शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात सागवान तस्करांचे गाव

By admin | Updated: September 29, 2014 23:13 IST

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे.

अशोक काकडे - पुसद विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा अभयारण्यासह जिल्ह्यातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सागवान तस्करी सुरू असून या तस्करीमागे तेलंगणातील सागवान तस्करांचा सहभाग असल्याचे वारंवार उघड झाले आहे. वन विभागाच्या हाती एक टोळी लागली. तेव्हा तेलंगणात सागवान तस्करांचे गावच असल्याचे पुढे आले. निजामाबाद जिल्ह्यातील केशवपट्टणम असे या गावाचे नाव असून तेथे १० ते १२ टोळ्या कायमस्वरूपी कार्यरत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वन विभागात गेल्या काही वर्षांपासून सागवान तस्करीच्या मोठ्या कारवाया होत आहे. वाहनाद्वारे सागवानाची तस्करी केली जात आहे. या टोळ्यांना स्थानिक चोरट्यांचे सहकार्य असल्याने त्यांचे काम बिनबोभाटपणे होत आहे. नुकतीच एक टोळी वन विभागाच्या हाती लागली असून या टोळीमुळे सागवान तस्करीचे मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात होणाऱ्या सागवान तस्करीमागे तेलंगणातील टोळीचा हात असल्याचा संशय नेहमी व्यक्त केला जात होता. मात्र दोन दिवसापूर्वी सापडलेल्या टोळीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. वन अधिकाऱ्यांनी चौकशी केली तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. तेलंगणातील निजामाबादजवळील केशवपट्टणम असे सागवान तस्करांच्या गावाचे नाव आहे. या ठिकाणी दहा ते बारा टोळ्या कार्यरत असून त्यातील पाच टोळ्या महाराष्ट्रातून सागवानाची तस्करी करतात. तेलंगणातील सागवान तस्कर इतके सराईत आहे की, काही वेळातच ते सागवानाचे मोठे वृक्ष कापून वाहनाद्वारे नेतात. यांची चोरी करण्याची पद्धतही अजब आहे. वाहन घेऊन ते मराठवाडा मार्गे विदर्भाच्या जंगलात शिरतात. वाहन जंगलापासून दूर कुठे तरी धाब्यावर थांबविले जाते. अनेकदा तर वाहन पंक्चर असल्याचा देखावा निर्माण केला जातो. दोन-तीन तासात पद्धतशीरपणे सागवान कटाई केली जाते. दोन दुचाकीधारक अवतीभोवती निगराणी करीत असतात. जंगलात स्थानिक मजूर सागवान तोड करतात. परंतु याचा वन विभागाला थांगपत्ता लागत नाही. एकदा सागवान तोडले की काही वेळात वाहन जंगलाशेजारी आणून त्यात सागवान भरले जाते. त्यावर ताडपत्री टाकून कुटाराचे पोते ठेवले जातात. एकदा महाराष्ट्राची हद्दपार केली की तेलंगणात त्यांना कुणीही विचारत नाही. त्यामुळे या टोळ्यांचा शिरकाव महाराष्ट्रात वाढला आहे. या टोळ्यांमुळे विदर्भातील मौल्यवान सागवान मात्र नष्ट होत आहे.