शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

वाघापूरला पुराची भीती

By admin | Updated: August 13, 2016 01:29 IST

शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे.

पालिकेचे चुकीचे धोरण : रविदास सोसायटीत पुन्हा पाणी यवतमाळ : शहरालगतच्या वाघापूर क्षेत्रात नाल्याच्या पुराचे पाणी अनेकवेळा नागरिकांच्या घरात घुसले आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याचे विभाजन केल्यास वसाहतीत पाणी शिरण्याचा धोका कमी होऊ शकतो यवतमाळ नगर परिषद मात्र अनेक सोसायटीच्या पावसाचे पाणी संत रविदास या एकाच सोसायटीच्या नालीत सोडण्याचा प्रयत्न करीत असल्याने या भागात पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाघापूर भागातील संत रविदास सोसायटी भागातून याआधी नाला वाहत होता. कालांतराने हा नाला संपुष्टात आला आहे. तरीही या भागातून पुराच्या पाण्याचा प्रवाह इतर भागाच्या तुलनेत अधिक असतो वाघापूर ग्रामपंचायतने काही प्रमाणात पुराच्या पाण्याचे विभाजन करण्याचा प्रयत्न केल्याने आता नागरीकांच्या घरात पाणी घुसण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पंधरा ते विस वर्ष पुराच्या पाण्याच्या त्रासापासून नागरीकांची सुटका झाली असतांनाच नगर परीषदेचे अधिकारी मात्र पुन्हा संत रविदास सोसायटीमधील नागरीकांना पुराच्या पाण्यात लोटण्याचा प्रयत्न करीत आहे. सध्या अंजनेय सोसायटी ते सिंघानिया लेआऊट या भागात मोकळया मैदानात मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. हे पाणी लगतच्या सावित्रीबाई फुले सोसायटी मधील नालीमधून वाहून जाऊ शकते मात्र या परीसरातील नागरीकांनी घरासमोरील नाल्या बुजवून टाकल्या आहेत. त्यामुळे साचलेल्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आता यावर तोडगा काढण्यासाठी नगर परीषदेच्या प्रशासकीय यंत्रणेने संबंधीत भागातील बुजविण्यात आलेल्या नाल्या मोकळया करणे गरजेचे असताना येथील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीत सोडण्याचा प्रयत्न चालविला आहे. विशेष म्हणजे सिमेंटचा रस्ता फोडून पाईप टाकून जमा पाणी रविदास सोसायटीत सोडल्या जाणार आहे. या ठिकाणी सिमेंटचे पाईप येऊन पडताच या भागातील नागरीकांचा संताप अनावर झाला आहे. आजच्या स्थितीत अनेक भागातील पाणी संत रविदास सोसायटी मधील नालीतूनच वाहते. वर्षभर वाहणारी अशी येथील नाली आहे. अशा अवस्थेत नगर परीषद मात्र सिंघानिया नगर चे पाणी सरळ उतारात न सोडता रविदास सोसायटीत सोडण्याचा प्रयत्न करीत आहे. असे झाल्यास संततधार पावसात पावसाच्या पाण्याचा फ्लो वाढल्यास नाल्याला पूर येऊन या भागातील घरात पाणी घुसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक भागातील नाली शेवटपर्यंत मोकळी करणे तसेच पाण्याचे विभाजन करणे गरजेचे आहे असे असताना जाणिवपूर्वक एकाच नालीवर पाण्याचा ताण निर्माण करण्याचा हा प्रयत्न अन्याय करणारा असल्याचे निवेदन माणिकराव शेळके, भास्कर भागवते तसेच इतर नागरीकांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले आहे. (प्रतिनिधी) नागरिकांमध्ये रोष काही वर्षापूर्वीच ग्रामपंचायतच्या प्रयत्नामुळे या भागातील नाल्याला येणारा पूर बंद झाला असताना आता नगरपरिषदेच्या उरफाट्या कारभारामुळे पुन्हा एकदा संत रविदास सोसायटीतील नाल्याला पूर येवून पाणी घरात शिरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.