शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 22, 2014 00:12 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या आवाहनानुसार खरीप पीक विमा काढला. मात्र पीक विमा काढणारे शेतकरी अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. विम्याची रक्कम शासनाने

मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांनी २०१३-१४ मध्ये कृषी विभागाच्या आवाहनानुसार खरीप पीक विमा काढला. मात्र पीक विमा काढणारे शेतकरी अद्याप विमा रकमेच्या प्रतीक्षेतच आहेत. विम्याची रक्कम शासनाने संबंधित शेतकऱ्यांना त्वरित द्यावी, अशी विमाधारक शेतकऱ्यांची मागणी आहे़सन २०१३-१४ मध्ये तालुक्यातील सुमारे चार हजार ७५० शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिकांचा चार हजार १५० हेक्टर क्षेत्रासाठी अधिकृत विमा उतरविला होता़ मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके उध्वस्त झाली़ आणेवारीसुध्दा ५० टक्केच्या आत आली़ खरिपाची अवस्था चांगली असतानाच, पावसाने थैमान घातले होते़ त्यामुळे शेतातील उभे पीक नष्ट झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले़ त्यातून कसेबसे सावरत रबी हंगामासाठी सिंचन सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी तयारी केली़ मात्र पीक हातात येतानाच फेब्रुवारी, मार्चमधील अवकाळी पावसाचा रबीला फटका बसल्याने शेतकरी पूर्णत: खचून गेले़ मागीलवर्षी अतिवृष्टीने बाधीत शेतकऱ्यांना शासनाने तुटपुंजी मदत केली. मात्र मदतीची रक्कम अजूनही अनेकांच्या हातात पडलीच नाही़ शेतकऱ्यांच्या नावातील चुका, बँकेचे चुकीचे खाते क्रमांक, एकापेक्षा अधिक वारसदार, आदी भानगडींमुळे सर्व रक्कम बँकानी तहसीलदारांकडे परत केली़ ती रक्कम मिळावी म्हणून अजूनही शेतकरी तहसीलमध्ये हेलपाट्या मारत असल्याचे दिसून येत आहे. विविध विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी खचून न जाता यावर्षी पुन्हा नव्या जोमाने खरीप हंगामाची तयारी केली़ तालुक्यातील काही भागात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी बँकाचे कर्ज, उसनवार घेऊन किंवा कृषी केंद्रातून उधारीवर बियाणे, खते खरेदी करून मोठ्या उमेदीने पेरण्या प्रारंभ केल्या़ तथापि आर्थिक विवंचनेत असणारे बरेच शेतकरी पैशाअभावी बियाणे, खते कोठून घ्यावे, या विवंचनेत आहे. शासनाने मागीलवर्षीच्या खरीप पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित जमा करावी, अशी मागणी तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांकडून होत आहे. मागील हंगामात तालुक्यात परजिल्ह्यातील दलाल व अवैध सावकारांनी कर्जासाठी सुमारे १० ते १५ शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्याची उदाहरणे घडली आहेत. मात्र तालुक्यात परवानाधारक अधिकृत सावकार कुणीच नाही. त्यामुळे कर्ज मिळवून देणारे दलाल व संधीसाधू व्यापारी, अवैध सावकार यांच्यापासून शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)