शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वणीतील आरोग्य यंत्रणा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:36 IST

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा तुटवडा : गोरगरिबांना धरावी लागते खासगी दवाखान्याची वाट

ऑनलाईन लोकमतवणी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. परिणामी गोरगरिब जनतेलाही खासगी दवाखान्याची वाट धरून उपचार करून घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट ढासळत आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शहरात ग्रामीण रूग्णालय, तर ग्रामीण भागात कायर, शिरपूर, राजूर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बाह्यरूग्ण तपासणी, आंतर रूग्णसेवा, आरोग्य शिबिरे, लसीकरण व आरोग्यविषयक जनजागृती करणे, या बाबीकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. मात्र आरोग्य केंद्रात असणारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा देण्याची अनास्था, यामुळे गोरगरिब जनतेला आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त होत आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था याहून वेगळी नाही. शिरपूर आरोग्य केंद्रात नुकतेच नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात काही गोरगरिब महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या. मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वच्छ पाण्याची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. पंचायत समिती सदस्या वर्षा पोतराजे यांनी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली असता, आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार त्यांना दिसून आला. तेव्हा त्यांनी तातडीने काही व्यवस्था करून देण्यास भाग पाडले. कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तर केवळ शोभेचीच वस्तू ठरत आहे. या केंद्रातील काही कर्मचारी सतत नशेत असल्याने तेथे महिला कर्मचाऱ्यांचीही सुरक्षितता राहिली नाही. शिरपूर व कोलगाव येथे वैद्यकीय अधिकारी तर रूग्णांना दिसणे भाग्याचे समजले जाते. बरेचदा केंद्रातील आरोग्य कर्मचारीच बाह्य रूग्ण तपासणी करताना आढळून येते.राजूर येथे मोठ्या प्रमाणात कामगार आहे. त्यामुळे राजूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरणारे समजले जाते. मात्र या केंद्रातही रूग्णांना समाधानकारक सेवा मिळत नाही. कायरचे आरोग्य केंद्रातही कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने तेथील आरोग्य सेवा ढेपाळली आहे. आरोग्य उपकेंद्रात, तर आरोग्य कर्मचारी कधीच हजर राहत नसल्याने ही केंद्रे मोकाटच अवस्थेत आहे. या सर्व आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तरी कशावर लक्ष ठेवतात, हे समजण्यास मार्ग नाही.ग्रामीण रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघरवणीचे ग्रामीण रूग्णालय तर समस्यांचे माहेरघरच बनले आहे. बाह्यरूग्णावर थातुरमातूर उपचार करणे, रूग्णांना रेफर करून वाट दाखविणे, या मार्गाचा अवलंब केला जात आहे. स्वच्छतेचा अभाव, सुरक्षेचा अभाव, यामुळे रूग्णांना उपचारासाठी जावे की नाही, हा विचार येतो. येथे काही विशेष तज्ज्ञांच्या कंत्राटी करारावर नियुक्त्या केल्या आहे. मात्र त्यांच्या सेवेचा रूग्णांना कधीच लाभ मिळत नाही. त्यांच्या वेतनावर दरमहा लाखोचा खर्च होत आहे.