शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महामंडळ, समित्यांवरील वर्णीची प्रतीक्षा

By admin | Updated: January 4, 2017 00:15 IST

भाजपाने जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडून खेचून आणल्यानंतर आता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या

भाजपाचे पालकमंत्री : सामान्य कार्यकर्त्यांच्या आता अपेक्षा वाढल्या यवतमाळ : भाजपाने जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडून खेचून आणल्यानंतर आता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कारण त्यांना मंडळ-महामंडळ आणि जिल्हा व तालुका समित्यांवर सन्मानाचे पद मिळण्याची प्रतीक्षा आहे. राज्यात भाजपा-शिवसेना युती सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहे. परंतु दोनही पक्षाचे कार्यकर्ते उपेक्षित आहे. सुमारे दीड-पावणे दोन वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेनेकडे होते. परंतु या काळात जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या होऊ शकल्या नाही. आजही शिवसैनिकांना या नियुक्त्यांची प्रतीक्षाच आहे. पालकमंत्री पद सेनेकडून गेले पण या नियुक्त्या झाल्या नाहीत. सेनेकडील हे पालकमंत्री पद भाजपाने आपल्याकडे खेचून आणल्याने या पक्षाचे कार्यकर्ते उत्साहित दिसत आहेत. जिल्ह्यात भाजपाचे पाच आमदार, त्यातील एकाकडे महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री पद आणि सोबतीला पालकमंत्री पद आले आहे. त्यामुळे सहाजिकच युतीच्या सत्तेची गेली १५ वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पदाधिकाऱ्यांना मंडळ- महामंडळांची तर सामान्य कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्यांवर अशासकीय सदस्य म्हणून वर्णी लागण्याची अपेक्षा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या नियुक्त्या व्हाव्या, काँग्रेस आघाडी सरकारप्रमाणे प्रतीक्षेतच पाच वर्षे निघून जाऊ नये, असा भाजपाच्या गोटातील सूर आहे. काही सामान्य कार्यकर्त्यांनी यवतमाळातील पदाधिकाऱ्यांना या नियुक्त्यांबाबत मंगळवारी विचारलेसुद्धा तेव्हा ‘तुम्ही किती नगरसेवक निवडून आणले’ असा प्रतिसवाल त्यांना केला गेला. त्यामुळे हक्क मागणाऱ्या या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. ‘आम्हाला नगरसेवक विचारणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी किती नगराध्यक्ष निवडून आणले’ हे आधी सांगावे, असा संतप्त सूरही या कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळाला. (जिल्हा प्रतिनिधी) जनतेने नाकारलेल्यांना स्वीकारल्याने भाजपात नाराजी नगरपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपामध्ये पदांसाठी रस्सीखेच सुरू आहे. मंगळवारी यवतमाळ नगरपरिषदेमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य पदाची निवडणूक झाली. उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीतील दुसरा व्यावसायिक गट भाजपा नेत्यांवर नाराज झाल्याचे दिसून येते. त्याच वेळी स्वीकृत नगरसेवक पदी जनतेने नाकारलेल्या चेहऱ्यांना संधी दिली गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पहायला मिळतो आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, मात्र ते निवडून आले नाही. त्यानंतरही त्यांना नगरपरिषदेत ‘एन्ट्री’ देऊन पक्षाच्या उमेदवारीपासून वंचित कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवले गेले आहे. जिल्ह्याच्या अन्य नगरपरिषदांमध्येसुद्धा कमी-अधिक प्रमाणात असेच चित्र असल्याचे भाजपाच्या गोटातून सांगितले जाते.