शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

औद्योगिक भूखंड वितरण प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: May 4, 2017 00:20 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड वितरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती.

११ मे पर्यंत मुदतवाढ : विविध कारणांमुळे उद्योजकांमध्ये निराशा यवतमाळ : गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड वितरण प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. आता यवतमाळसह इतर चार तालुक्यातील एमआयडीसीतील भूखंड वितरणासाठी आवेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु त्याला इच्छुकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आॅनलाईन आवेदन स्वीकारण्याची मुदत ११ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एमआयडीसीतील औद्योगिक भूखंड वाटप बंद होते. आता पाच तालुक्यांत भूखंड वितरण सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज येतील, अशी अपेक्षा होती. परंतु विविध कारणांमुळे इच्छुकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र अपेक्षित अर्ज न आल्याने तसेच यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी पाहता अर्ज करण्यासाठी देण्यात येणारा कालावधी पुरेसा नव्हता. त्यामुळे आता आवेदन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यवतमाळ, कळंब, घाटंजी, महागाव व दारव्हा या पाच एमआयडीसींमधील भूखंडांच्या वितरणासाठी इच्छुकांकडून आवेदन मागविण्यात आले आहे. ११ मे नंतर निविदा पद्धतीने या भूखंडांचे वितरण होणार आहे. यवतमाळ एमआयडीसीतील १६ भूखंडांसाठी आवेदन स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये १५ भूखंड व्यापारी, तर एक औद्योगिक आहे. कळंब एमआयडीसीमध्ये तीन, महागाव एक, दारव्हा एक व घाटंजी येथे एक भूखंड वितरित करायचा आहे. यवतमाळचे १५ व दारव्ह्याचा एक, असे सोळा व्यापारी भूखंड असून इतर सर्व औद्योगिकसाठी आहेत. नोटाबंदीनंतर व्यापार व उद्योगांमध्ये आलेली अस्थिरता अद्याप जागेवर आली नाही. त्यामुळे उद्योजक, व्यापारी व ग्राहकांमध्येही सध्या निराशा दिसून येत आहे. त्याचा फटका नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांनाही बसत आहे. (प्रतिनिधी) अनेकांना महितीच नाही औद्योगिक भूखंड वितरण सुरू झाल्यानंतरही अपेक्षित असा प्रतिसाद या प्रक्रियेला मिळाला नाही. याबाबत काही उद्योजकांची मते जाणून घेतली असता, या प्रक्रियेबाबत माहितीच नसल्याचे सांगण्यात आले. अर्ज करण्यासाठी अतिशय कमी कालावधी, आॅनलाईन प्रक्रिया, डिजिटल सिग्निचर आणि नंतर पुन्हा लिलाव पद्धतीला सामोरे जावे लागणे, या बाबी अनेकांना रूचल्या नाही. भूखंड मिळाल्यानंतर ठरावीक कालावधीत उद्योग सुरू करून तो उत्पादनात न गेल्यास, असा भूखंड एमआयडीसीकडून जप्त होऊ शकतो. त्यातच बाजारातील मंदीमुळेही यवतमाळसारख्या जिल्ह्यात स्थानिक उद्योजकांना नव्याने उद्योग सुरू करणे जिकरीचे ठरत आहे.