शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कला-वाणिज्य’त झुंबड, विज्ञान शाखेला प्रतीक्षा

By admin | Updated: July 5, 2014 01:34 IST

अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली असून कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी झुंबड होत आहे.

यवतमाळ : अकरावी प्रवेशाला सुरुवात झाली असून कला आणि वाणिज्य शाखेच्या प्रवेशासाठी झुंबड होत आहे. त्या तुलनेत विज्ञान शाखेच्या अनेक ठिकाणी जागा रिक्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.५५ टक्के लागला होता. यात ग्रामीण भागातील मुले मोठ्या संख्येने उत्तीर्ण झाली. शहरी भागात गुणांच्या टक्केवारीत वाढ झाली. परिणामी अकरावी प्रवेशासाठी ग्रामीण भागातील मुलांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धा परीक्षेमुळे ग्रामीण भागातील मुलांचा कल कला शाखेकडे आहे. बरेच विद्यार्थी केवळ पदवी घेवून स्पर्धा परीक्षेला बसण्याची तयारी करत आहे. त्यामुळे कला शाखेच्या प्रवेशासाठी गर्दी झाली.अशीच स्थिती वाणिज्य शाखेची आहे. पूर्वी वाणिज्य शाखेला विशेष महत्व होते. मध्यंतरीच्या काळात याकडे पाठ फिरविली. आता मात्र पुणे, मुबंई या महारनगराचा ट्रेंड येत असल्याने वाणिज्य शाखेच्या प्रवेशाचा ओघ वाढत आहे. वाणिज्यची पदवी असली की, जॉब हमखास मिळतो. आतातर विस्तारलेल्या बँकिंग क्षेत्रामुळे येथे रोजगाराला भरपूर वाव आहे. हेच ओळखून पालक मुलांचा वाणिज्य शाखेत प्रवेश घेत आहे, असे दाते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भीमराव ठोंबरे यांनी सांगितले. नावलौकिक असलेल्या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य शाखेच्या पहिल्याच यादी प्रवेश क्षमता पूर्ण झाली आहे. या ऊलट स्थिती विज्ञान शाखेची आहे. या शाखेकडे शहरी विद्यार्थ्यांचा कल आहे. क्वचितच ग्रामीण विद्यार्थी या शाखेला प्रवेश घेऊ इच्छितात. त्यामुळे येथे अजूनही भरपूर जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीनंतरही विज्ञान शाखा प्रवेशासाठी फारसी स्पर्धा दिसून येत नाही. यवतमाळ शहरासह बहुतांश महाविद्यालयात पहिल्या फेरीतच अकरावीच्या कला आणि वाणिज्य शाखा हाऊसफुल्ल झाल्या आहेत, असे अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.ए. मिश्रा यांनी सांगितले. ही स्थिती हाताळण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून ११ ते १३ जुलैदरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला तीन महाविद्यालयाचे पर्याय दिले जाणार आहेत. अजुनही काही माहाविद्यालयांनी प्रवेशाची अंतीम म्हणजे तिसरी यादी प्रसिध्द केली नाही. ही प्रक्रिया पूर्ण होताच शिक्षणाधिकारी कार्यालय सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारणार आहे. बरेचदा एकच विद्यार्थी प्रवेशासाठी चार ते पाच महाविद्यालयात अर्ज टाकतो. त्यामुळे आज जरी जागा भरलेल्या दिसत असल्या तरी निश्चित रिक्त होणार आहे. शिवाय जागा वाढवू देण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. २० जुलै पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)