शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

पोफाळीचा ‘वसंत’ही अखेर ‘सुधाकर’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:29 IST

गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देशंभर कोटींच्या कर्जाचा डोंगर : सहकारातील एकमेव साखर कारखानाही देशोधडीला

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. काही वर्षापूर्वी गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानाही अशाच पद्धतीने खाजगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. आता वसंत ही त्याच वाटेवर असून ऊस उत्पादकासह कामगारही देशोधडीला लागणार आहे.शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न पाहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुसद उपविभागात सहकारी साखर कारखान्याची मुहूतमेढ रोवली. १९७२ साली उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना सुरू करण्यात आला. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील गुंज येथे दुसरा साखर कारखाना सुरु झाला. पोफाळीच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे तर गुंजच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांचे नाव देण्यात आले. १९७३ सालापासून पुसद उपविभाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापाºयांना सुगीचे दिवस आले. परंपरागत पीक पद्धत बदलून शेतांमध्ये उसाची लागवड होऊ लागली. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे हा परिसर समृद्ध होऊ लागला. सहकारी तत्त्वावरील या साखर कारखान्याने परिसराचे चित्र बदलविले.परंतु विदर्भातील सहकारी संस्थांची जशी अवस्था झाली तशी या कारखान्यांची झाली. अंतर्गत राजकारण आणि गैरप्रकार यामुळे कारखाने डबघाईस येऊ लागले. काही वर्षापूर्वी सुधाकरराव नाईक साखर कारखाना शिखर बँकेने कर्जापोटी विकला. तो पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने विकत घेतला. हा अनुभव पाठीशी असताना वसंतचे संचालक मंडळ धडा घेतील अशी आशा होती. परंतु त्यातून काहीही न शिकता वसंतचा कारभार अंधाधुंद सुरु राहिला. ४६ वर्षाच्या इतिहासात आर्थिक विपन्नावस्थेने वसंत कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला नाही. कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु कर्जाचा डोंगर असल्याने कुणीही उभे केले नाही. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेकडो कुटुंब देशोधडीला लागले.वसंत सहकारी साखर कारखान्यावर तब्बल १०० कोटींचे कर्ज आहे. त्यात जिल्हा बँकेच्या ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी बुधवारी जिल्हा बँकेने कारखाना आपल्या ताब्यात घेतला. दुसरीकडे कामगारांच्या ३० महिन्याच्या वेतनाचे १३ कोटी रुपये थकीत आहे. आता कारखाना सुरु होणार काय ?, कामगारांचे वेतन मिळणार काय ?, ऊस उत्पादकांचे केन पेमेंट कधी मिळणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हा कारखाना बंद पडल्याने हिरावला आहे.‘वसंत’चा वापर खासगी मालकीसारखावसंत सहकारी साखर कारखान्याचा सुरूवातीचा काळ वगळला तर अलीकडच्या काळातील संचालक मंडळाने या कारखान्याचा वापर खाजगी मालकीसारखाच केला. राजकीय आखाडा करून या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांनी चांगभलं करून घेतलं. कारखाना कर्जात दबत असतानाही कर्ज फेडण्यासाठी उपाय योजना झाल्या नाहीत. उलट कारखान्याची मालमत्ता गहाण ठेऊन नवीन कर्ज मिळविले. मात्र या कर्जाच्या परतफेडीचा गांभीर्याने विचारच झाला नाही.

 

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना