शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

मुलांच्या शिक्षणासाठी साजेगावचे पालक झाले ‘वासुदेव’

By admin | Updated: February 21, 2017 01:23 IST

भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती.

पुलाचा अभाव : कंबरभर पाण्यातून दररोज प्रवास, वघुळ शिवारातील शेती कसणेही झाले कठीण, दोनशे कुटुंबांची फरपट मुकेश इंगोले दारव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती. एका पित्याची महाभारतातील हीच धडपड आता दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील पालकांच्या दररोज नशिबी आली आहे. मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी अडाण नदी पार करताना चक्क कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर घेऊन जावे लागते. दररोजचा हा शिक्षणाचा प्रवास पालकांच्या नशिबी असून पालक आणि चिमुकल्याचा जीवही धोक्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत अडाण नदीवर पूल बांधला नाही. दारव्हा तालुक्यातील अडाण नदीच्या तीरावर साजेगाव आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील शेती मात्र नदीच्या पैलतीरावर वघूळ शिवारात आहे. शेती कसणे अडचणीचे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वघूळ गावाजवळच आश्रय घेतला. आज त्या ठिकाणी दोनशे लोकवस्तीची वसाहत आहे. शेतीची समस्या सुटली. मात्र मुलांच्या शिक्षणाची समस्या मात्र निर्माण झाली. नदीच्या पैलतीरावर असलेल्या शाळेत पोहोचविण्यासाठी पूल नसल्याचा मोठा अडथळा येऊ लागला. यावर पालकांनी उपाय काढला. कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर बसवून साजेगावच्या शाळेत नेऊन सोडतात. सायंकाळी मुलांना याच पद्धतीने घेऊनही येतात. काही जणांनी तात्पुरती होडी तयार केली आहे. परंतु या होडीवर तोल जाण्याची भीती असते. चिमुकल्यांचे काही बरे वाईट नको म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवूनच नदी पार करतात. गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पूर्वी या नदी पात्राला पावसाळ्यातच पाणी रहायचे. मात्र २५ वर्षापूर्वी अडाणवर म्हसनी येथे मध्यम प्रकल्प झाला. त्यामुळे सिंचन व इतर कारणाने प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे १२ ही महिने ही नदी खळखळून वाहते. त्यामुळेच मोठी अडचण झाली आहे. मात्र पूल बांधण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. गावातील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना पुलासाठी साकडे घातले. परंतु कुणीही दखल घेतली नाही. पावसाळ्यात मिळते सुटी अडाण नदीला पावसाळ्यात पूर आला की, या विद्यार्थ्यांना आठ-आठ दिवस सुटी मिळते. पुराच्या पाण्यातून चिमुकल्यांना घेऊन जायची कुणीही हिंमत करीत नाही. त्यामुळे पालक नाईलाजाने विद्यार्थ्यांना शाळेत नेऊ शकत नाही. नदीचे पाणी कमी होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या वर्गानंतरच शाळा सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत पाठवित आहे. तर दुसरीकडे साजेगावात विद्यार्थ्यांची इच्छा असूनही पुलाअभावी शिक्षण सुटण्याची भीती आहे. पुलाच्या मागणीसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र केवळ आश्वासनापलिकडे काहीही झाले नाही. एवढ्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने गावामध्ये प्रचंड नाराजी आहे. - राजू जाधव, साजेगाव