शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पोफाळीचा ‘वसंत’ही अखेर ‘सुधाकर’च्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 21:29 IST

गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत.

ठळक मुद्देशंभर कोटींच्या कर्जाचा डोंगर : सहकारातील एकमेव साखर कारखानाही देशोधडीला

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत काही वर्षांपासून अखेरच्या घटका मोजत असलेल्या वसंत सहकारी साखर कारखाचा कर्जापोटी जिल्हा बँकेने अखेर ताबा घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना कायमचा बंद होण्याचे संकेत आहेत. काही वर्षापूर्वी गुंजचा सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानाही अशाच पद्धतीने खाजगी व्यवस्थापनाच्या घशात गेला. आता वसंत ही त्याच वाटेवर असून ऊस उत्पादकासह कामगारही देशोधडीला लागणार आहे.शेतकरी कारखानदार झाला पाहिजे असे स्वप्न पाहात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुसद उपविभागात सहकारी साखर कारखान्याची मुहूतमेढ रोवली. १९७२ साली उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना सुरू करण्यात आला. त्या पाठोपाठ महागाव तालुक्यातील गुंज येथे दुसरा साखर कारखाना सुरु झाला. पोफाळीच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे तर गुंजच्या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांचे नाव देण्यात आले. १९७३ सालापासून पुसद उपविभाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. परिसरात आर्थिक समृद्धी आली. ऊस उत्पादक, कामगार, व्यापाºयांना सुगीचे दिवस आले. परंपरागत पीक पद्धत बदलून शेतांमध्ये उसाची लागवड होऊ लागली. मुबलक पाणी, सुपीक जमीन आणि मेहनती शेतकरी यामुळे हा परिसर समृद्ध होऊ लागला. सहकारी तत्त्वावरील या साखर कारखान्याने परिसराचे चित्र बदलविले.परंतु विदर्भातील सहकारी संस्थांची जशी अवस्था झाली तशी या कारखान्यांची झाली. अंतर्गत राजकारण आणि गैरप्रकार यामुळे कारखाने डबघाईस येऊ लागले. काही वर्षापूर्वी सुधाकरराव नाईक साखर कारखाना शिखर बँकेने कर्जापोटी विकला. तो पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखानदाराने विकत घेतला. हा अनुभव पाठीशी असताना वसंतचे संचालक मंडळ धडा घेतील अशी आशा होती. परंतु त्यातून काहीही न शिकता वसंतचा कारभार अंधाधुंद सुरु राहिला. ४६ वर्षाच्या इतिहासात आर्थिक विपन्नावस्थेने वसंत कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला नाही. कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु कर्जाचा डोंगर असल्याने कुणीही उभे केले नाही. त्यामुळे या कारखान्यावर अवलंबून असलेले शेकडो कुटुंब देशोधडीला लागले.वसंत सहकारी साखर कारखान्यावर तब्बल १०० कोटींचे कर्ज आहे. त्यात जिल्हा बँकेच्या ४० कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. या कर्जासाठी बुधवारी जिल्हा बँकेने कारखाना आपल्या ताब्यात घेतला. दुसरीकडे कामगारांच्या ३० महिन्याच्या वेतनाचे १३ कोटी रुपये थकीत आहे. आता कारखाना सुरु होणार काय ?, कामगारांचे वेतन मिळणार काय ?, ऊस उत्पादकांचे केन पेमेंट कधी मिळणार असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हा कारखाना बंद पडल्याने हिरावला आहे.‘वसंत’चा वापर खासगी मालकीसारखावसंत सहकारी साखर कारखान्याचा सुरूवातीचा काळ वगळला तर अलीकडच्या काळातील संचालक मंडळाने या कारखान्याचा वापर खाजगी मालकीसारखाच केला. राजकीय आखाडा करून या कारखान्याच्या माध्यमातून अनेकांनी चांगभलं करून घेतलं. कारखाना कर्जात दबत असतानाही कर्ज फेडण्यासाठी उपाय योजना झाल्या नाहीत. उलट कारखान्याची मालमत्ता गहाण ठेऊन नवीन कर्ज मिळविले. मात्र या कर्जाच्या परतफेडीचा गांभीर्याने विचारच झाला नाही.

 

टॅग्स :Vasant Sugar Factoryवसंत साखर कारखाना