शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारपर्यंत करावी लागणार चिल्लरची प्रतीक्षा

By admin | Updated: November 18, 2016 02:29 IST

पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे.

बोटावर लागणार शाई : आठ दिवसांत ३०० कोटींची चेंज खल्लासयवतमाळ : पाचशे आणि हजार रूपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आदेशानंतर जिल्ह्यात चांगलीच उलथापालथ झाली आहे. आठ दिवसात तब्बल बाराशे कोटींची उलाढाल झाली आहे. तीनशे कोटींचे चिल्लर चलन बाजारात गेले आहेत. तर त्या ऐवजी नऊशे कोटींचे जुने चलन खात्यात जमा झाले आहे. जमा झालेल्या सहाशे कोटीतून पैसे परत मिळविण्यासाठी ग्राहकांची रेटारेटी सुरू आहे. मात्र आरबीआयकडील चिल्लर नोटा संपल्याने सध्या दोन दिवस जिल्ह्याला प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर नवीन चेंज देताना बोटाला शाई लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी एसबीआयच्या शाखांमध्ये होणार आहे.जिल्ह्यात २५७ शाखा आहेत. यामध्ये १४३ शाखा राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँकांच्या आहेत. ८९ शाखा सहकारी बँकांच्या आहेत. तर २५ शाखा ग्रामीण बँकेच्या आहेत. जिल्ह्यातील विविध बँकापुढे आठ दिवसांपासून लांबच लांब रांगा आहेत. एका दिवसाला चार हजार रूपयांच्या नोटा एका व्यक्तीला बदलून देण्याच्या सूचना आहेत. यानुसार जिल्हयात आठ दिवसांमध्ये ३०० कोटींच्या नोटा बदलून ग्राहकांच्या हाती सुपूर्द झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटांच्या माध्यमातून नऊशे कोटी रूपये जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरबीआयकडून मिळणाऱ्या चिल्लर नोटा जिल्ह्यात पोहचण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. जमा झालेली चिल्लर काही तासातच रिकामी झाल्याने दुपारनंतर एटीएमचे सेटर बंद झाले. तर अनेक बँकाकडील रक्कम दुपारनंतर कमी झाली. यामुळे काही खासगी बँकांना सर्वसामान्याच्या रोषांचा सामना करावा लागत आहे. (शहर वार्ताहर)गर्दी वाढल्यास तत्काळ कळवामंगळवारी पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम संतप्त ग्राहकाने फोडले. यामुळे जिल्हा प्रशासनाने पुढील अनर्थ टाळण्यासाठी सर्वच एटीएम धारकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी वाढल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी पोलीसांकडे करण्याच्या सूचना आहेत. एका व्यक्तीला एकावेळा चार हजार रूपयांची चेंज करता यावी म्हणून बोटाला शाई लावण्याच्या सूचना जिल्ह्यात धडकल्या आहेत.