शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

डॉक्टरांच्या ‘तू तू-मै मै’मध्ये गेला तीन रुग्णांचा बळी; संतप्त नातेवाईकांचा कारवाईसाठी ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 17:25 IST

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्रपाळीत कामावर असलेल्या दोन डॉक्टरांनी आपसात वाद घातला. या वादात चक्क एका रुग्णाचा जीव गेला. त्याच वेळी इतर दोन रुग्णही दगावले.

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्रपाळीत कामावर असलेल्या दोन डॉक्टरांनी आपसात वाद घातला. या वादात चक्क एका रुग्णाचा जीव गेला. त्याच वेळी इतर दोन रुग्णही दगावले. हा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर घडला. या गंभीर प्रकाराने संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्यासाठी आंदोलन केले. अखेर वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय घडी विस्कटली आहे. येथील डॉक्टरांवर, नर्सेसवर कुणाचा अंकुश नाही, त्यामुळेच गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णावर उपचार करण्याऐवजी चक्क तो माझा रुग्ण नाही, असे म्हणत हेटाळणी करण्यात आली. यात या रुग्णाचा जीव गेला. संजय विलास दरांडे (१६) रा. शिवाजीनगर लोहारा असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. यासोबतच इतर दोन रुग्णही दगावले. मात्र ते वयोवृद्ध असल्याने त्यांच्या मृत्यूबाबत तक्रारी झाल्या नाहीत.

संजय दरांडे याला सिकलसेल हा आजार होता. त्याची प्रकृती बरी नसल्याने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता संजयला त्याची आई रत्नमाला दरांडे यांनी शासकीय रुग्णालयात आणले. येथे मेडिसीन व सर्जरी या दोन विभागातील डॉक्टरांनी वाद सुरू केला. मेडिसीन विभागातील डॉक्टर हा रुग्ण आमचा नसून त्याला सर्जरी वार्डात दाखल करा असे म्हणू लागले. तर सर्जरी वॉर्डातील डॉक्टरांनी आम्ही सिकलसेल असलेल्या रुग्णावर उपचार करूच शकत नाही, त्याचा येथे मृत्यू होईल, असे सांगून हात वर केले. दोन्ही विभागातील डॉक्टरांची टोलवाटोलवी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. यातच संजयला रक्ताची उलटी झाली. त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली. सकाळी त्याचा उपचाराअभावीच रुग्णालयात मृत्यू झाला.

याच वादात दोन इतर रुग्णही दगावले. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला. दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संजयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्याची आई रत्नमाला विलास दरांडे व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश बेलोकर यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे व शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी दरांडे कुटुंबीयांची भेट घेतली. दोषी डॉक्टरांविरोधात सात दिवसात कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांनी त्यावर अंत्यसंस्कार केले.

 

हे प्रकरण अतिशय गंभीर असून न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुखांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही गय करण्यात येणार नाही.

- डॉ. मिलिंद कांबळे,

अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

टॅग्स :Deathमृत्यू