शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या शिक्षणासाठी साजेगावचे पालक झाले ‘वासुदेव’

By admin | Updated: February 21, 2017 01:23 IST

भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती.

पुलाचा अभाव : कंबरभर पाण्यातून दररोज प्रवास, वघुळ शिवारातील शेती कसणेही झाले कठीण, दोनशे कुटुंबांची फरपट मुकेश इंगोले दारव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती. एका पित्याची महाभारतातील हीच धडपड आता दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील पालकांच्या दररोज नशिबी आली आहे. मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी अडाण नदी पार करताना चक्क कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर घेऊन जावे लागते. दररोजचा हा शिक्षणाचा प्रवास पालकांच्या नशिबी असून पालक आणि चिमुकल्याचा जीवही धोक्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत अडाण नदीवर पूल बांधला नाही. दारव्हा तालुक्यातील अडाण नदीच्या तीरावर साजेगाव आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील शेती मात्र नदीच्या पैलतीरावर वघूळ शिवारात आहे. शेती कसणे अडचणीचे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वघूळ गावाजवळच आश्रय घेतला. आज त्या ठिकाणी दोनशे लोकवस्तीची वसाहत आहे. शेतीची समस्या सुटली. मात्र मुलांच्या शिक्षणाची समस्या मात्र निर्माण झाली. नदीच्या पैलतीरावर असलेल्या शाळेत पोहोचविण्यासाठी पूल नसल्याचा मोठा अडथळा येऊ लागला. यावर पालकांनी उपाय काढला. कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर बसवून साजेगावच्या शाळेत नेऊन सोडतात. सायंकाळी मुलांना याच पद्धतीने घेऊनही येतात. काही जणांनी तात्पुरती होडी तयार केली आहे. परंतु या होडीवर तोल जाण्याची भीती असते. चिमुकल्यांचे काही बरे वाईट नको म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवूनच नदी पार करतात. गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पूर्वी या नदी पात्राला पावसाळ्यातच पाणी रहायचे. मात्र २५ वर्षापूर्वी अडाणवर म्हसनी येथे मध्यम प्रकल्प झाला. त्यामुळे सिंचन व इतर कारणाने प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे १२ ही महिने ही नदी खळखळून वाहते. त्यामुळेच मोठी अडचण झाली आहे. मात्र पूल बांधण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. गावातील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना पुलासाठी साकडे घातले. परंतु कुणीही दखल घेतली नाही. पावसाळ्यात मिळते सुटी अडाण नदीला पावसाळ्यात पूर आला की, या विद्यार्थ्यांना आठ-आठ दिवस सुटी मिळते. पुराच्या पाण्यातून चिमुकल्यांना घेऊन जायची कुणीही हिंमत करीत नाही. त्यामुळे पालक नाईलाजाने विद्यार्थ्यांना शाळेत नेऊ शकत नाही. नदीचे पाणी कमी होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या वर्गानंतरच शाळा सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत पाठवित आहे. तर दुसरीकडे साजेगावात विद्यार्थ्यांची इच्छा असूनही पुलाअभावी शिक्षण सुटण्याची भीती आहे. पुलाच्या मागणीसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र केवळ आश्वासनापलिकडे काहीही झाले नाही. एवढ्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने गावामध्ये प्रचंड नाराजी आहे. - राजू जाधव, साजेगाव