शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 22, 2014 00:12 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या आवाहनानुसार खरीप पीक विमा काढला. मात्र पीक विमा काढणारे शेतकरी अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. विम्याची रक्कम शासनाने

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या आवाहनानुसार खरीप पीक विमा काढला. मात्र पीक विमा काढणारे शेतकरी अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. विम्याची रक्कम शासनाने संबंधित शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अशी विमाधारक शेतकऱ्यांची मागणी आहे़सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील सुमारे चार हजार ७५० शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचा चार हजार १५० हेक्टर क्षेत्रासाठी अधिकृत विमा उतरविला होता़ मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके उध्वस्त झाली़ आणेवारीसुध्दा ५० टक्केच्या आत आली़ खरिपाची अवस्था चांगली असतानाच, पावसाने थैमान घातले होते़ त्यामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले़ त्यातून कसेबसे सावरत रबी हंगामासाठी सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी तयारी केली़ मात्र पीक हातात येतानाच फेब्रुवारी, मार्चमधील अवकाळी पावसाचा रबीला फटका बसल्याने शेतकरी पूर्णत: खचून गेले़ मागीलवर्षी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना शासनाने तुटपुंजी मदत केली. मात्र मदतीची रक्कम अजूनही अनेकांच्या हातात पडलीच नाही़ शेतकऱ्यांच्या नावातील चुका, बँकेचे चुकीचे खाते क्रमांक, एकापेक्षा अधिक वारसदार, आदी भानगडींमुळे सर्व रक्कम बँकानी तहसीलदारांकडे परत केली़ ती रक्कम मिळावी म्हणून अजूनही शेतकरी तहसीलमध्ये हेलपाट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. विविध विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी खचून न जाता यावर्षी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली़ तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज, उसनवार घेऊन किंवा कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खते खरेदी करून मोठ्या उमेदीने पेरण्या प्रारंभ केल्या़ तथापि आर्थिक विवंचनेत असणारे बरेच शेतकरी पैशाअभावी बियाणे, खते कोठून घ्यावे, या विवंचनेत आहे. शासनाने मागीलवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांकडून होत आहे. मागील हंगामात तालुक्यात परजिल्ह्यातील दलाल व अवैध सावकारांनी कर्जासाठी सुमारे १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र तालुक्यात परवानाधारक अधिकृत सावकार कुणीच नाही. त्यामुळे कर्ज मिळवून देणारे दलाल व संधीसाधू व्यापारी, अवैध सावकार यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)