शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांच्या टोर्इंगने वाहनधारकांची तारांबळ

By admin | Updated: March 18, 2017 00:45 IST

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रहदारीला अडथळा ठरणारी वाहने टोर्इंग व्हॅनद्वारे उचलून नेण्याचा सपाटा लावला आहे.

चालकांमध्ये संभ्रम : दुकानांसमोर पिवळे पट्टे नाही, नो-पार्किंगची फलके नाही, पार्किंगला जागा नाही, सांगा, वाहने ठेवायची कुठे? यवतमाळ : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रहदारीला अडथळा ठरणारी वाहने टोर्इंग व्हॅनद्वारे उचलून नेण्याचा सपाटा लावला आहे. परंतु ही टोर्इंग व्हॅन ग्रामीण भागातून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण यवतमाळ शहरात वाहनांसाठी पार्किंगची खास जागा नाही, वाहने कुठे पार्क करू नये याची फलके लागलेली नाहीत, शिवाय दुकानांसमोर वाहनांच्या पार्किंगसाठीचे पट्टेही ओढलेले नाहीत. त्यामुळेच ग्रामीण वाहनधारकांचा गोंधळ उडून त्यांना वाहतूक शाखेच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने टोर्इंगद्वारे वाहने ुउचलण्याच्या सुरू केलेल्या कारवाईचे ग्रामीण जनतेकडून स्वागतच होत आहे. परंतु या कारवाईपूर्वी वाहतूक शाखेने आधी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. शहरात पार्किंगसाठी पुरेशी व जवळची जागा उपलब्ध करून द्यावी, तेथे वाहने सुरक्षित राहतील याची हमी घ्यावी, नो-पार्किंगचे ठिकठिकाणी फलक लावावे, बाजारपेठेत दुकानांपुढे वाहनांच्या पार्किंगसाठी रंगीत पट्टे ओढले जावे, कारवाई करताना गरीब-श्रीमंत असा भेदाभेद करू नये, अशी या ग्रामीण वाहनधारकांची मागणी आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची आपबिती वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कारवाईचा फटका बसलेल्या आर्णी येथील अक्षय व दारव्हा येथील शैलेष या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली आपबिती गुरुवारी सायंकाळी ‘लोकमत’कडे कथन केली. वाहतूक शाखेने मोहीम उघडली असली तरी त्यांना त्यासाठी यवतमाळ नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा सूर वाहतूक कर्मचाऱ्यांमधूनच ऐकायला मिळतो आहे. प्रतिष्ठीतांच्या वाहनांकडे डोळेझाक वाहतूक पोलीस ग्रामीण भागातील गोरगरीब वाहनधारकांना, परवानाधारक विद्यार्थ्यांना अधिकाधिक दंड देतात तर दुसरीकडे प्रतिष्ठीतांची वाहने नो-पार्किंगच्या फलकासमोर उभी असूनही सर्रास सोडून दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. वर्षभराच्या चलान, महसूल व केसेसचे टार्गेट वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवून दिले जात असल्याने व त्यात दरवर्षी प्रचंड वाढ होत असल्याने वाहतूक पोलीस आधीच त्रस्त आहे. आता मार्च एन्डींगमुळे टार्गेट पूर्ण करायचे असल्याने या पोलिसांचा वाहनधारकांना अडविण्याचा जोर वाढला आहे. चालकाला उतरवून वाहन जप्त शुक्रवारी दुपारी तर इंदिरा गांधी मार्केट परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटरसायकल चालकाला त्याच्या वाहनावरून उतरुन देऊन त्याचे वाहन टोर्इंगद्वारे जप्त केले गेल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर व्यक्तीची पत्नी खरेदीसाठी दुकानात गेली होती आणि तो वाहनावर बसून त्या दुकानापुढे प्रतीक्षा करीत असताना त्याचे वाहन वाहतूक पोलिसांनी त्याला उतरवून देत ट्रकमध्ये जप्त केले. या अजब कारवाईने उपस्थित सर्वच जण अचंबित झाले. हॉकर्स-फेरीवाल्याचे काय? एकीकडे वाहतूक पोलीस शिस्तीच्या नावाखाली थोडीशी रस्त्यावर आलेली वाहने सर्रास टोर्इंग करून उचलून नेत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ शहराच्या प्रमुख बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्स फेरीवाल्यांच्या फळे, भाजी व अन्य वस्तूंच्या लागलेल्या गाड्या अर्ध्या रस्त्यावर आलेल्या आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई करणे टाळले जात आहे. यवतमाळ शहरातच नव्हे तर लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातही हे चित्र पाहायला मिळते. रस्त्यावरील या विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यावरील हे अतिक्रमण वाहतूक पोलीस, नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. (प्रतिनिधी) कार्यकर्त्यांसाठी नेत्यांचा राहतो दबाव वाहन पकडल्यास व तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यास त्याचे वाहन सोडावे म्हणून बड्या-बड्या नेते मंडळींकडून वाहतूक पोलिसांनाच वाहन सोडण्यासाठी दमदाटी केली जात असल्याची माहिती आहे. वास्तविक या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाहन चालविण्याची, परवाना, वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवण्याबाबतची शिस्त लावणे अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी ही नेते मंडळी पोलिसांवर वाहन सोडण्यासाठी दबाव आणून आपल्याच कार्यकर्त्यांची शिस्त आणखी बिघडवित असल्याचा सूर पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळतो आहे.