शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांची टक्केवारीने लागली वाट, एजन्सी नामधारी : मारेगाव तालुक्यात विशिष्ट ठेकेदारांनाच मिळतात कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:48 IST

गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केली जातात. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे ...

गावपातळीवर होणारी विकासकामे स्थानिक ग्रामपंचायत या एजन्सीमार्फत केली जातात. लोकप्रतिनिधींनी विकास कामांचा पाठपुरावा करून ही कामे गुणवत्ता पूर्ण करून घेणे अपेक्षित असते; परंतु तालुक्यात ही विकास कामे कोणत्या ठेकेदारामार्फत करायची, याचे नियोजन अगोदरच ठरलेले असते. बऱ्याचदा तर हे विशिष्ट ठेकेदार लोकप्रतिनिधींना कोणत्या गावात कोणती कामे मंजूर करायची, याचे मार्गदर्शन करताना दिसतात. ज्या गावातून कामाची तक्रार होणार नाही, अशा गावांत कामे मंजूर करण्यावर या ठेकदारांचा जास्त जोर असतो. त्यामुळे विकासकामांत अनियमितता येत असल्याची ओरड जनतेतून होत आहे. तालुक्यात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. रस्ते, वीज, पाणी, नाली बांधकाम, स्मशानभूमी, भौतिक सुविधा या मूलभूत सुविधांसाठी जनता भांडत आहे. दरवर्षी या सुविधेसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये मिळूनही दुय्यम दर्जाच्या कामामुळे समस्या सुटल्या नाहीत, हे वास्तव चित्र तालुक्यात उघडपणे पाहायला मिळते. गावपातळीवरील मूलभूत सुविधांसह अन्य कामे ग्रामपंचायत व शासनस्तरावर नोंदणीकृत एजन्सीमार्फत टेंडर पद्धतीने केली जातात; परंतु तालुक्यात अधिकृत कंत्राटदार व एजन्सी नामधारी बनल्याचे दिसून येते. लोकप्रतिनिधींनी गावपातळीवर दिलेल्या निधीतून होणारी कामे निष्पक्ष न होता लोकप्रतिनिधींच्या ठरलेल्या ठेकेदाराकडून ही कामे करून घेतली जात आहेत, असा जनतेचा सूर आहे. या कामांना राजाश्रय मिळत असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असतो. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या कामाची वाट लागल्याचे दिसून येते. खराब झालेल्या कामांचा पुन्हा दुरुस्तीचा देखावा करण्यात येतो. शासनाने ज्यांच्यावर कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी सोपविली आहे, ते कामाच्या गुणवत्तेपेक्षा कामावरील टक्केवारीवर नजर ठेवून असतात. त्यामुळे विकासकामांची गुणवत्ता ढासळली असून, लोकप्रतिनिधींनी सामाजिक जबाबदारीचे भान ओळखून सर्व यंत्रणांनी आपली कामे गुणवत्तापूर्वक करून मूल्यमापन गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

बॉक्स : मूल्यमापनात अनियमितता

कामांच्या गुणवत्तेची तपासणी करताना राजकीय दडपण आणि टक्केवारी, या धोरणामुळे मूल्यमापन करणारे अभियंते आणि बिले काढणारे अधिकारी आहे त्याच कारभारात समाधान मानतात. काम करणाऱ्या एजन्सीला सगळ्यांची मर्जी सांभाळत विकास कामे करावी लागत असल्याने साहजिकच गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. दर्जाहीन कामामुळे दिवसागणिक समस्या वाढत आहेत. यासंबंधी जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. अन्यथा विकासकामांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही.