शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

वणीतील आरोग्य यंत्रणा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:36 IST

सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे.

ठळक मुद्देकर्मचाºयांचा तुटवडा : गोरगरिबांना धरावी लागते खासगी दवाखान्याची वाट

ऑनलाईन लोकमतवणी : सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाने शासकीय आरोग्य सेवेचे जाळे तयार केले आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा व त्यांच्या अनास्थेमुळे शासकीय आरोग्यसेवा कुचकामी ठरत आहे. परिणामी गोरगरिब जनतेलाही खासगी दवाखान्याची वाट धरून उपचार करून घ्यावे लागत असल्याने गोरगरिबांचे आर्थिक बजेट ढासळत आहे.तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शहरात ग्रामीण रूग्णालय, तर ग्रामीण भागात कायर, शिरपूर, राजूर व कोलगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र देण्यात आले आहे. या केंद्रामध्ये बाह्यरूग्ण तपासणी, आंतर रूग्णसेवा, आरोग्य शिबिरे, लसीकरण व आरोग्यविषयक जनजागृती करणे, या बाबीकडे लक्ष देणे बंधनकारक आहे. मात्र आरोग्य केंद्रात असणारी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचा तुटवडा आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची सेवा देण्याची अनास्था, यामुळे गोरगरिब जनतेला आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त होत आहे.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अवस्था याहून वेगळी नाही. शिरपूर आरोग्य केंद्रात नुकतेच नसबंदी शस्त्रक्रियेचे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात काही गोरगरिब महिलांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या. मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. स्वच्छ पाण्याची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. पंचायत समिती सदस्या वर्षा पोतराजे यांनी केंद्रातील व्यवस्थेची पाहणी केली असता, आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार त्यांना दिसून आला. तेव्हा त्यांनी तातडीने काही व्यवस्था करून देण्यास भाग पाडले. कोलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र तर केवळ शोभेचीच वस्तू ठरत आहे. या केंद्रातील काही कर्मचारी सतत नशेत असल्याने तेथे महिला कर्मचाऱ्यांचीही सुरक्षितता राहिली नाही. शिरपूर व कोलगाव येथे वैद्यकीय अधिकारी तर रूग्णांना दिसणे भाग्याचे समजले जाते. बरेचदा केंद्रातील आरोग्य कर्मचारीच बाह्य रूग्ण तपासणी करताना आढळून येते.राजूर येथे मोठ्या प्रमाणात कामगार आहे. त्यामुळे राजूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र उपयुक्त ठरणारे समजले जाते. मात्र या केंद्रातही रूग्णांना समाधानकारक सेवा मिळत नाही. कायरचे आरोग्य केंद्रातही कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने तेथील आरोग्य सेवा ढेपाळली आहे. आरोग्य उपकेंद्रात, तर आरोग्य कर्मचारी कधीच हजर राहत नसल्याने ही केंद्रे मोकाटच अवस्थेत आहे. या सर्व आरोग्य केंद्रावर नियंत्रण ठेवणारे तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय तरी कशावर लक्ष ठेवतात, हे समजण्यास मार्ग नाही.ग्रामीण रुग्णालय बनले समस्यांचे माहेरघरवणीचे ग्रामीण रूग्णालय तर समस्यांचे माहेरघरच बनले आहे. बाह्यरूग्णावर थातुरमातूर उपचार करणे, रूग्णांना रेफर करून वाट दाखविणे, या मार्गाचा अवलंब केला जात आहे. स्वच्छतेचा अभाव, सुरक्षेचा अभाव, यामुळे रूग्णांना उपचारासाठी जावे की नाही, हा विचार येतो. येथे काही विशेष तज्ज्ञांच्या कंत्राटी करारावर नियुक्त्या केल्या आहे. मात्र त्यांच्या सेवेचा रूग्णांना कधीच लाभ मिळत नाही. त्यांच्या वेतनावर दरमहा लाखोचा खर्च होत आहे.