शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’ची वाटचाल अधोगतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:01 IST

‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशेतकºयांची कामधेनू : भाडेतत्त्वाच्या निर्णयाने उलटसुलट चर्चा

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावर सुरू असलेला हा कारखाना आता लवकरच खासगी व्यवस्थापनाच्या ताब्यात जाईल आणि तेथून कधी विक्री होईल, हेही शेतकºयांना कळणार नाही. काँग्रेसकडून कारखाना भाजपाने ताब्यात घेऊन या कारखान्याला आगीतून फुफाट्यातच टाकले आहे.शेतकºयांच्या घामातून आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना उभा राहिला. १९६९ सालापासून या कारखन्याच्या चिमणीतून अविरत धूर निघत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी या कारखान्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी हा कारखाना ‘लाईफलाईन’ ठरला. शेकडो कामगार, अधिकारी यांना प्रत्यक्ष तर हजारो हातांना या कारखान्यामुळे काम मिळाले. प्रगतीचे शिखरे गाठत या भागातील शेतकºयांनी आपली उन्नती साधली. साखर कारखाना म्हणजे या भागासाठी कामधेनू ठरला.परंतु सहकारातील राजकारण येथेही आडवे आले. कारखाना हळूहळू आर्थिक डबघाईस जावू लागला. परंतु कारखाना वाचला तरच शेतकरी जगेल, या भूमिकेतून कारखान्याची चाके फिरती ठेवली. परंतु गत दोन वर्षांपासून कारखाना अधिकच आर्थिक टंचाईच्या गर्तेत सापडला. गत वर्षी तर केवळ २५ हजार टन एवढे निच्चांकी गाळप करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. त्यातच ३० महिन्यांपासून कामगारांचे वेतन नाही. कारखाना सुरू कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच सत्ताधारी भाजपाच्या ताब्यात कारखाना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांना अध्यक्षपदावरून हटवून भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. भाजपा सरकार कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देईल, अशी आशा होती. पंरतु सुमारे १०० कोटी कर्ज असलेल्या कारखान्याच्या थकहमीसाठी शासनाने हात वर केले. कर्ज हवे असेल तर संचालक मंडळाने आपल्या मालमत्तेचे गहाणखत करून द्यावे, असा प्रस्ताव पुढे ठेवला. परंतु कारखान्याच्या हिताच्या गोष्टी करणाºया संचालक मंडळातील कुणालाही हा प्रस्ताव पचनी पडला नाही. अखेर पुसदच्या विश्रामगृहावर बुधवारी संचालक मंडळाची सभा झाली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेला ‘वसंत’ हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. परंतु आता हा मानही लवकरच हिरावला जाणार आहे. कारखाना कुण्यातरी बड्या कारखानदाराला भाडेतत्त्वावर दिला जाईल. त्यानंतर हळूच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याची झालेल्या अवस्थेसारखी त्याचीही अवस्था होईल. कुणी तरी साखर सम्राट हा कारखाना विकत घेईल आणि शेतकºयांची कामधेनू साखर सम्राटाच्या दावणीला बांधली जाईल. साखर कारखाना जगवायचा असेल तर सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. कारखाना एकदा भाडेतत्त्वावर गेला की शेतकºयांचे कुणी ऐकणार नाही. कामगारांना कुणी उभे करणार नाही. पुष्पवंती अर्थात सुधाकर नाईक साखर कारखान्याच्या कामगारांचे जसे सध्या हाल सुरू आहे, त्याच वाटेवर येथील कामगारही जातील.