शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

जिल्ह्याला मान्सूनची प्रतीक्षा

By admin | Updated: June 10, 2015 02:28 IST

केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे.

३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी : ६५ मिमी पावसानंतरच पेरणी करायवतमाळ : केरळमध्ये मान्सून धडकला असला तरी जिल्ह्याकडे वाटचाल करण्यासाठी त्याला थोडा अवधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना तूर्त प्रतीक्षा करावी लागणार आहे. ६५ मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राने केले आहे. तर दुसरीकडे ओलीताची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी ३४३ हेक्टरवर मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. कृषी विभागाने साडेआठ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्याचे नियोजन तयार केले आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा आहे. कापसाच्या लागवडीसाठी ७ जुलैपर्यंतचा कालावधी महत्वाचा आहे. त्याच सोबत टोबनीसाठी लागणारा पाऊस महत्वाचा आहे. मात्र पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या सध्या थांबल्या आहेत. या खालोखाल सोयाबीनची लागवड होणार आहे. सोयाबीनच्या लागवडीसाठी आवश्यक असलेली उगवनशक्ती तपासणे आवशक आहे. त्यासोबतच मोझाइकला बियाणे बळी पडलेले नसावे. असेच बियाणे पेरण्यासाठी योग्य आहे. त्यादृष्टीने योग्य बियाण्याची निवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. जून-जुलै महिन्यातील पेरण्या महत्वाच्या आहे. असे असले तरी ६५ मिमी पाऊस उगवण शक्तीसाठी योग्य आहे. हा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डॉ.प्रमोद यादगीरवार यांनी केले आहे. अन्यथा पुरेशा पावसाअभावी पेरणी वाया जाण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पाऊस बरसल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन केले आहे. (शहर वार्ताहर)