शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

खडकडोह गावात शिरला वाघ

By admin | Updated: September 15, 2015 05:13 IST

झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर

वणी : झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर दुसऱ्या बकरीला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थ मात्र प्रचंड भयभीत झाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यातसुद्धा याच परिसरातील दोन गायीला वाघाने फस्त केले होते. तेव्हापासून या परिसरात वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी मध्यरात्री अचानक रामचंद्र नैताम यांच्या घराजवळील गोठ्यात वाघाने प्रवेश केला. तेथे बांधून असलेली त्यांची एक बकरी वाघाने फस्त केली. त्यानंतर सखाराम नांदेकर यांच्या घराजवळ बांधून असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला केला. यात बकरी गंभीर जखमी झाली.रविवारी रात्री या परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील वीज गुल झाली होती. अशातच वाघाने गावात प्रवेश करून दोन बकऱ्यावर हल्ला चढविला. यात रामचंद्र नैताम यांचे पाच हजारांचे नुकसान झाले. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. तेव्हा वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांचा रोषाचाही सामना करावा लागला. या परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असून चिंचघाट, अडकोली, जुनोनी, पवनार आदी गावे वाघाच्या दहशतीत सापडली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभाग सपशेल अयशस्वी ठरत आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडत आहे. वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)महावितरणच्या अवकृपेमुळे नागरिकांमध्ये भिती४या परिसरात रात्रीच्या वेळी बहुतांश वेळा वीज राहत नाही. त्यामुळे गावात अंधार असतो. रविवारी रात्री वीज गेल्याने गावात वाघा आला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. परंतु वाघाने गावात शिरून बकरी ठार केल्याचे कळताच ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. महावितरणने या परिसरात रात्रीच्या वेळी वीज सदैव सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.