शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ग्रामस्तरीय समित्या बनल्या केवळ नामधारीच

By admin | Updated: November 2, 2016 01:05 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ..

उपयोगिताच नाही : वर्षभरापासून जिल्ह्यातील १८४८ समित्यांची कामगिरी गुलदस्त्यात, तक्रारी वाढल्यायवतमाळ : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास ती गावातच सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. टोकाची भूमिका घेतलेले शेतकरी कुटुंब निदर्शनात का आले नाही, त्यांना मदत का करण्यात आली नाही, याचे उत्तर प्रशासनाना ग्रामस्तरीय समितीला द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. परंतु आजही शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत, यामध्ये या समित्या काय करीत आहे, हे समजायला मार्ग नाही. या समित्यांना निधीही वितरीत करण्यात आला. त्यामुळे गावातील शेतक-यांना गावातच मदत का वितरीत करण्यात आली नाही, जिल्हयातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान काम करीत आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणने त्यांची आर्थिक बाजू बळकट करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. यासाठीच जिल्हयातील प्रत्येक गावात ग्रामस्तरावर अभियानांतर्गत १८४८ समित्या स्थापन करण्यात आल्या. शेतकऱ्यांना सामाजिक, आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, नकारात्मक विचार दूर करण्यासाठी समित्यांना काम करावे लागणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सरपंच या समितीचे अध्यक्ष असून ग्रामसेवक सचिव आहेत. गावातीलच चार प्रतिष्ठीत व्यक्ती, तीन महिला, माजी सैनिक, दोन प्रगतिशील शेतकरी, अंगणवाडी सेविका, यांच्यासह इतर सभासदांचा या समितीमध्ये समावेश आहे.त्याचबरोबर पाच हजारापर्यंतची मदत, बीनव्याजी कर्ज, हातऊसने, आकस्मित खर्च, आजारपण, अपघात यासाठी निधीही समित्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे असतानाही गावातील शेतकरी जर टोकाची भूमिका घेत असेल तर ग्रामस्तरीय समिती अशा शेतकऱ्यांपर्यंत का पोहचली नाही, त्यांचे सर्वेक्षण का करण्यात आले नाही, दिलेला निधीचा विनियोग अद्यापपर्यंत का करण्यात आला नाही. याची विचारणा समित्यांना करण्यात येऊन समित्यांकडे असलेल्या अखर्चित निधीचा अहवाल मागविल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रामस्तरीय समितीने गावातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत संपर्क साधून त्यांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी काय पावले उचलली, गावातील शेतकऱ्यांची संख्या, नैराश्यात असलेले शेतकरी, आर्थिक विवंचनेत असलेले शेतकरी यांची इंत्भूत माहिती समितीला असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)