शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

पोफाळीचा ‘वसंत’ही अखेर ‘सुधाकर’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:29 IST

गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देशंभर कोटींच्या कर्जाचा डोंगर : सहकारातील एकमेव साखर कारखानाही देशोधडीला

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. काही वर्षापूर्वी गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानाही अशाच पद्धतीने खाजगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. आता वसंत ही त्याच वाटेवर असून ऊस उत्पादकासह कामगारही देशोधडीला लागणार आहे.शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न पाहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुसद उपविभागात सहकारी साखर कारखान्याची मुहूतमेढ रोवली. १९७२ साली उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना सुरू करण्यात आला. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील गुंज येथे दुसरा साखर कारखाना सुरु झाला. पोफाळीच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे तर गुंजच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांचे नाव देण्यात आले. १९७३ सालापासून पुसद उपविभाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापाºयांना सुगीचे दिवस आले. परंपरागत पीक पद्धत बदलून शेतांमध्ये उसाची लागवड होऊ लागली. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे हा परिसर समृद्ध होऊ लागला. सहकारी तत्त्वावरील या साखर कारखान्याने परिसराचे चित्र बदलविले.परंतु विदर्भातील सहकारी संस्थांची जशी अवस्था झाली तशी या कारखान्यांची झाली. अंतर्गत राजकारण आणि गैरप्रकार यामुळे कारखाने डबघाईस येऊ लागले. काही वर्षापूर्वी सुधाकरराव नाईक साखर कारखाना शिखर बँकेने कर्जापोटी विकला. तो पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने विकत घेतला. हा अनुभव पाठीशी असताना वसंतचे संचालक मंडळ धडा घेतील अशी आशा होती. परंतु त्यातून काहीही न शिकता वसंतचा कारभार अंधाधुंद सुरु राहिला. ४६ वर्षाच्या इतिहासात आर्थिक विपन्नावस्थेने वसंत कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला नाही. कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु कर्जाचा डोंगर असल्याने कुणीही उभे केले नाही. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेकडो कुटुंब देशोधडीला लागले.वसंत सहकारी साखर कारखान्यावर तब्बल १०० कोटींचे कर्ज आहे. त्यात जिल्हा बँकेच्या ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी बुधवारी जिल्हा बँकेने कारखाना आपल्या ताब्यात घेतला. दुसरीकडे कामगारांच्या ३० महिन्याच्या वेतनाचे १३ कोटी रुपये थकीत आहे. आता कारखाना सुरु होणार काय ?, कामगारांचे वेतन मिळणार काय ?, ऊस उत्पादकांचे केन पेमेंट कधी मिळणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हा कारखाना बंद पडल्याने हिरावला आहे.‘वसंत’चा वापर खासगी मालकीसारखावसंत सहकारी साखर कारखान्याचा सुरूवातीचा काळ वगळला तर अलीकडच्या काळातील संचालक मंडळाने या कारखान्याचा वापर खाजगी मालकीसारखाच केला. राजकीय आखाडा करून या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांनी चांगभलं करून घेतलं. कारखाना कर्जात दबत असतानाही कर्ज फेडण्यासाठी उपाय योजना झाल्या नाहीत. उलट कारखान्याची मालमत्ता गहाण ठेऊन नवीन कर्ज मिळविले. मात्र या कर्जाच्या परतफेडीचा गांभीर्याने विचारच झाला नाही.

 

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना