शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी काठावरील गावांना धोका

By admin | Updated: July 30, 2014 00:03 IST

तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़

वणी : तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नदीकाठावरील गावात नदीतील दूषित पाण्याचा पाणी पुरवठा होत असल्याने नदी काठावरील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़तालुक्यातून वर्धा, पैनगंगा आणि विदर्भा नदी वाहते. त्यापैकी विदर्भा नदी काठावर वसलेल्या घोन्सा, दहेगाव, साखरा, दरा, बोपापूर, कुंभारखणी, बोर्डा, कायर या गावांमध्ये सध्या दूषित पाणी पुरवठा होत असल्याचा ग्रामस्थांचा समज झाला आहे. गेल्या सप्ताहात पावसाने तीन दिवस सतत हजेरी लावली होती़ त्यामुळे जंगल व नाल्यातील पाणी व वेकोलि खाणीतील रसानयुक्त पाणी नदीमध्ये मिश्रीत झाले आहे. तालुक्यातील विदर्भा नदीची पातळी थोड्या प्रमाणात वाढली आहे़ परंतु नदीचे पाणी मात्र संपूर्ण गढूळ दिसून येत आहे़ तेच पाणी पाईपलाईनद्वारे नदी काठावरील पाण्याच्या टाकीत ओढले जाते व त्यानंतर गावामध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो़नदीतून टाकीत येणारे पाणी व्यवस्थित निर्जंतुकीकरण होत नाही. त्याबाबत ग्रामपंचायती उदासीन आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना त्याच दूषित पाण्याचा पुरवठा होतो. ते पाणी प्राशन केल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़ त्याचबरोबर मुक्या जनावरांनाही तेच पाणी प्राशन करावे लागत असल्याने त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे़ संबंधित ग्रामपंचायती या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे़ ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीमध्ये योग्य प्रमाणात ब्लिचींग पावडरचा वापरही करीत नाहीत. दूषित व गढूळ पाण्याचे व्यवस्थित निर्जंतुुकीकरण केले जात नाही. त्यामुळे नदी काठावरील गावात दूषित पाणी पोहोचत आहे़ सध्या ग्रामीण भागामध्ये साथीच्या विविध आजारांची लागण होत आहे. प्रत्येक घरी एक ना एक, रूग्ण हमखास आढळत आहे. त्याला दूषित पाणीच कारणीभूत ठरत आहे. नदी काठावरील प्रत्येक गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य विभागाने तातडीने उपययोजना करण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभाग ग्रामपंचायतींना ब्लिचींग पावडर पुरविते. मात्र ते नेमके जाते कुठे, असा प्रश्न आहे. कारण नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात ब्लिचींग पावडर टाकल्याचा लवलेशही नसतो. परिणामी ग्रामस्थांनाच पावसाळ्यात विविध साथ रोगांना तोंड द्यावे लागते. (कार्यालय प्रतिनिधी)