शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांपासून अस्तरीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: August 29, 2014 00:07 IST

कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये

दारव्हा : कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरत असल्याने तालुक्यातील बिजोरा येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे दरवर्षीच मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कालव्याचे अस्तरीकरण व्हावे, यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची मदत व कालव्याच्या अस्तरीकरणाचे आश्वासन देण्यात आले. मात्र नऊ महिने उलटूनही प्रशासनाकडून पूर्तता करण्यात आलेली नाही. कुंभारकिन्ही प्रकल्पाचा कालवा पाझरून बिजोरा येथील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केल्याने कृषी सहाय्यक, तलाठी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त सर्वे केला होता. मात्र तीन महिने उलटूनही या नुकसानीचा अहवाल तहसीलदार यांना देण्यात आला नाही. दरम्यान, या कालव्यामुळे बोथ, बिजोरा, धूळापूर, हुसनापूर, राजूरा, माहुली, दारव्हा आदी ठिकाणच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलन उभे केले. तेव्हा कालव्याचे अस्तरीकरण करून नुकसानीची मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र या आश्वासनाला नऊ महिने उलटूनही त्याची पूर्तता झालेली नाही. शिवाय कालव्याची डागडूजीही करण्यात आली नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात शिरत असून शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतात पाणी साचून राहात असल्याने जमिनीची पोतही खराब होत आहे. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. त्यामुळे डिसेंबर २०१३ मध्येच कालव्याच्या गेटला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले. तब्बल १५ दिवस चाललेल्या या आंदोलनाने प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे कालव्याच्या पाण्याने होत असलेली पिकांची नासाडी आणि कालव्याच्या भरोशावर रबीची पिके घेणाऱ्या दोन गटात संघर्ष पेटला. संघर्ष पेटला की अधिकारी बैठका घेतात. शेतकऱ्यांची समजूत काढून आश्वासन देतात. मात्र या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटू शकतो. मदतीचे आश्वासन हवेतच विरल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)