शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा

By admin | Updated: June 20, 2014 00:05 IST

काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणारे वामनराव कासावार आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का देत नाहीत, असा जाहीर सवाल पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.

लोकसभेतील पराभव : काँग्रेस कार्यकारिणी बरखास्तीने अन्यायाची भावना यवतमाळ : काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करणारे वामनराव कासावार आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का देत नाहीत, असा जाहीर सवाल पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. या राजीनाम्याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ-वाशिम आणि चंद्रपूर या दोनही मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. या निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघातच पक्षाचे उमेदवार माघारले. तेथे शिवसेनेच्या उमेदवाराला २८ ते ६० हजारापर्यंत मतांची आघाडी मिळाली. या निकालानंतर नैतिकता म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अन्य नेते स्वत:हून पदाचा राजीनामा देतील, अशी अपेक्षा बाळगली जात होती. मात्र राजीनामा तर दूर नेत्यांनी मोदी लाटेमुळे हा पराभव झाल्याचे सांगून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तब्बल महिनाभराने या पराभवाचा ठपका काँग्रेस कार्यकर्त्यांवर ठेऊन जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली. त्यामुळे कार्यकर्ते आणखी संतप्त झाले. बरखास्तीच्या या निर्णयाने कार्यकर्त्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. या पराभवाला नेत्यांमधील गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई कारणीभूत असताना कार्यकर्त्यांवर कारवाई का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार वामनराव कासावार यांनी स्वत:चे पद शाबूत ठेऊन कार्यकारिणीत असलेल्या कार्यकर्त्यांचा राजकीय बळी दिल्याने प्रचंड नाराजी पहायला मिळत आहे. कार्यकारिणी बरखास्तीऐवजी वामनरावांनी नैतिकता राखत स्वत:च पदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी अपयशाची जबाबदारी स्वत:वर न घेता कार्यकर्त्यांवर लोटून आपले पद शाबूत ठेवल्याचा आरोप होत आहे. कार्यकर्त्यांमधून जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये तोंडावर एैसीतैसी केल्याने नेतेही अस्वस्थ आहेत. यापुढे प्रत्येकच बैठकांमध्ये कार्यकर्त्यांची ही आक्रमकता कायम राहण्याची चिन्हे पाहता नेत्यांची चिंता वाढली आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी प्रदेशकडून कारवाईची प्रतीक्षा न ठेवता लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उशिरा का होईना स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, असा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी )