शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वणीत ‘व्हायरल फ्ल्यू’चे थैमान

By admin | Updated: November 6, 2014 23:04 IST

वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे.

वणी : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.गेल्या महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. ‘व्हायरल फ्ल्यू’ने तर नागरिकांना भंडावून सोडले आहे. लहान बालकांनाही विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुलून गेले आहे. प्रत्येक दवाखान्यात दररोज गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकप्रकारे डॉक्टर मंडळीसाठी पर्वणीच ठरली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, हुडहुडी भरून ताप येणे, आदी आजार तर आता सामान्य झाले आहे. अनेकांना या आजारांची लागण झाली आहे. त्यातूनच मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारांनी डोके वर काढले आहे. अनेकांना रूग्णालयात भरती राहावे लागत आहेत. या आजारांमुळे नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मात्र आरोग्यावर खर्च करणे त्यांना भाग पडत आहे. नाईलाजास्तव अनेकांना कर्ज काढूनही उपचार करवून घ्यावा लागत आहे. शहरातील पॅथॉलॉजीही सध्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. तेथेही रूग्णांची रांग दिसून येत आहे. थुंकी, रक्त, लघवी तपासण्यासाठी रूग्णांची गर्दी उसळत आहे. मात्र आरोग्य विभाग सुस्तच दिसून येत आहे. कागदोपत्री सर्व्हेक्षण मोहीम राबवून उपाययोजना केल्या जात आहे. डास निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत नाही. डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. ग्रामीण भागात काम सुरू असल्याचे मात्र सांगितले जाते. मात्र आरोग्य विभाग नेमके कोणते काम करीत आहे, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही.वणीतील ग्रामीण रूग्णालयातही रूग्णांची प्रचंड गर्दी आहे. रूग्णालयातील तीनही विभाग रूग्णांच्या दाटीवाटीने गजबजून गेले आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या रूग्णालयात प्रसूतीसाठीही अनेक महिला दाखल आहेत. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विविध आजारांच्या थैमानामुळे या बालकांनाही विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज गुरूवारी गुरू नानक जयंतीनिमित्त सुटी असल्याने तर हे रूग्णालय वाऱ्यावरच होते. दुपारी १.३0 पर्यंत वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. मात्र सुटी असल्याने बाह्यरूग्ण विभाग, औषधी वाटप केंद्र बंद होते. गरज पडल्यास ‘आॅन कॉल’ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले जाते, असे तेथे सांगण्यात आले. अर्थात सुटीच्या दिवशी सर्वच रूग्ण वाऱ्यावरच असतात, हे यावरून स्पष्ट झाले. (कार्यालय प्रतिनिधी)