शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्तरीय समित्या बनल्या केवळ नामधारीच

By admin | Updated: November 2, 2016 01:05 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ..

उपयोगिताच नाही : वर्षभरापासून जिल्ह्यातील १८४८ समित्यांची कामगिरी गुलदस्त्यात, तक्रारी वाढल्यायवतमाळ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. टोकाची भूमिका घेतलेले शेतकरी कुटुंब निदर्शनात का आले नाही, त्यांना मदत का करण्यात आली नाही, याचे उत्तर प्रशासनाना ग्रामस्तरीय समितीला द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु आजही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत, यामध्ये या समित्या काय करीत आहे, हे समजायला मार्ग नाही. या समित्यांना निधीही वितरीत करण्यात आला. त्यामुळे गावातील शेतक-यांना गावातच मदत का वितरीत करण्यात आली नाही, जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान काम करीत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणने त्यांची आर्थिक बाजू बळकट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठीच जिल्हयातील प्रत्येक गावात ग्रामस्तरावर अभियानांतर्गत १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी समित्यांना काम करावे लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सरपंच या समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक सचिव आहेत. गावातीलच चार प्रतिष्ठीत व्यक्ती, तीन महिला, माजी सैनिक, दोन प्रगतिशील शेतकरी, अंगणवाडी सेविका, यांच्यासह इतर सभासदांचा या समितीमध्ये समावेश आहे.त्याचबरोबर पाच हजारापर्यंतची मदत, बीनव्याजी कर्ज, हातऊसने, आकस्मित खर्च, आजारपण, अपघात यासाठी निधीही समित्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतानाही गावातील शेतकरी जर टोकाची भूमिका घेत असेल तर ग्रामस्तरीय समिती अशा शेतकऱ्यांपर्यंत का पोहचली नाही, त्यांचे सर्वेक्षण का करण्यात आले नाही, दिलेला निधीचा विनियोग अद्यापपर्यंत का करण्यात आला नाही. याची विचारणा समित्यांना करण्यात येऊन समित्यांकडे असलेल्या अखर्चित निधीचा अहवाल मागविल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरीय समितीने गावातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत संपर्क साधून त्यांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी काय पावले उचलली, गावातील शेतकऱ्यांची संख्या, नैराश्यात असलेले शेतकरी, आर्थिक विवंचनेत असलेले शेतकरी यांची इंत्भूत माहिती समितीला असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)