शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

तेलंगणात सागवान तस्करांचे गाव

By admin | Updated: September 29, 2014 23:13 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे.

अशोक काकडे - पुसद विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. वन विभागाच्या हाती एक टोळी लागली. तेव्हा तेलंगणात सागवान तस्करांचे गावच असल्याचे पुढे आले. निजामाबाद जिल्ह्यातील केशवपट्टणम असे या गावाचे नाव असून तेथे १० ते १२ टोळ्या कायमस्वरूपी कार्यरत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वन विभागात गेल्या काही वर्षांपासून सागवान तस्करीच्या मोठ्या कारवाया होत आहे. वाहनाद्वारे सागवानाची तस्करी केली जात आहे. या टोळ्यांना स्थानिक चोरट्यांचे सहकार्य असल्याने त्यांचे काम बिनबोभाटपणे होत आहे. नुकतीच एक टोळी वन विभागाच्या हाती लागली असून या टोळीमुळे सागवान तस्करीचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात होणाऱ्या सागवान तस्करीमागे तेलंगणातील टोळीचा हात असल्याचा संशय नेहमी व्यक्त केला जात होता. मात्र दोन दिवसापूर्वी सापडलेल्या टोळीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. तेलंगणातील निजामाबादजवळील केशवपट्टणम असे सागवान तस्करांच्या गावाचे नाव आहे. या ठिकाणी दहा ते बारा टोळ्या कार्यरत असून त्यातील पाच टोळ्या महाराष्ट्रातून सागवानाची तस्करी करतात. तेलंगणातील सागवान तस्कर इतके सराईत आहे की, काही वेळातच ते सागवानाचे मोठे वृक्ष कापून वाहनाद्वारे नेतात. यांची चोरी करण्याची पद्धतही अजब आहे. वाहन घेऊन ते मराठवाडा मार्गे विदर्भाच्या जंगलात शिरतात. वाहन जंगलापासून दूर कुठे तरी धाब्यावर थांबविले जाते. अनेकदा तर वाहन पंक्चर असल्याचा देखावा निर्माण केला जातो. दोन-तीन तासात पद्धतशीरपणे सागवान कटाई केली जाते. दोन दुचाकीधारक अवतीभोवती निगराणी करीत असतात. जंगलात स्थानिक मजूर सागवान तोड करतात. परंतु याचा वन विभागाला थांगपत्ता लागत नाही. एकदा सागवान तोडले की काही वेळात वाहन जंगलाशेजारी आणून त्यात सागवान भरले जाते. त्यावर ताडपत्री टाकून कुटाराचे पोते ठेवले जातात. एकदा महाराष्ट्राची हद्दपार केली की तेलंगणात त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे या टोळ्यांचा शिरकाव महाराष्ट्रात वाढला आहे. या टोळ्यांमुळे विदर्भातील मौल्यवान सागवान मात्र नष्ट होत आहे.