शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

विडूळ-चातारी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण योग्यच

By admin | Updated: January 25, 2017 00:16 IST

जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असले तरी

निवडणूक विभागाचा दावा : उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या विडूळ-चातारी गटाच्या सामान्य महिला या आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असले तरी काढले गेलेले हे आरक्षण योग्यच असल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे. तसे शपथपत्रही नागपूर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले असून आता त्यावरील निकालाची प्रतीक्षा आहे. विडूळ-चातारीचे आरक्षण बदलल्यास जिल्हा परिषदेच्या अन्य काही गटांचेही आरक्षण बदलणार असा तर्क राजकीय गोटात लावला जात आहे. त्यामुळे अनेक गटातील इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम दूर करण्याऐवजी प्रशासनातील यंत्रणा मात्र थेट उच्च न्यायालयाच्या येणाऱ्या निर्णयाकडे बोट दाखवित आहे. या अनुषंगाने उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, विडूळ-चातारीचे निघालेले आरक्षण योग्यच आहे. तरीही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. निर्णय या आरक्षणाच्या विरोधात गेल्यास अन्य गटातील आरक्षण बदलतील काय ? या प्रश्नावर व्यवहारे यांनी सध्या काहीही सांगता येत नाही, एवढेच उत्तर दिले. जिल्हा परिषदेचे ६१ गट आहेत. यात विडूळ-चातारी-६१ क्रमांकाच्या गटाच्या आरक्षणावरून वाद निर्माण झाला. या गटाचे आरक्षण सामान्य महिलेसाठी निघाले होते. त्यापूर्वी २०१२ मध्ये हा गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, तर तत्पूर्वी २००७ मध्ये हा गट सामान्य महिलेसाठीच आरक्षित होता. यावेळी आरक्षण वेगळे येण्याची अपेक्षा असताना पुन्हा हा गट सामान्य महिलेसाठी आरक्षित झाला. याबाबत सुभाष शिंदे यांनी प्रथम जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व नंतर विभागीय आयुक्तांकडे आक्षेप सादर करून दाद मागितली. तथापि दोन्ही ठिकाणी त्यांचे आक्षेप फेटाळण्यात आले होते. यानंतर शिंदे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान जिल्हा निवडणूक विभागाने काढण्यात आलेले आरक्षण योग्य असल्याचाच दावा केला होता. (शहर प्रतिनिधी)