शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

काँग्रेसला प्रतीक्षा ‘नवा गडी नवा राज’ची

By admin | Updated: November 1, 2014 23:13 IST

लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारूण पराभवाने कोमात गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर

कार्यकर्त्यांना हवी नवसंजीवनी : दिग्गज नेते मतदारसंघात दिसू लागलेयवतमाळ : लोकसभेपाठोपाठ विधानसभेतील दारूण पराभवाने कोमात गेलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांना या कठीण परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी नव्या दमाच्या ‘नवा गडी नवा राज’ची प्रतीक्षा आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत पहायला मिळाली. काँग्रेसच्या ताब्यातील वणी, आर्णी, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड या पाचही जागांवर भाजपाने डल्ला मारला. या जागांवर काँग्रेसचे दिग्गज व दीर्घ अनुभवी नेते पराभूत झाले. काँग्रेसच्या हाती काहीच राहिले नाही. भाजपाच्या नवख्या उमेदवारांनी काँग्रेस नेत्यांकडून गड खेचून घेतला. या पराभवाने काँग्रेसचे दिग्गज नेते, उमेदवारच नव्हे तर कार्यकर्तेही कोमात गेले आहे. लोकसभेत पराभवानंतर सुमारे दोन महिने या प्रमाणे काँग्रेसमध्ये सामसूम होती तीच स्थिती आज विधानसभेनंतर पहायला मिळत आहे. पराभवाची कारणमिमांसा नाही, की चिंतन नाही. सर्व जण जणू कोमात गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नेते, पदाधिकारी कुणीच काही बोलण्यास तयार नाही. काँग्रेसला कोमातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार कोण घेणार, या कार्यकर्त्यांमध्ये जीव कोण फुंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना पक्षाकडून ऊर्जा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी जुन्या नेत्यांना बाजूला सारुन नव्या दमाच्या नेत्याकडे नेतृत्व देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बदलवा, तरुणांमधीलच अनुभवी व्यक्तीकडे जिल्ह्याचे नेतृत्व द्या, असेच बदल विविध आघाड्या आणि शाखांच्या स्तरावरही घडवून आणा यातूनच काँग्रेस नव्या दमाने पुन्हा उभी राहील, पक्षाला नवा कार्यक्रम द्या, कार्यकर्त्यांना ताकद द्या, आंदोलनाची दिशा द्या असा एकमुखी सूर सामान्य कार्यकर्त्यांमधून ऐकायला मिळत आहे. केंद्रात आणि राज्यात सलग दहा ते पंधरा वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते. मात्र या सत्तेच्या काळातच पक्षाचा सामान्य कार्यकर्ता उपेक्षित राहिला. त्याला कुठेच काहीच मिळाले नाही. सर्व काही नेतेच गब्बर झाले. या सत्तेच्या काळात नेत्यांना कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्यासाठी सवडही मिळाली नाही. नेते कायम सत्तेच्या गुरमीत वावरताना दिसले. आज मात्र पराभवाची चव चाखल्यानंतर हेच नेते जमिनीवर आलेले पहायला मिळत आहे. एरव्ही मतदारसंघातून गाडीची काळी काच चढवून फिरणारे, निवडकच कार्यकर्ते-कंत्राटदारांच्या घरी भेटी देणारे हे नेते आता मतदारसंघात कुणालाही आणि कुठेही सहज उपलब्ध होऊ लागले आहे. सत्तेत नसतानाप्रमाणे कुण्याच्याही लग्न, बारसे, तेरवी अशा कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहे. कधी नव्हे ती कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस करताना दिसत आहे. नेत्यांमधील हा बदल कदाचित दोन वर्षाआधी असता तर आज जिल्ह्यातील काँग्रेसच्या पाचही जागा शाबूत असत्या, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)