शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

अंशकालीन कर्मचारी नोकरीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 8, 2015 00:05 IST

अंशकालीन कर्मचाऱ्यांना गेली दहा वर्षांपासून शासनसेवेत सामावून घेण्याची प्रतीक्षा आहे.

सुशिक्षित बेरोजगार : उद्योगधंदे नसल्याने अनेकांचे हात रितेनेर : अंशकालीन कर्मचाऱ्यांना गेली दहा वर्षांपासून शासनसेवेत सामावून घेण्याची प्रतीक्षा आहे. बहुतांश उमेदवारांचे नोकरीचे वय निघून जात असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे नोकरी नाही, तर दुसरीकडे उद्योगधंदे नसल्याने त्यांचे हात रिते आहेत. १०-१२ वर्षांपूर्वी पदवीधरांना शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये ३०० रुपये दैनिक मानधनावर काम देण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा बहुतांश भार हलका केला. याच कामाचा अनुभव असल्याने त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी अशी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु अजूनतरी त्यांना सेवेत घेण्याविषयीचे आदेश किंवा कुठलीही प्रक्रिया सुरू झालेली नाही. अंशकालीन कर्मचारी राज्यातील जवळपास जिल्ह्यात आहे. शिकून-सवरूनही काम मिळत नाही. नोकरीचे वयही निघून जात आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. काही जणांनी खासगी ठिकाणी नोकरी स्वीकारली. परंतु मिळणाऱ्या मानधनातून कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण जात आहे. किमान वेतन कायद्यानुसारही त्यांना रक्कम मिळत नाही. मिळणारे तुटपुंजे मानधन त्यांची थट्टा करणारे ठरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर एखादे पत्रक काढून त्यांच्या आशा पल्लवित केल्या जातात. यानंतर काही दिवसातच शासनाला त्यांचा विसर पडतो. ग्रामीण भागात मोठे उद्योगधंदे नसल्याने हाताला काम मिळत नाही. मिळाले तरी समाधानकारक मासिक मानधन मिळत नाही. आजच्या वाढत्या महागाईच्या काळात मिळणाऱ्या मानधनातून उदरनिर्वाह होत नाही. या बाबीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)व्यवसाय कर्जासाठी बँकांची नाअनेक युवक नोकरीच्या मागे न लागता एखादा व्यवसाय सुरू करावा यासाठी प्रयत्न करतो. मात्र यासाठी आर्थिक अडचण येते. यातून मार्ग शोधताना बँकेकडून आधार मिळतो काय, याची चाचपणी केली जाते. ज्यावेळी बँकांकडे कर्ज मागण्यासाठी जातात तेव्हा त्यांना विविध प्रकारच्या कागदपत्रांची मागणी करून भंडावून सोडले जाते. एवढेच नव्हे तर तारण म्हणून मालमत्ता मागितली जाते. अशावेळी सुशिक्षित बेरोजगार हतबल होवून परतात.