शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वसंतराव नाईक जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:28 IST

यवतमाळ : १ जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती. ५ डिसेंबर १९६२ ते १९७५ ...

यवतमाळ : १ जुलै रोजी कृषी दिन म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची जयंती. ५ डिसेंबर १९६२ ते १९७५ या दीर्घ कालावधीसाठी महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब. १९६३, १९६७ व १९७२ असे तिनदा बिनविरोध मुख्यमंत्रीपदी निवड होणारे हरित क्रांतीचे जनक, महानायक वसंतराव नाईक साहेब. त्यांना जयंतीनिमित्त वंदन.

महानायक वसंतराव नाईक त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे कल्याणकारी लोकनेता, समाजसुधारक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारे, शेतकरी व दीन दुबळ्यांचे, गोर-गरिबांचे दुःख स्वतःचे मानणारे, जनसेवा हाच धर्म मानणारे, शेतकरी व शेतमजुरांचे खरे कैवारी, कुशल प्रशासक, महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते, ग्रामीण भागातील युवकांच्या शिक्षणाची तळमळ असलेले, हळव्या मनाचे सक्षम व्यक्तिमत्त्व, अशा अनेक उपाधीचे जनक ठरले. त्यांच्या कार्यकाळातील शब्द वाक्यांची स्मृती म्हणून काही मोजकेच महत्त्वाचे शब्द ‘वसंतवाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचा प्रत्येक शब्द सूज्ञ माणसाला प्रेरणा देतो.

वसंतराव नाईक शब्दांचे धनी होते. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या काही वाक्यांची आठवण येते. ती वाक्ये पुढीलप्रमाणे आहे.

-- माणूस हा सर्वप्रथम माणूस आहे. जाती-धर्माच्या नावाखाली त्याला कमी लेखणे ही माणुसकी नाही.

-- शेतकरी सुखी तर देश सुखी. शेतकरी कारखानदार झालाच पाहिजे.

-- शेती ही उद्योगाची जननी आहे. या देशाची गरिबी दूर करण्याची क्षमता शेतीच्या उद्योगातच आहे.

--समाजातल्या समाजसेवकांची जाळे सर्वत्र निर्माण झाल्याशिवाय समाजात चैतन्य व गतिमानता येणार नाही.

-- प्रत्येक माणसाची श्रमशक्ती ही फुकट न जाता ती देशाच्या विकासासाठी लागली पाहिजे.

-- माणसांनी माणसासोबत माणुसकीनेच वागले पाहिजे.

-- लोककल्याणाचे तत्त्वज्ञान जलसंवर्धनाच्या कार्यात ठासून भरले आहे. जलसंवर्धन म्हणजे विकासाच्या अनेक मार्गांची सुरुवात आहे.

-- पाणी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. जलसंवर्धन कोणा एका व्यक्तीसाठी नव्हे, तर समाजासाठी व समाजातील प्रत्येक घटकासाठी करण्याची गरज आहे.

-- पाण्याची तहान जशी सर्वांना लागते, तसेच जलसंवर्धनाच्या कामाकरिता सर्वांच्या सहभागाची व सहकार्याची गरज आहे.

-- जर आपल्याला पेटलेल्या पाण्यात अंगाची लाही-लाही होऊन द्यायची नसेल, तर आपण आपल्या जीवनात जलसंवर्धन, वृक्षसंवर्धनाकरिता श्रमदान करून घाम गाळला पाहिजे.

-- भूतलावरील कोणत्याही प्रदेशात मानवाला पिण्याचे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. भूमिगत सर्व स्तरातील पाणीसुद्धा पिण्यायोग्य आहे, असे मानणे संयुक्तिक ठरणार नाही.

-- आपण पाण्याने श्रीमंत असलो तरच विकास आणि भौतिक सुख सुविधा शक्य आहे.

बॉक्स

वसंतरावांच हातात महाराष्ट्र सुरक्षित

महानायक वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना लोकनेते यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, वसंतरावच्या हातात महाराष्ट्र सुरक्षित आहे. आता त्यांच्या स्वप्नातील धवलक्रांती व हरित क्रांती गतिमान होण्यासाठी निसर्ग संतुलित असणे आवश्यक आहे. त्याकरिता वृक्षारोपण, वृक्ष संगोपन आणि जलसंवर्धन करणे काळाची गरज आहे. महानायक वसंतराव नाईक यांची आठवण म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व सर्वांनी घर परिसरात वृक्षारोपण केल्यास त्यांची खरी जयंती साजरी होईल.