शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

मुलांच्या शिक्षणासाठी साजेगावचे पालक झाले ‘वासुदेव’

By admin | Updated: February 21, 2017 01:23 IST

भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती.

पुलाचा अभाव : कंबरभर पाण्यातून दररोज प्रवास, वघुळ शिवारातील शेती कसणेही झाले कठीण, दोनशे कुटुंबांची फरपट मुकेश इंगोले दारव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती. एका पित्याची महाभारतातील हीच धडपड आता दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील पालकांच्या दररोज नशिबी आली आहे. मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी अडाण नदी पार करताना चक्क कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर घेऊन जावे लागते. दररोजचा हा शिक्षणाचा प्रवास पालकांच्या नशिबी असून पालक आणि चिमुकल्याचा जीवही धोक्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत अडाण नदीवर पूल बांधला नाही. दारव्हा तालुक्यातील अडाण नदीच्या तीरावर साजेगाव आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील शेती मात्र नदीच्या पैलतीरावर वघूळ शिवारात आहे. शेती कसणे अडचणीचे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वघूळ गावाजवळच आश्रय घेतला. आज त्या ठिकाणी दोनशे लोकवस्तीची वसाहत आहे. शेतीची समस्या सुटली. मात्र मुलांच्या शिक्षणाची समस्या मात्र निर्माण झाली. नदीच्या पैलतीरावर असलेल्या शाळेत पोहोचविण्यासाठी पूल नसल्याचा मोठा अडथळा येऊ लागला. यावर पालकांनी उपाय काढला. कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर बसवून साजेगावच्या शाळेत नेऊन सोडतात. सायंकाळी मुलांना याच पद्धतीने घेऊनही येतात. काही जणांनी तात्पुरती होडी तयार केली आहे. परंतु या होडीवर तोल जाण्याची भीती असते. चिमुकल्यांचे काही बरे वाईट नको म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवूनच नदी पार करतात. गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पूर्वी या नदी पात्राला पावसाळ्यातच पाणी रहायचे. मात्र २५ वर्षापूर्वी अडाणवर म्हसनी येथे मध्यम प्रकल्प झाला. त्यामुळे सिंचन व इतर कारणाने प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे १२ ही महिने ही नदी खळखळून वाहते. त्यामुळेच मोठी अडचण झाली आहे. मात्र पूल बांधण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. गावातील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना पुलासाठी साकडे घातले. परंतु कुणीही दखल घेतली नाही. पावसाळ्यात मिळते सुटी अडाण नदीला पावसाळ्यात पूर आला की, या विद्यार्थ्यांना आठ-आठ दिवस सुटी मिळते. पुराच्या पाण्यातून चिमुकल्यांना घेऊन जायची कुणीही हिंमत करीत नाही. त्यामुळे पालक नाईलाजाने विद्यार्थ्यांना शाळेत नेऊ शकत नाही. नदीचे पाणी कमी होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या वर्गानंतरच शाळा सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत पाठवित आहे. तर दुसरीकडे साजेगावात विद्यार्थ्यांची इच्छा असूनही पुलाअभावी शिक्षण सुटण्याची भीती आहे. पुलाच्या मागणीसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र केवळ आश्वासनापलिकडे काहीही झाले नाही. एवढ्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने गावामध्ये प्रचंड नाराजी आहे. - राजू जाधव, साजेगाव