लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या कामगाराची नोंद आरोग्य विभाग करीत आहे. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. त्यांना १४ दिवसाकरिता क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात ४,७९१ कामगारांची नोंद करण्यात आली आहे. तर १,४६३ कामगारांना स्वगृही परत जायचे आहे. त्याकरिता त्यांना अडचणी सोसाव्या लागत आहे.आतापर्यंत जिल्ह्यात बाहेर राज्यातून १,८५५ कामगार परतले आहेत. तर राज्यातील इतर जिल्ह्यातून २९३६ कामगार जिल्ह्यात परतले आहेत. त्यांच्या आरोग्याची पुढील १४ दिवस तपासणी करण्यात येणार आहे.यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र याचे वेळापत्रक निश्चित नाही. यामुळे मजुरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.कामगारांना स्वगृही पोहचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. रेल्वेचे वेळापत्रक मिळताच या मजुरांना त्या रेल्वेस्थानकापर्यंत पोहचविण्यात येणार आहे.- ललितकुमार वºहाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ
१४६३ कामगारांना स्वगृही परतण्याचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाही. या कामगारांकरिता आता मोफत रेल्वे सोडली जाणार आहे. अमरावतीवरून १३ मे रोजी झारखंडच्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
१४६३ कामगारांना स्वगृही परतण्याचे वेध
ठळक मुद्देवेळापत्रकच नाही : वाहनांसाठी पैसे नाही