शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भा नदीचे झाले ‘वाळवंट’

By admin | Updated: March 23, 2015 00:07 IST

तालुक्यातून बारमाही वाहणारी विदर्भा नदी पूर्णत: आटल्याने तिचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. नदीत केवळ वाळू व बेशरमाची झाडेच तेवढी शिल्लक आहे.

वणी : तालुक्यातून बारमाही वाहणारी विदर्भा नदी पूर्णत: आटल्याने तिचे आता वाळवंटात रूपांतर झाले आहे. नदीत केवळ वाळू व बेशरमाची झाडेच तेवढी शिल्लक आहे. त्याचबरोबर नदीकाठाजवळ असलेल्या कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळीही खालावली आहे.विदर्भा नदीच्या भरवशावर नदी काठावरील गावाचे जीवन अवलंबून आहे. मात्र यावर्षी विदर्भा नदीची पातळी पूर्णत: खालावल्याने नदीमध्ये केवळ पाण्याचे डबकेच शिल्लक राहिले आहे. या विदर्भा नदीवरून अनेक गावांत नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र नदीमध्ये पाणीच शिल्लक नसल्याने बहुतांश गावांमध्ये एक दिवसाआड पाण्याच्या पुरवठा करण्यात येत आहे. या नदीच्या काठावर कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण व घोन्सा खुली कोळसा खाण अशा दोन खाणी आहेत. या दोन खाणींमधून दररोज हजारो टन कोळसा काढला जात आहे. त्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. परिणामी नदी काठावरील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.विशेष म्हणजे गाव-खेड्यात असणाऱ्या अनेक बोअरवेललाही पाणी येत नाही. या बोअरवेलजवळ महिला पाण्यासाठी तास न् तास उभ्या राहून मिळेल तेवढे पाणी घेऊन जाताना दिसत आहे. पूर्वी याच बोअरवेलमधून पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र गेल्या वर्षीपासून ही परिस्थिती बदलली आहे. बोअरवेलची पातळी खालावल्याने बोअरवेलमधून पाणी बाहेर येण्यासाठी किमान १० मिनीटे वेळ लागतो. परिणामी महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. एक तर नळाचे पाणीही जास्त वेळ राहत नाही. त्यात महावितरणचे भारनियमनही असते. अनेकदा महिला शेतात गेल्यावर दुपारी नळ सोडण्यात येत असल्याने ते पाणी केवळ रस्त्याने वाहताना दिसत आहे. या नदीचे गेल्या कित्येक दिवसांपासून खोलीकरणही करण्यात आले नाही. सोबतच नदीमध्ये बेशरमाची झाडे, लव्हाळे, झुडूपे वाढली आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासही अडथळा निर्माण होत आहे. बेशरमाची झाडे आता पुलाच्या बरोबरीने वाढली आहे. ती झाडे काढण्यास संबंधित ग्रामपंचायती अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नदीतील पाणी आटल्याने जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वीच कोरड्या दुष्काळाने मेटाकुटीस आलेले शेतकरी आता पाण्याच्या टंचाईने त्रस्त झाले आहे. यावर्षी अल्प पाऊस पडल्याने नदीत सध्या पाणीच उरलेले नाही. (कार्यालय प्रतिनिधी)