शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: January 3, 2016 02:56 IST

शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

एसडीओंना दिले निवेदन : वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्त्यांनी घेतला होता सहभागवणी : शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा टिळक चौकातून दुपारी १ वाजता निघाला. शासनाच्या विरोधात घोषणा देत शेतकरी, शेतमूजर व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, टागौर चौक, आंबेडकर चौकातून फिरून तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया व वामनराव कासावार यांनी महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी करून दुष्काळ जाहीर करावा, पीक आणेवारीची पद्धत बदलविण्यात यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी, शेतमालाला महागाई निर्देशांकाप्रमाणे भाव द्यावा, सोयाबीनला पाच तर कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्यावा, नवरगाव, बेंबळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे, कालवा दुरूस्त करावा, नवीन सभासदांना जिल्हा बँकेने पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.तसेच वनजमीन कसणाऱ्यांना पट्टे द्यावे, मिरची पिकांवरील रोगाची नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा मंजूर करून त्वरित वाटप करावे, कापसाला प्रति क्विंटल दोन हजार रूपये बोनस द्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करावी, शेतकरी व शेतमजुरांना पेंशन लागू करावी, वणी शहराला नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करावी व शहरातील शासकीय जागेवरील झोपडपट्टींना पट्टे द्यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष अ‍ॅड.देवीदास काळे यांनी केले होते. मोर्चात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, मोरेश्वर पावडे, प्रा.टिकाराम कोंगरे, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, सुनील कातकडे, शरद ठाकरे, संजय खाडे, प्रसाद ठाकरे, गोपाल भदोरीया, भास्कर गोरे, बाबाराव चौधरीसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)