शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

वणीत ‘व्हायरल फ्ल्यू’चे थैमान

By admin | Updated: November 6, 2014 23:04 IST

वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे.

वणी : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.गेल्या महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. ‘व्हायरल फ्ल्यू’ने तर नागरिकांना भंडावून सोडले आहे. लहान बालकांनाही विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुलून गेले आहे. प्रत्येक दवाखान्यात दररोज गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकप्रकारे डॉक्टर मंडळीसाठी पर्वणीच ठरली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, हुडहुडी भरून ताप येणे, आदी आजार तर आता सामान्य झाले आहे. अनेकांना या आजारांची लागण झाली आहे. त्यातूनच मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारांनी डोके वर काढले आहे. अनेकांना रूग्णालयात भरती राहावे लागत आहेत. या आजारांमुळे नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मात्र आरोग्यावर खर्च करणे त्यांना भाग पडत आहे. नाईलाजास्तव अनेकांना कर्ज काढूनही उपचार करवून घ्यावा लागत आहे. शहरातील पॅथॉलॉजीही सध्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. तेथेही रूग्णांची रांग दिसून येत आहे. थुंकी, रक्त, लघवी तपासण्यासाठी रूग्णांची गर्दी उसळत आहे. मात्र आरोग्य विभाग सुस्तच दिसून येत आहे. कागदोपत्री सर्व्हेक्षण मोहीम राबवून उपाययोजना केल्या जात आहे. डास निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत नाही. डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. ग्रामीण भागात काम सुरू असल्याचे मात्र सांगितले जाते. मात्र आरोग्य विभाग नेमके कोणते काम करीत आहे, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही.वणीतील ग्रामीण रूग्णालयातही रूग्णांची प्रचंड गर्दी आहे. रूग्णालयातील तीनही विभाग रूग्णांच्या दाटीवाटीने गजबजून गेले आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या रूग्णालयात प्रसूतीसाठीही अनेक महिला दाखल आहेत. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विविध आजारांच्या थैमानामुळे या बालकांनाही विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज गुरूवारी गुरू नानक जयंतीनिमित्त सुटी असल्याने तर हे रूग्णालय वाऱ्यावरच होते. दुपारी १.३0 पर्यंत वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. मात्र सुटी असल्याने बाह्यरूग्ण विभाग, औषधी वाटप केंद्र बंद होते. गरज पडल्यास ‘आॅन कॉल’ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले जाते, असे तेथे सांगण्यात आले. अर्थात सुटीच्या दिवशी सर्वच रूग्ण वाऱ्यावरच असतात, हे यावरून स्पष्ट झाले. (कार्यालय प्रतिनिधी)