शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वणीत वाहतुकीचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी

वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी तर दररोजच अघोषित ‘चक्का जाम’ची परिस्थिती उद्भवते. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक विभागाला अपयश येत आहे.

वणी शहराचा केंद्रबिंदू असलेल्या टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर तर दिवसभर अनेक वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात अनेक ट्रॅव्हल्सही उभ्या राहात असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचाच भाग झाली आहे. हा मुख्य चौक आहे. याच चौकातून बाहेर गावांतील ग्रामस्थांना शहरात प्रवेश करावा लागतो.

टिळक चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यापैकी एक रस्ता श्रीराम मंदिराकडे, दुसरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे, तिसरा एसपीएम विद्यालयाकडे, चौथा बसस्थानक व यवतमाळकडे, तर पाचवा रस्ता वरोरा-नागपूरकडे जातो. हे सर्वच रस्ते नेहमी गजबजलेले असतात. याच पाचही मार्गावर अनेक मुख्य प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये आहेत. परिणामी या सर्व रस्त्यांवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. अर्थातच टिळक चौकातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र अनेक वाहनधारक या चौकात आल्यानंतर आपली वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी करतात. त्याचा फटका रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.

या चौकात नगरपरिषदेचे कॉम्प्लेक्सही आहे. त्यात अनेक दुकाने लागलेली आहेत. या दुकानांसमोर तर अनेक वाहने आडवी-तिडवी लावलेली असतात. वाहनधारक आपले वाहन रस्त्यावर उभे करून खुशाल दुकानांमध्ये जातात. त्यातील काही वाहने दिवसभर एकाच जागी उभी दिसतात. वाहनधारक निर्धास्त होऊन दुसरीकडे फिरतात. ही वाहने दिवसभर तेथेच उभी असूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नसते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

याच चौकातून वरोरा-चंद्रपूर-नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक आहे. या दुभाजकाच्या एका बाजूला नगरपरिषदेच्या कॉप्म्लेक्समधील दुकाने, तर दुसऱ्या बाजूला आॅटो उभे असतात. त्यातच अनेक वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना तेथून वाहन काढणे कठीण होते. रस्त्यावर दिवसभर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीराम मंदिर चौक, नगरपरिषद परिसर, दीपक टॉकिज आदी परिसरातही वाहतुकीची कोंडी होते. वाहनांचे कर्णकर्कष आवाज नागरिकांच्या कानठळ्या बसवितात. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस त्यांच्या जागेवर दिसतच नाही. वणीसाठी आता स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखा झाल्याने या सर्व प्रकाराला आळा बसेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र पूर्वीच्या स्थितीत आणि आत्ताच्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)