आहे. मतदार म्हणतात, सर्वच पर्याय खुले ४मताचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला उघड समर्थन मागू नका, माझे मत तुम्हालाच आहे, अशा शब्दात मतदारांकडून सर्वच पर्याय खुले ठेवण्यात येत आहे. उघड भूमिका घेऊन माझे नुकसान करू नका, आपले काही कमी-जास्त झाले तरी चालेल, हा शपथेवर शब्द आहे, अशी भूमिका विधान परिषदेतील बहूतांश मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे उमेदवारांपुढचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे बनत आहे. अशा झाल्या लढती वर्ष उमेदवार ४१९८० जगन्नाथ डांगे (वर्धा) - सुरेश लोणकर (वर्धा- यवतमाळ संयुक्त मतदारसंघ) ४१९८६ डॉ. पंजाबराव देशमुख (एस काँग्रेस) - कीर्ती गांधी (काँग्रेस) ४१९९२ विजय चोंढीकर (काँग्रेस) - बाळासाहेब चौधरी (अपक्ष) ४१९९८ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी काँग्रेस) - अविरोध निवड ४२००४ एन. पी. हिराणी (राष्ट्रवादी) - दीपक निलावार (अपक्ष) ४२०१० संदीप बाजोरिया (आघाडी) - दीपक निलावार (अपक्ष)