शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

काँग्रेसला प्रतीक्षा ‘नवा गडी नवा राज’ची

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारूण पराभवाने कोमात गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर

कार्यकर्त्यांना हवी नवसंजीवनी : दिग्गज नेते मतदारसंघात दिसू लागलेयवतमाळ : लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारूण पराभवाने कोमात गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी नव्या दमाच्या ‘नवा गडी नवा राज’ची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत पहायला मिळाली. काँग्रेसच्या ताब्यातील वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड या पाचही जागांवर भाजपाने डल्ला मारला. या जागांवर काँग्रेसचे दिग्गज व दीर्घ अनुभवी नेते पराभूत झाले. काँग्रेसच्या हाती काहीच राहिले नाही. भाजपाच्या नवख्या उमेदवारांनी काँग्रेस नेत्यांकडून गड खेचून घेतला. या पराभवाने काँग्रेसचे दिग्गज नेते, उमेदवारच नव्हे तर कार्यकर्तेही कोमात गेले आहे. लोकसभेत पराभवानंतर सुमारे दोन महिने या प्रमाणे काँग्रेसमध्ये सामसूम होती तीच स्थिती आज विधानसभेनंतर पहायला मिळत आहे. पराभवाची कारणमिमांसा नाही, की चिंतन नाही. सर्व जण जणू कोमात गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नेते, पदाधिकारी कुणीच काही बोलण्यास तयार नाही. काँग्रेसला कोमातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार कोण घेणार, या कार्यकर्त्यांमध्ये जीव कोण फुंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाकडून ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी जुन्या नेत्यांना बाजूला सारुन नव्या दमाच्या नेत्याकडे नेतृत्व देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलवा, तरुणांमधीलच अनुभवी व्यक्तीकडे जिल्ह्याचे नेतृत्व द्या, असेच बदल विविध आघाड्या आणि शाखांच्या स्तरावरही घडवून आणा यातूनच काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी राहील, पक्षाला नवा कार्यक्रम द्या, कार्यकर्त्यांना ताकद द्या, आंदोलनाची दिशा द्या असा एकमुखी सूर सामान्य कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात सलग दहा ते पंधरा वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र या सत्तेच्या काळातच पक्षाचा सामान्य कार्यकर्ता उपेक्षित राहिला. त्याला कुठेच काहीच मिळाले नाही. सर्व काही नेतेच गब्बर झाले. या सत्तेच्या काळात नेत्यांना कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यासाठी सवडही मिळाली नाही. नेते कायम सत्तेच्या गुरमीत वावरताना दिसले. आज मात्र पराभवाची चव चाखल्यानंतर हेच नेते जमिनीवर आलेले पहायला मिळत आहे. एरव्ही मतदारसंघातून गाडीची काळी काच चढवून फिरणारे, निवडकच कार्यकर्ते-कंत्राटदारांच्या घरी भेटी देणारे हे नेते आता मतदारसंघात कुणालाही आणि कुठेही सहज उपलब्ध होऊ लागले आहे. सत्तेत नसतानाप्रमाणे कुण्याच्याही लग्न, बारसे, तेरवी अशा कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहे. कधी नव्हे ती कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करताना दिसत आहे. नेत्यांमधील हा बदल कदाचित दोन वर्षाआधी असता तर आज जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही जागा शाबूत असत्या, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)