शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
3
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
4
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
5
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
6
या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
7
Shopping: शॉपिंग हा खर्च नाही, तर ही आहे तुमच्या भविष्याची खास गुंतवणूक; कशी ते पहा!
8
Test Rankings: आयसीसी टेस्ट क्रमवारीत बुमराहची बादशाहत कायम; मोहम्मद सिराजचेही मोठी झेप!
9
गुंतवणूकदार 'गार', टांगा पलटी घोडे फरार...! बाजारात येताच 40% आपटला शेअर, लोकांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
10
EPFO सदस्यांना मोफत मिळतो लाखो रुपयांचा लाईफ इन्शुरन्स कव्हर! काय आहे EDLI योजना?
11
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
12
Video - देवदूत! भूस्खलनानंतर रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी डॉक्टरने स्वत:चा जीव घातला धोक्यात
13
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
14
खान कुटुंबात आली परी! अरबाज खान लेकीला घेऊन निघाला; रुग्णालयाबाहेरील व्हिडीओ व्हायरल
15
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
16
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
17
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
18
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
19
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
20
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली

वणीत ‘व्हायरल फ्ल्यू’चे थैमान

By admin | Updated: November 6, 2014 23:04 IST

वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे.

वणी : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.गेल्या महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. ‘व्हायरल फ्ल्यू’ने तर नागरिकांना भंडावून सोडले आहे. लहान बालकांनाही विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुलून गेले आहे. प्रत्येक दवाखान्यात दररोज गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकप्रकारे डॉक्टर मंडळीसाठी पर्वणीच ठरली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, हुडहुडी भरून ताप येणे, आदी आजार तर आता सामान्य झाले आहे. अनेकांना या आजारांची लागण झाली आहे. त्यातूनच मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारांनी डोके वर काढले आहे. अनेकांना रूग्णालयात भरती राहावे लागत आहेत. या आजारांमुळे नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मात्र आरोग्यावर खर्च करणे त्यांना भाग पडत आहे. नाईलाजास्तव अनेकांना कर्ज काढूनही उपचार करवून घ्यावा लागत आहे. शहरातील पॅथॉलॉजीही सध्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. तेथेही रूग्णांची रांग दिसून येत आहे. थुंकी, रक्त, लघवी तपासण्यासाठी रूग्णांची गर्दी उसळत आहे. मात्र आरोग्य विभाग सुस्तच दिसून येत आहे. कागदोपत्री सर्व्हेक्षण मोहीम राबवून उपाययोजना केल्या जात आहे. डास निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत नाही. डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. ग्रामीण भागात काम सुरू असल्याचे मात्र सांगितले जाते. मात्र आरोग्य विभाग नेमके कोणते काम करीत आहे, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही.वणीतील ग्रामीण रूग्णालयातही रूग्णांची प्रचंड गर्दी आहे. रूग्णालयातील तीनही विभाग रूग्णांच्या दाटीवाटीने गजबजून गेले आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या रूग्णालयात प्रसूतीसाठीही अनेक महिला दाखल आहेत. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विविध आजारांच्या थैमानामुळे या बालकांनाही विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज गुरूवारी गुरू नानक जयंतीनिमित्त सुटी असल्याने तर हे रूग्णालय वाऱ्यावरच होते. दुपारी १.३0 पर्यंत वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. मात्र सुटी असल्याने बाह्यरूग्ण विभाग, औषधी वाटप केंद्र बंद होते. गरज पडल्यास ‘आॅन कॉल’ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले जाते, असे तेथे सांगण्यात आले. अर्थात सुटीच्या दिवशी सर्वच रूग्ण वाऱ्यावरच असतात, हे यावरून स्पष्ट झाले. (कार्यालय प्रतिनिधी)