शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

खडकडोह गावात शिरला वाघ

By admin | Updated: September 15, 2015 05:13 IST

झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर

वणी : झरी तालुक्यातील खडकडोह येथे रविवारी मध्यरात्री अचानक वाघ शिरला. या वाघाने तेथील एका बकरीला ठार केले, तर दुसऱ्या बकरीला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे ग्रामस्थ मात्र प्रचंड भयभीत झाले आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गेल्या महिन्यातसुद्धा याच परिसरातील दोन गायीला वाघाने फस्त केले होते. तेव्हापासून या परिसरात वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. अशातच रविवारी मध्यरात्री अचानक रामचंद्र नैताम यांच्या घराजवळील गोठ्यात वाघाने प्रवेश केला. तेथे बांधून असलेली त्यांची एक बकरी वाघाने फस्त केली. त्यानंतर सखाराम नांदेकर यांच्या घराजवळ बांधून असलेल्या बकरीवर वाघाने हल्ला केला. यात बकरी गंभीर जखमी झाली.रविवारी रात्री या परिसरात दमदार पाऊस झाला. त्यामुळे गावातील वीज गुल झाली होती. अशातच वाघाने गावात प्रवेश करून दोन बकऱ्यावर हल्ला चढविला. यात रामचंद्र नैताम यांचे पाच हजारांचे नुकसान झाले. ही बाब सकाळी लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली. तेव्हा वनकर्मचाऱ्यांना गावकऱ्यांचा रोषाचाही सामना करावा लागला. या परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असून चिंचघाट, अडकोली, जुनोनी, पवनार आदी गावे वाघाच्या दहशतीत सापडली आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मात्र वनविभाग सपशेल अयशस्वी ठरत आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडत आहे. वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)महावितरणच्या अवकृपेमुळे नागरिकांमध्ये भिती४या परिसरात रात्रीच्या वेळी बहुतांश वेळा वीज राहत नाही. त्यामुळे गावात अंधार असतो. रविवारी रात्री वीज गेल्याने गावात वाघा आला, हे कुणालाही ठाऊक नव्हते. परंतु वाघाने गावात शिरून बकरी ठार केल्याचे कळताच ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. महावितरणने या परिसरात रात्रीच्या वेळी वीज सदैव सुरू ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.