शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
4
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
5
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
6
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
7
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
8
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
9
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
10
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
11
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
12
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
13
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
14
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
15
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
16
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
17
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
18
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
19
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
20
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?

प्रतीक्षा मृगधारा बरसण्याची

By admin | Updated: June 7, 2015 00:00 IST

रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्यानंतर आता ८ जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राची शेतकऱ्यांंना मोठी आशा आहे.

मशागत पूर्ण : बी-बियाणे, खतांसाठी धडपड, पुसद येथे कृषी केंद्रांमध्ये गर्दी पुसद : रोहिणी नक्षत्र पूर्णत: कोरडे गेल्यानंतर आता ८ जूनपासून सुरू होणाऱ्या मृग नक्षत्राची शेतकऱ्यांंना मोठी आशा आहे. मृगनक्षत्राच्या पावसावरच वर्षानुवर्ष पेरणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केले असून बी-बियाणे व खतासाठी धडपड सुरू आहे. केरळपर्यंत मान्सून धडकल्याचे वृत्त समजताच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. शेतकरी खरीप हंगामासाठी मशागतीवर शेवटचा हात मारण्यात मग्न आहे. आता केवळ मृगनक्षत्राच्या पावसाची प्रतीक्षा आहे. रखरखत्यात उन्हात शेतातील कामे उरकली आहे. काही शेतात वखरणीचे कामे सुरू आहे. कचरा काडी, फणकट वेचणे, धुऱ्यावरील बांधबंदीस्त करणे आदी कामे सध्या सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली. मोठ्ठाली ढेकळ बाहेर आली. परंतु पाऊसच झाला नसल्याने हे ढेकळे विरगळली नाही. आता ट्रॅक्टरद्वारेच ढेकळे फोडून जमीन भुसभुसीत करण्याचे काम सुरू आहे. यावर्षी रोहिणी नक्षत्राचा पाऊस बरसला नाही. उन्हाचा तापही कमी झाला नाही. रोहिणी नक्षत्रात दरवर्षी ढगाळी वातावरण राहत असल्याने उकाडा कमी होते. परंतु यावर्षी तसे झाले नाही. पेरणीसाठी मृगाचा पाऊस महत्वाचा असतो. मृगधारा बरसल्यानंतर शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न फुलणार आहे. यासाठी मृगाच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे. रोहिणी नक्षत्र २५ मेपासून सुरू झाले असून त्याचे वाहन उंदीर आहे. त्यामुळे आकाश आभ्राच्छादित दिसत आहे. मृग नक्षत्र ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. या नक्षत्रात काही प्रमाणात पाऊस असणार आहे. परंतु अर्धपर्व मान्सूनचे वारे सुरू झाले नाही. रोहिणी नक्षत्राच्या शेवटीशेवटी ४ जूनच्या रात्री तुरळक पाऊस कोसळला. आद्रानक्षत्र २२ जूनला सुरू होणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. पुनर्वसू नक्षत्र ६ जुलैला प्रारंभ होणार आहे. त्याचे वाहन हत्ती आहे. या नक्षत्रात दमदार पाऊस राहणार असे जाणकार सांगतात. पुष्पनक्षत्र २० जुलैला सुरू होणार आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. या नक्षत्रात पाऊस राहणार आहे. आश्लेषा नक्षत्र ३ आॅगस्टला लागत असून त्याचे वाहन गाढव आहे. मघा नक्षत्र १७ आॅगस्टपासून सुरू होत असून त्याचे वाहन बेंडूक आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र ३१ आॅगस्टला आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. उन्हाळाभर घाम गाळून काळ्या मातीची सेवा करण्यासाठी बळीराजा पुन्हा नव्या उमेदीने सज्ज झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)बोगसचा धोकागेली दोन वर्षांपासून सोयाबीनचे उत्पादन अतिशय कमी होत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनचे बोगस बियाणे येण्याची शक्यता आहे. गतवर्षी हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहन केले जात आहे. या बियाण्यांपासून उत्पादनही चांगले येते.