शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

वाघापूरला पुराची भीती

By admin | Updated: August 13, 2016 01:29 IST

शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे.

पालिकेचे चुकीचे धोरण : रविदास सोसायटीत पुन्हा पाणी यवतमाळ : शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचे विभाजन केल्यास वसाहतीत पाणी शिरण्याचा धोका कमी होऊ शकतो यवतमाळ नगर परिषद मात्र अनेक सोसायटीच्या पावसाचे पाणी संत रविदास या एकाच सोसायटीच्या नालीत सोडण्याचा प्रयत्न करीत असल्याने या भागात पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाघापूर भागातील संत रविदास सोसायटी भागातून याआधी नाला वाहत होता. कालांतराने हा नाला संपुष्टात आला आहे. तरीही या भागातून पुराच्या पाण्याचा प्रवाह इतर भागाच्या तुलनेत अधिक असतो वाघापूर ग्रामपंचायतने काही प्रमाणात पुराच्या पाण्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याने आता नागरीकांच्या घरात पाणी घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पंधरा ते विस वर्ष पुराच्या पाण्याच्या त्रासापासून नागरीकांची सुटका झाली असतांनाच नगर परीषदेचे अधिकारी मात्र पुन्हा संत रविदास सोसायटीमधील नागरीकांना पुराच्या पाण्यात लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या अंजनेय सोसायटी ते सिंघानिया लेआऊट या भागात मोकळया मैदानात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी लगतच्या सावित्रीबाई फुले सोसायटी मधील नालीमधून वाहून जाऊ शकते मात्र या परीसरातील नागरीकांनी घरासमोरील नाल्या बुजवून टाकल्या आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी नगर परीषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधीत भागातील बुजविण्यात आलेल्या नाल्या मोकळया करणे गरजेचे असताना येथील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीत सोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे सिमेंटचा रस्ता फोडून पाईप टाकून जमा पाणी रविदास सोसायटीत सोडल्या जाणार आहे. या ठिकाणी सिमेंटचे पाईप येऊन पडताच या भागातील नागरीकांचा संताप अनावर झाला आहे. आजच्या स्थितीत अनेक भागातील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीतूनच वाहते. वर्षभर वाहणारी अशी येथील नाली आहे. अशा अवस्थेत नगर परीषद मात्र सिंघानिया नगर चे पाणी सरळ उतारात न सोडता रविदास सोसायटीत सोडण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास संततधार पावसात पावसाच्या पाण्याचा फ्लो वाढल्यास नाल्याला पूर येऊन या भागातील घरात पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भागातील नाली शेवटपर्यंत मोकळी करणे तसेच पाण्याचे विभाजन करणे गरजेचे आहे असे असताना जाणिवपूर्वक एकाच नालीवर पाण्याचा ताण निर्माण करण्याचा हा प्रयत्न अन्याय करणारा असल्याचे निवेदन माणिकराव शेळके, भास्कर भागवते तसेच इतर नागरीकांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांमध्ये रोष काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतच्या प्रयत्नामुळे या भागातील नाल्याला येणारा पूर बंद झाला असताना आता नगरपरिषदेच्या उरफाट्या कारभारामुळे पुन्हा एकदा संत रविदास सोसायटीतील नाल्याला पूर येवून पाणी घरात शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.