यवतमाळ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बदली पात्र कर्मचार्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये प्रचंड अनागोंदी दिसून येते. सेवानवृत्त झालेल्या काही कर्मचार्यांनाही प्रशासकीय बदलीसाठी पात्र असल्याचे त्यामध्ये दाखविण्यात आले आहे. केवळ बदलीची यादी प्रसिद्ध करण्याच्या नादात अनेक चुका यामध्ये ठेवण्यात आल्या आहे.
आरोग्य विभागाने पंचायत समिती स्तरावरून आलेल्या याद्या जशाच्या तशाच जिल्हा कार्यालयात प्रसिद्ध केल्या आहे. या याद्यांमध्ये कुठलाही फेरबदल अथवा क्रमाने तयार करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सेवाज्येष्ठतांच्या यादींमध्ये अनेक उलटफेर आढळून येतात. १५ ते १६ वर्ष सेवा दिलेल्यांची नावे ज्येष्ठतांमध्ये सर्वात शेवटी आहे. तर चार ते पाच वर्षांची सेवा झालेल्यांची नावे वरच्या क्रमांकावर दिसून येतात. हा प्रकार कर्मचार्यांना गोंधळात टाकणारा आहे. अशा यादीवर आक्षेपच कशा पद्धतीने घ्यायचा असा पेच कर्मचार्यांकडून निर्माण झाला आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागाकरिता पाच वर्ष ही कालर्मयादा ठरविली आहे.
यादीमध्ये तीन वर्ष गैरआदिवासी व गैर नक्षलग्रस्त भागात काम केलेल्यांची नावे प्रशासकीय यादीत आहेत, अशा प्रकारे बदली प्रक्रिया झाल्यास कर्मचार्यांना रिक्त होणार्या जागांचा अंदाजच येणार नाही. त्यामुळे ही प्रक्रियाच सुधारित पद्धतीने घेतली जावी, अशी मागणी कर्मचार्यांकडून केली जात आहे.
यापूर्वी २0१३ मध्ये करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेबाबत नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेने आयुक्तांकडे तक्रार केली होती.
याची दखल घेऊन या प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी वाशिम जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. ८ मे रोजी या संपूर्ण प्रक्रियेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात येऊन गेले आहे. आता नव्याने होणारी प्रक्रियासुद्धा अनेक त्रुट्या ठेऊन केली जात आहे. ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणीही कर्मचार्यांकडून केली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)