शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

पावसाच्या हुलकावणीने बळीराजा चिंतेत

By admin | Updated: August 20, 2014 23:48 IST

यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त

पुसद : यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा पूर्णपणे कोरडा गेला. आसुसलेल्या जमिनीवर पावसाचा थेंब नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासाठी व्याकुळ झालेलं रान मात्र अचानक मुकं झालयं. बळीराजा उद्ध्वस्त आयुष्याला सावरण्याची गणित मांडत असतानाच पाऊस मात्र सतत हुलकावणी देतोय.सावकार, बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करताहेत. कसे तरी महागड ेबियाणे आणले. काहींनी जमिनीच्या पोटात टाकलय. पण पावसाचा पत्ता नाही. सावकार, सरकार, बोगस बियाणे यांच्या जुलुमी पाशात अडकलेला शेतकरी पावसाची वाट पाहतोय. पण निसर्गही त्यांच्यावर कोपलाय. मनामध्ये हिरव्या स्वप्नाचे जाळे विणत असताना ते बेईमान फसवे ढग येतात. अन् वाकुल्या दाखवून निघून जातात. कोरड्या ढगांची कोरडी सहानुभूती मनावर खोलवर वार करत आहे. पावसाचे हे धक्कातंत्र खरेच अनाकलनीय! पाणी टंचाईच्या भीतीने सर्वजण व्याकुळ झाले आहे. ढगांचा हा नकली चेहरा आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर पावसात पेरणी करीत आहे.परिसरात नदी, नाले, ओढे, विहिरी कोरड्या पडत चालल्या आहेत. त्यात भरीस भर शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त आयुष्यावर हसणारे ढग हा अनुभव गेल्या एक महिन्यापासून येत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपाच्या मोठ्या प्रमाणात उलटल्या आहेत. रोहिणी, मृग कोरडा गेला. नंतर थोडाफार पाऊस झाला. शेतकरी खूश झाला. पण हा आनंद क्षणभंगूर ठरला. आकाशात ढगांचे राज्य दिसते. आता खैर नाही. पाऊस वचपा काढणार. टपोर थेंबानी झोडपून काढणार अशा कल्पना मनात रेंगाळत असतानाच हवेच्या झोताने तो दूर कुठे निघून गेला कळलच नाही. (तालुका प्रतिनिधी)