ज्ञानेश्वर ठाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जनावरांपासून शेतातील पिकांचा बचाव करण्यासाठी काटेरी कुंपणाचा वापर होत असल्याचे आपण नेहमी पाहत आलो. आजही बऱ्यापैकी बाभळीच्या झाडांच्या काटेरी कुंपणाचा ग्रामीण भागात वापर होतो. मात्र आता कोरोना या अदृश्य विषाणूच्या दहशतीने हेच काटेरी कुंपण गावबंदी व शहर बंदीसाठी वापरले जात असल्याचे दिसून येत आहे.देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर राहील, अशी स्थिती गेल्या १० दिवसांपर्यंत कायम होती. मात्र मुडाणा येथील सराफा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यूसुद्धा झाला. त्यामुळे कोरोनाने शहर व तालुक्यात शिरकाव केला.संबंधित सराफा व्यावसायिकाच्या संपर्कातील अन्य चार जणांनासुद्धा कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे महागाव शहराला काटेरी कुंपण लावण्यात आले. आरोग्य, महसूल आणि पोलीस प्रशासन डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. प्रतिबंधीत क्षेत्रातून नागरिकांना बाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. नियमांचे उल्लंघन होऊ नये म्हणून परिसर सील करण्यात आला. त्या परिसराला आता चक्क बाभळीच्या काट्यांचे कुंपण घालण्यात आले आहे. पिकांच्या संरक्षणासाठी लावले जाणारे कुंपण आता मानवाला घराबाहेर पडू न देण्यासाठी लावले जात आहे. या संकटाने मानवाला खूप काही शिकविले आहे. एकूणच एका अदृश्य विषाणुमुळे अनेक गावे आणि शहरांना आता काटेरी कुंपण घालण्याची वेळ आली आहे. शेताचे कुंपण गावात आल्याने आता नागरिकांनीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे.कोरोनाने चित्रच पालटलेआजपर्यंतच्या इतिहासात नागरिकांना घरात बसून राहण्यासाठी शासनातर्फे एवढे कठोर पाऊल कधीच उचलले गेले नाही. मात्र कोरोनाने सर्व चित्रच पालटले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाला सहज घेणे, सर्वांनाच महाग पडत आहे. त्याची नागरिकांनासुद्धा जाणीव असणे गरजेचे आहे. त्यामुळेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता काटेरी कुंपणाचा वापर केला जात आहे. अर्थात या काटेरी कुंपणाच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा काटेरी कुंपणात न अडकण्यासाठी नियमांची अंमलबजावणी करणे हाच रामबाण उपाय आहे.आपत्तीमधून मानवाने धडा घेण्याची गरजकोरोनाच्या आपत्तीमुळे मानव प्रथमच आपल्याच घरात बंदिस्त झाला आहे. संसर्ग वाढू नये म्हणून शासन व प्रशासनासोबत नागरिकांनाही दक्ष राहण्याची गरज आहे. या आपत्तीने मानवाला निसर्गासोबत एकरूप होवून राहण्याचा धडा दिला आहे. निसर्गाचे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी आहे. सोबतच स्वच्छतेचे पालन करण्याचा धडाही या आपत्तीमधून मिळाला आहे. तो कायम ठेवण्याची गरज आहे.
अदृश्य विषाणूचे गाव, शहरांना काटेरी कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST
देशात उद्भवलेल्या कोरोना या अदृश्य विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशातील नागरिकांना सळो की पळो करून सोडले. सर्व नागरिक कोरोनामुळे भयभीत आहे. आत्तापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहे. अनेकांना लागण झाली आहे. महागाव शहर व तालुका या संकटापासून दूर राहील, अशी स्थिती गेल्या १० दिवसांपर्यंत कायम होती. मात्र मुडाणा येथील सराफा व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यूसुद्धा झाला.
अदृश्य विषाणूचे गाव, शहरांना काटेरी कुंपण
ठळक मुद्देकोरोनाचा इफेक्ट, गाव, शहर सील करण्यासाठी काटेरी फांद्यांचा केला जातोय वापर