शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

बोरीअरब येथे आजपासून विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव

By admin | Updated: March 13, 2016 02:54 IST

तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.

वारकऱ्यांचा मेळा : सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधनदारव्हा : तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधनाची मेजवाणी नागरिकांना मिळणार असून या सप्ताहाला राज्यभरातील २५ हजारांवर वारकरी उपस्थित राहणार आहे. बोरीअरब येथे गत २५ वर्षांपासून दर रविवारी विठ्ठल नामजप केला जातो. या जप अनुष्ठानाला यंदा २५ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १३ मार्च रोजी या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून २० मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवासाठी बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या प्रांगणात ३२ हजार चौरस फुटाचा सभा मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे २५ हजार भाविक दररोज उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. दररोज पाच हजार भाविकांची भोजन व्यवस्था आणि दोन हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामवंत सांस्कृतिक, कृषी, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यात मधुकर महाराज खोडे, अपर्णाताई रामतीर्थकर, पोपटराव पवार, संदीप अपार, सिंधूताई सपकाळ, डॉ. तात्याराव लहाणे, जयंत चावरे यांचा समावेश असून दररोज रात्री महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिकीर्तन करणार आहेत. सात दिवस बोरीअरब येथे वारकऱ्यांचा मेळा जमणार असून या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)