शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

वणीत वाहतुकीचा उडाला बोजवारा

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी

वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी तर दररोजच अघोषित ‘चक्का जाम’ची परिस्थिती उद्भवते. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक विभागाला अपयश येत आहे.

वणी शहराचा केंद्रबिंदू असलेल्या टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर तर दिवसभर अनेक वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात अनेक ट्रॅव्हल्सही उभ्या राहात असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचाच भाग झाली आहे. हा मुख्य चौक आहे. याच चौकातून बाहेर गावांतील ग्रामस्थांना शहरात प्रवेश करावा लागतो.

टिळक चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यापैकी एक रस्ता श्रीराम मंदिराकडे, दुसरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे, तिसरा एसपीएम विद्यालयाकडे, चौथा बसस्थानक व यवतमाळकडे, तर पाचवा रस्ता वरोरा-नागपूरकडे जातो. हे सर्वच रस्ते नेहमी गजबजलेले असतात. याच पाचही मार्गावर अनेक मुख्य प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये आहेत. परिणामी या सर्व रस्त्यांवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. अर्थातच टिळक चौकातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र अनेक वाहनधारक या चौकात आल्यानंतर आपली वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी करतात. त्याचा फटका रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.

या चौकात नगरपरिषदेचे कॉम्प्लेक्सही आहे. त्यात अनेक दुकाने लागलेली आहेत. या दुकानांसमोर तर अनेक वाहने आडवी-तिडवी लावलेली असतात. वाहनधारक आपले वाहन रस्त्यावर उभे करून खुशाल दुकानांमध्ये जातात. त्यातील काही वाहने दिवसभर एकाच जागी उभी दिसतात. वाहनधारक निर्धास्त होऊन दुसरीकडे फिरतात. ही वाहने दिवसभर तेथेच उभी असूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नसते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.

याच चौकातून वरोरा-चंद्रपूर-नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक आहे. या दुभाजकाच्या एका बाजूला नगरपरिषदेच्या कॉप्म्लेक्समधील दुकाने, तर दुसऱ्या बाजूला आॅटो उभे असतात. त्यातच अनेक वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना तेथून वाहन काढणे कठीण होते. रस्त्यावर दिवसभर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीराम मंदिर चौक, नगरपरिषद परिसर, दीपक टॉकिज आदी परिसरातही वाहतुकीची कोंडी होते. वाहनांचे कर्णकर्कष आवाज नागरिकांच्या कानठळ्या बसवितात. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस त्यांच्या जागेवर दिसतच नाही. वणीसाठी आता स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखा झाल्याने या सर्व प्रकाराला आळा बसेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र पूर्वीच्या स्थितीत आणि आत्ताच्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)