शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

पशुचिकित्सालय डॉक्टरांविना

By admin | Updated: June 29, 2015 00:22 IST

तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे.

पशुंवर उपचारच नाही : दवाखान्याची इमारत बनली शोभेची वास्तूदारव्हा : तालुक्यातील शेतीला प्रमुख पूरक व्यवसाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व असंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा पशुपालन व्यवसाय सध्या धोक्यात आला आहे. तालुक्यात मोठ्या संख्येने जनावरे असतानादेखील त्यांच्यावर उपचाराची मात्र प्रभावी यंत्रणा नाही. याठिकाणी असलेले लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात दोन वर्षांपासून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम जनावरांच्या उपचारावर होत आहे. याठिकाणी पशुवैद्यकीय चिकित्सालयाची विशाल इमारत शासनाने लाखो रुपये खर्चून बांधली आहे. परंतु सध्या ती निरूपयोगी ठरत आहे. दारव्हा तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांश शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे व शेती हिताच्या दृष्टिकोनातून इतर पशु आहेत. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये पशुधन पर्यवेक्षकाकडून जनावरांवर उपचार केले जातात. परंतु शस्त्रक्रियासारख्या बाबींसाठी शेतकरी आपली जनावरे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पशुचिकित्सालयात आणतात. या चिकित्सालयाशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नाही. परंतु या ठिकाणी अपेक्षित असा उपचार पशुंना मिळत नाही. विविध रिक्त पदे, औषधींचा तुटवडा, कर्मचारी मुख्यालयात उपस्थित न राहणे, शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देणे अशा बाबी याठिकाणी नित्याच्याच झाल्या आहेत. वरिष्ठांचा कोणताही वचक नसल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ दिसून येतो. दारव्हा येथील लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात मागील दोन वर्षांपासून सहायक उपायुक्त व पशुधन विकास अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे रिक्त आहेत. येथील रिक्त पदांचा प्रभार घाटंजी व बोरी येथील पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. हे डॉक्टर कधी तरी आठवड्यातून दोन दिवस दारव्हा येथे येतात. परंतु ज्यावेळी शेतकरी आपली जनावरे घेवून रुग्णालयात येतात त्यावेळी मात्र त्यांच्या पशुंना योग्य उपचार मिळत नाही. प्रभारी असलेले वैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडे असलेल्या मुख्य ठिकाणाचे काम प्रथम संपवून सवड मिळाल्यास उर्वरित दिवशी दारव्हा येथे भेट देतात. त्यामुळे तालुक्यातील आजारी जनावरांची आबाळ होत आहे. शिवाय दारव्हा तालुक्यातील १७ उपकेंद्रांपैकी पेकर्डा, लाख, पिंपळखुटा, भांडेगाव या चार उपकेंद्रांवरील पशुधन पर्यवेक्षकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे घटसर्प, एकटांग्या रोगाच्या लसीकरणावरही परिणाम होत आहे. बोथ व भांडेगावला उपकेंद्रासाठी शासकीय इमारत नाही. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातूनच उपकेंद्रांचा कारभार चालविला जात आहे. रिक्त पदांमुळे अनेक ठिकाणी शिपाईच जनावरांना औषधोपचार करीत आहेत. अनेक ठिकाणी उपचारासाठी लागणारे कठडेसुद्धा नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे याकडे कोणतेही लक्ष असल्याचे दिसून येत नाही. (प्रतिनिधी)