शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

बोरीअरब येथे आजपासून विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव

By admin | Updated: March 13, 2016 02:54 IST

तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे.

वारकऱ्यांचा मेळा : सामाजिक व आध्यात्मिक प्रबोधनदारव्हा : तालुक्यातील बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव कार्यक्रमाला रविवार १३ मार्चपासून प्रारंभ होत असून या महोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक प्रबोधनाची मेजवाणी नागरिकांना मिळणार असून या सप्ताहाला राज्यभरातील २५ हजारांवर वारकरी उपस्थित राहणार आहे. बोरीअरब येथे गत २५ वर्षांपासून दर रविवारी विठ्ठल नामजप केला जातो. या जप अनुष्ठानाला यंदा २५ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १३ मार्च रोजी या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून २० मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. या महोत्सवासाठी बोरीअरब येथील शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या प्रांगणात ३२ हजार चौरस फुटाचा सभा मंडप उभारण्यात आला आहे. सुमारे २५ हजार भाविक दररोज उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. दररोज पाच हजार भाविकांची भोजन व्यवस्था आणि दोन हजार भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रातील नामवंत सांस्कृतिक, कृषी, आरोग्य, व्यसनमुक्ती आणि सामाजिक विषयावर मार्गदर्शन करणार आहे. त्यात मधुकर महाराज खोडे, अपर्णाताई रामतीर्थकर, पोपटराव पवार, संदीप अपार, सिंधूताई सपकाळ, डॉ. तात्याराव लहाणे, जयंत चावरे यांचा समावेश असून दररोज रात्री महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिकीर्तन करणार आहेत. सात दिवस बोरीअरब येथे वारकऱ्यांचा मेळा जमणार असून या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)