शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

वसंतराव नाईक जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:28 IST

यवतमाळ : १ जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती. ५ डिसेंबर १९६२ ते १९७५ ...

यवतमाळ : १ जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती. ५ डिसेंबर १९६२ ते १९७५ या दीर्घ कालावधीसाठी महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब. १९६३, १९६७ व १९७२ असे तिनदा बिनविरोध मुख्यमंत्रीपदी निवड होणारे हरित क्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक साहेब. त्यांना जयंतीनिमित्त वंदन.

महानायक वसंतराव नाईक त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे कल्याणकारी लोकनेता, समाजसुधारक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारे, शेतकरी व दीन दुबळ्यांचे, गोर-गरिबांचे दुःख स्वतःचे मानणारे, जनसेवा हाच धर्म मानणारे, शेतकरी व शेतमजुरांचे खरे कैवारी, कुशल प्रशासक, महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते, ग्रामीण भागातील युवकांच्या शिक्षणाची तळमळ असलेले, हळव्या मनाचे सक्षम व्यक्तिमत्त्व, अशा अनेक उपाधीचे जनक ठरले. त्यांच्या कार्यकाळातील शब्द वाक्यांची स्मृती म्हणून काही मोजकेच महत्त्वाचे शब्द ‘वसंतवाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचा प्रत्येक शब्द सूज्ञ माणसाला प्रेरणा देतो.

वसंतराव नाईक शब्दांचे धनी होते. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या काही वाक्यांची आठवण येते. ती वाक्ये पुढीलप्रमाणे आहे.

-- माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. जाती-धर्माच्या नावाखाली त्याला कमी लेखणे ही माणुसकी नाही.

-- शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे.

-- शेती ही उद्योगाची जननी आहे. या देशाची गरिबी दूर करण्याची क्षमता शेतीच्या उद्योगातच आहे.

--समाजातल्या समाजसेवकांची जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही.

-- प्रत्येक माणसाची श्रमशक्ती ही फुकट न जाता ती देशाच्या विकासासाठी लागली पाहिजे.

-- माणसांनी माणसासोबत माणुसकीनेच वागले पाहिजे.

-- लोककल्याणाचे तत्त्वज्ञान जलसंवर्धनाच्या कार्यात ठासून भरले आहे. जलसंवर्धन म्हणजे विकासाच्या अनेक मार्गांची सुरुवात आहे.

-- पाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जलसंवर्धन कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर समाजासाठी व समाजातील प्रत्येक घटकासाठी करण्याची गरज आहे.

-- पाण्याची तहान जशी सर्वांना लागते, तसेच जलसंवर्धनाच्या कामाकरिता सर्वांच्या सहभागाची व सहकार्याची गरज आहे.

-- जर आपल्याला पेटलेल्या पाण्यात अंगाची लाही-लाही होऊन द्यायची नसेल, तर आपण आपल्या जीवनात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धनाकरिता श्रमदान करून घाम गाळला पाहिजे.

-- भूतलावरील कोणत्याही प्रदेशात मानवाला पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. भूमिगत सर्व स्तरातील पाणीसुद्धा पिण्यायोग्य आहे, असे मानणे संयुक्तिक ठरणार नाही.

-- आपण पाण्याने श्रीमंत असलो तरच विकास आणि भौतिक सुख सुविधा शक्य आहे.

बॉक्स

वसंतरावांच हातात महाराष्ट्र सुरक्षित

महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना लोकनेते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, वसंतरावच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे. आता त्यांच्या स्वप्नातील धवलक्रांती व हरित क्रांती गतिमान होण्यासाठी निसर्ग संतुलित असणे आवश्यक आहे. त्याकरिता वृक्षारोपण, वृक्ष संगोपन आणि जलसंवर्धन करणे काळाची गरज आहे. महानायक वसंतराव नाईक यांची आठवण म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व सर्वांनी घर परिसरात वृक्षारोपण केल्यास त्यांची खरी जयंती साजरी होईल.