शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

पालकमंत्र्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: December 18, 2014 02:20 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे रहावे म्हणून शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असतानाच भाजपानेही आपल्या पक्षाच्या मंत्र्याकडे यवतमाळचे पालकमंत्रीपद जावे म्हणून प्रयत्न चालविले आहे.

यवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे रहावे म्हणून शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू असतानाच भाजपानेही आपल्या पक्षाच्या मंत्र्याकडे यवतमाळचे पालकमंत्रीपद जावे म्हणून प्रयत्न चालविले आहे. या माध्यमातून वर्चस्वाच्या भीतीने भाजपाचा शिवसेनेला अप्रत्यक्ष विरोध सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी तब्बल पाच आमदार भाजपाचे आहेत. तर शिवसेनेचे एकमेव आमदार आहे. राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार अस्तित्वात आहे. भाजपाचे संख्याबळ पाहता येथे भाजपाला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. शिवसेनेने मात्र एकमेव सदस्य असलेल्या संजय राठोड यांच्या गळ्यात राज्यमंत्रीपदाची माळ घातली. सेना मंत्रीपदामुळे वरचढ होईल, अशी भीती येथील भाजपा आमदारांनी पक्षश्रेष्ठींना दाखविली होती. मात्र ही भीती श्रेष्ठींनी दुर्लक्षित केली. आता पुन्हा हीच भीती दाखवून शिवसेनेला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी भाजपाच्या गोटातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.संजय राठोड यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तेच जिल्ह्याचे पालकमंत्री बनतील, असे दिसते. मात्र आधीच मंत्रीपद मिळाल्याने शिवसेना भाजपाच्या तुलनेत ‘प्लस’ ठरली आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राठोड यांना मिळाल्यास शिवसेना जिल्हाभर आणखी मजबूत होईल, प्रशासनाची संपूर्ण सूत्रे सेनेच्या हाती एकवटतील, अशी हूरहूर भाजपाच्या आमदारांना आहे. म्हणूनच भाजपाने सेनेच्या या मंत्रीपदाला पालकमंत्र्याचे बिरुद लागू नये म्हणून प्रयत्न चालविले आहे. भाजपाने यवतमाळच्या पालकमंत्री पदासाठी अकोल्याचे राज्यमंत्री रणजित पाटील, अमरावतीचे राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांना पसंती दर्शविल्याचीही माहिती आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय येत्या दोन दिवसात होणार आहे. त्यामुळे भाजपाच्या सेना विरोधी मोर्चेबांधणीला अचानक वेग आला आहे. पालकमंत्री गृहजिल्ह्यातील नेमायचा की अन्य जिल्ह्यातील याबाबत युती शासनाचे धोरण काय, हे अद्याप स्पष्ट नाही. जिल्ह्याला आणि प्रशासनालासुद्धा पालकमंत्री घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. कारण पालकमंत्र्याअभावी जिल्हा नियोजन समितीसह अनेक नियोजित बैठका झालेल्या नाहीत. पालकमंत्री स्वत: अनेक समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष आहे. पालकमंत्री नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून या बैठकांना मुहूर्त सापडेनासा झाला आहे. इकडे पालकमंत्री नसल्याने लोकप्रतिनिधींची प्रशासनावर पकड नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मंगळवारी केंद्राचे पथक जिल्हा दौऱ्यावर होते. मात्र या पथकाने गावांची पाहणी करण्याची केवळ खानापुरती केली. त्यांच्यावर ना मंत्र्यांचे नियंत्रण होते ना आमदारांचे. (जिल्हा प्रतिनिधी)