शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

वणीत वाहतुकीचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी

वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी तर दररोजच अघोषित ‘चक्का जाम’ची परिस्थिती उद्भवते. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक विभागाला अपयश येत आहे.

वणी शहराचा केंद्रबिंदू असलेल्या टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर तर दिवसभर अनेक वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात अनेक ट्रॅव्हल्सही उभ्या राहात असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचाच भाग झाली आहे. हा मुख्य चौक आहे. याच चौकातून बाहेर गावांतील ग्रामस्थांना शहरात प्रवेश करावा लागतो.

टिळक चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यापैकी एक रस्ता श्रीराम मंदिराकडे, दुसरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे, तिसरा एसपीएम विद्यालयाकडे, चौथा बसस्थानक व यवतमाळकडे, तर पाचवा रस्ता वरोरा-नागपूरकडे जातो. हे सर्वच रस्ते नेहमी गजबजलेले असतात. याच पाचही मार्गावर अनेक मुख्य प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये आहेत. परिणामी या सर्व रस्त्यांवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. अर्थातच टिळक चौकातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र अनेक वाहनधारक या चौकात आल्यानंतर आपली वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी करतात. त्याचा फटका रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.

या चौकात नगरपरिषदेचे कॉम्प्लेक्सही आहे. त्यात अनेक दुकाने लागलेली आहेत. या दुकानांसमोर तर अनेक वाहने आडवी-तिडवी लावलेली असतात. वाहनधारक आपले वाहन रस्त्यावर उभे करून खुशाल दुकानांमध्ये जातात. त्यातील काही वाहने दिवसभर एकाच जागी उभी दिसतात. वाहनधारक निर्धास्त होऊन दुसरीकडे फिरतात. ही वाहने दिवसभर तेथेच उभी असूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नसते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

याच चौकातून वरोरा-चंद्रपूर-नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक आहे. या दुभाजकाच्या एका बाजूला नगरपरिषदेच्या कॉप्म्लेक्समधील दुकाने, तर दुसऱ्या बाजूला आॅटो उभे असतात. त्यातच अनेक वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना तेथून वाहन काढणे कठीण होते. रस्त्यावर दिवसभर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीराम मंदिर चौक, नगरपरिषद परिसर, दीपक टॉकिज आदी परिसरातही वाहतुकीची कोंडी होते. वाहनांचे कर्णकर्कष आवाज नागरिकांच्या कानठळ्या बसवितात. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस त्यांच्या जागेवर दिसतच नाही. वणीसाठी आता स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखा झाल्याने या सर्व प्रकाराला आळा बसेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र पूर्वीच्या स्थितीत आणि आत्ताच्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)