शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘वसंत’ची वाटचाल अधोगतीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:01 IST

‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशेतकºयांची कामधेनू : भाडेतत्त्वाच्या निर्णयाने उलटसुलट चर्चा

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : ‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावर सुरू असलेला हा कारखाना आता लवकरच खासगी व्यवस्थापनाच्या ताब्यात जाईल आणि तेथून कधी विक्री होईल, हेही शेतकºयांना कळणार नाही. काँग्रेसकडून कारखाना भाजपाने ताब्यात घेऊन या कारखान्याला आगीतून फुफाट्यातच टाकले आहे.शेतकºयांच्या घामातून आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना उभा राहिला. १९६९ सालापासून या कारखन्याच्या चिमणीतून अविरत धूर निघत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी या कारखान्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी हा कारखाना ‘लाईफलाईन’ ठरला. शेकडो कामगार, अधिकारी यांना प्रत्यक्ष तर हजारो हातांना या कारखान्यामुळे काम मिळाले. प्रगतीचे शिखरे गाठत या भागातील शेतकºयांनी आपली उन्नती साधली. साखर कारखाना म्हणजे या भागासाठी कामधेनू ठरला.परंतु सहकारातील राजकारण येथेही आडवे आले. कारखाना हळूहळू आर्थिक डबघाईस जावू लागला. परंतु कारखाना वाचला तरच शेतकरी जगेल, या भूमिकेतून कारखान्याची चाके फिरती ठेवली. परंतु गत दोन वर्षांपासून कारखाना अधिकच आर्थिक टंचाईच्या गर्तेत सापडला. गत वर्षी तर केवळ २५ हजार टन एवढे निच्चांकी गाळप करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. त्यातच ३० महिन्यांपासून कामगारांचे वेतन नाही. कारखाना सुरू कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच सत्ताधारी भाजपाच्या ताब्यात कारखाना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांना अध्यक्षपदावरून हटवून भाजपाचे अ‍ॅड.माधवराव माने अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. भाजपा सरकार कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देईल, अशी आशा होती. पंरतु सुमारे १०० कोटी कर्ज असलेल्या कारखान्याच्या थकहमीसाठी शासनाने हात वर केले. कर्ज हवे असेल तर संचालक मंडळाने आपल्या मालमत्तेचे गहाणखत करून द्यावे, असा प्रस्ताव पुढे ठेवला. परंतु कारखान्याच्या हिताच्या गोष्टी करणाºया संचालक मंडळातील कुणालाही हा प्रस्ताव पचनी पडला नाही. अखेर पुसदच्या विश्रामगृहावर बुधवारी संचालक मंडळाची सभा झाली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेला ‘वसंत’ हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. परंतु आता हा मानही लवकरच हिरावला जाणार आहे. कारखाना कुण्यातरी बड्या कारखानदाराला भाडेतत्त्वावर दिला जाईल. त्यानंतर हळूच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याची झालेल्या अवस्थेसारखी त्याचीही अवस्था होईल. कुणी तरी साखर सम्राट हा कारखाना विकत घेईल आणि शेतकºयांची कामधेनू साखर सम्राटाच्या दावणीला बांधली जाईल. साखर कारखाना जगवायचा असेल तर सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. कारखाना एकदा भाडेतत्त्वावर गेला की शेतकºयांचे कुणी ऐकणार नाही. कामगारांना कुणी उभे करणार नाही. पुष्पवंती अर्थात सुधाकर नाईक साखर कारखान्याच्या कामगारांचे जसे सध्या हाल सुरू आहे, त्याच वाटेवर येथील कामगारही जातील.