शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक गेला! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दात म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या पाच महिन्यांतच एसटी बँकेत अस्थिरता; कारभारावरून संचालकांमध्ये चलबिचल, कर्जवाटपही थांबविले 

By विलास गावंडे | Updated: November 27, 2023 19:19 IST

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे.

यवतमाळ: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळविलेल्या एसटी बँक संचालकांमध्ये अवघ्या पाच महिन्यांमध्ये कमालीची अस्थिरता निर्माण झाली आहे. या बँकेचे कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये अनेक मुद्यांवरून चलबिचल सुरू असल्याने यातून कसा मार्ग निघतो, याकडे आता हजारो सभासदांचे लक्ष लागले आहे. अशातच बँकेचे काही संचालक 'नॉट रिचेबल' झाल्याने गुंता वाढल्याचे चित्र आहे.

राज्यभरात ६२ हजार सभासद आणि ५० शाखा असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेत (एसटी बँक) दीर्घ कालावधीनंतर पाच महिन्यांपूर्वी सत्तापरिवर्तन झाले. पूर्वी कामगार संघटनाप्रणीत संचालक मंडळ होते. पाच महिन्यांपूर्वी ॲड. सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील कष्टकरी जनसंघाने एकाहाती विजय मिळविला. पॅनलचे सर्व १९ संचालक निवडून आले. मात्र, मागील काही दिवसांत या संचालक मंडळाने घेतलेले निर्णय कमालीचे वादात सापडले आहेत. बँकेने कर्जाचा व्याजदर कमी केला, काही प्रकरणात विनाजामीन कर्जवाटप झाले, शिवाय कर्जाचा विमा उतरविण्याचाही निर्णय घेण्यात आला. या सर्व निर्णयामुळे नव्या संचालकांचा कारभार वादाचा ठरतो आहे. ॲड. सदावर्ते यांच्या मार्गदर्शनातच बँक चालविली जात असल्याचा आरोप आहे. मर्जीतील लोकांना नियुक्त्या देणे असे प्रकार सुरू झाले. या बाबी काही संचालकांना खटकू लागल्याने त्यांच्यात खदखद दिसून येत आहे.

बँकेचे काही संचालक मागील चार दिवसांपासून संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांनी रजा टाकल्या आहेत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कही होत नाही. त्यामुळे या संचालकांचा नेमका काय विचार आहे, याविषयी चर्चा रंगू लागली आहे. त्यांना वेगळी चूल तर मांडायची नाही ना, अशीही शंका घेतली जात आहे. ते अचानक नॉट रिचेबल असल्याने या शंकेला बळ मिळत आहे.

या बँकेवर यवतमाळ व अमरावती या दोन विभागांतून असलेले दोन्ही संचालक संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. त्यांच्यासह इतर काही संचालकांचा नेमका मनसुबा काय असावा, हे मात्र कळू शकले नाही. हा सर्व प्रकार इकडे सुरू असताना तिकडे बँकेची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे.

४६६ कोटींच्या ठेवी कमी झाल्याएसटी बँकेवर नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर ४६६ कोटी रुपयांच्या ठेवी कमी झाल्या आहेत. ३० जून २०२३ पूर्वी दोन हजार ३११ कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. आता त्या १८४५ कोटींवर आल्या आहेत. बँकेने ठेवीपेक्षा अधिक कर्ज वाटप केल्याने सीडी रेशो ९५.४९ टक्क्यांवर गेला. अर्थात शंभर रुपयाच्या ठेवीतून ७५ रुपयेच कर्ज वाटप करता येते. ही मर्यादा बँकेने पार केल्याने रेशो वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बँकेच्या कार्यपद्धतीवर सभासदांचा रोष आहे. काही संचालकांमध्येही नाराजी आहे. ही बाब बँकेच्या दृष्टीने चिंतेची आहे. नियमबाह्य पद्धतीने होत असलेली कामे थांबायला पाहिजेत. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस

बँक सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. संचालकांमध्ये कुठलीही नाराजी नाही. वैयक्तिक कारणांमुळे ते उपलब्ध होऊ शकत नाहीत. बँकेचा कारभार चांगल्या रीतीने चालावा यासाठी अनुभवी लोकांचे सहकार्य अपेक्षित आहे. - मनोज महल्ले, विभागीय अध्यक्ष, कष्टकरी जनसंघ, यवतमाळ

  

टॅग्स :YavatmalयवतमाळGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्ते