शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

घारफळ परिसरातील गावे वादळी पावसाच्या तडाख्यात

By admin | Updated: March 1, 2016 02:05 IST

सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात..

तुरळक गारा : रबी पिकांसह भाजीपाल्याचे नुकसान, वीजपुरवठा खंडितघारफळ : सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा घारफळ परिसराला जबर तडाखा बसला. तुरळक गाराही या भागात झाल्या. गहू, हरभरा, कापूस यासह भाजीपाला पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आधीच निसर्गाच्या लहरीपणाचा मार झेलत असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. रात्री २ वाजताच्या सुमारास वादळ सुरू झाले. यानंतर पाऊस आणि गारा पडल्या. पावसामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील उभे पीक उद्ध्वस्त झाले आहेत. घारफळ, परसोडी, सारफळी, एरंडगाव, गोंधळी, वडगाव, मुबारकपूर, गवंडी, खर्डा, सिंदी, वरूड, रेणुकापूर, पाचखेड, आष्टा, सौजना या गावांमधील शेती पिकाचे नुकसान झालेले आहे. वीरखेड, वाटखेड या गावांमध्ये सतत दोन दिवस वादळी पाऊस आणि गारपीट झाली. पावसाच्या कमी प्रमाणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे खरिपाचे उत्पादन बुडाले. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी गहू, हरभरा या रबी पिकांसह कपाशीला पाणी देवून उत्पन्न घेण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु अचानक झालेल्या पावसामुळे त्यांच्या या प्रयत्नावर पूर्णत: पाणी फेरले गेले आहे. संबंधित विभागाने पिकाच्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी आहे.पाऊस आणि गारांमुळे परिसरातील वीटभट्ट्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांधलेल्या विटांचा चिखल झाला, तर लावलेली भट्टी विझली. आता वीटभट्टी मालकांना यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. शिवाय या भागातील वीज पुरवठाही खंडित झाला आहे. परिणामी विजेवर चालणारे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. (वार्ताहर)