शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
3
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
4
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
5
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
6
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
7
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
8
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
9
बाई, हा काय प्रकार... LinkedIn वर फुल-टाइम गर्लफ्रेंडची व्हॅकन्सी, लोक विचारतात सॅलरी किती?
10
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
11
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
12
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
13
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
14
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
15
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
16
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
17
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
18
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
19
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
20
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
Daily Top 2Weekly Top 5

वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

By admin | Updated: February 28, 2017 01:27 IST

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे.

प्रभा मिश्रा : उमरखेड येथे ‘तणावमुक्ती व उपाय’ विषयावर अध्यात्मिक प्रवचन उमरखेड : जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे. हा तणाव दुसऱ्या कुणी निर्माण केला नसून चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले संकट होय. आपल्यातील वहम म्हणजे अनाठायी शंका आणि अहम म्हणजे अहंकार हेच प्रचंड मानसिक तणावाला कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रभाबहण मिश्रा (माऊंटअबू) यांनी केले. येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘तणावमुक्ती एवम् सफलता के पांच कदम’ या विषयावर त्यांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उमरखेड सेवा केंद्रातर्फे हे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिर होत आहे. पहिल्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुख्य प्रवचक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तणावग्रस्त अवस्थेतूनही विचाराने आणि धैर्याने मार्ग काढला पाहिजे. सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीसाठी अविचाराने अवलंबलेल्या मार्गामुळे समस्या वाढून माणूस तणावग्रस्त होत आहे. अनाठायी स्पर्धा, दुसऱ्यांच्याप्रती इर्षा, अनाठायी अहंकार आणि परस्परांविषयी विनाकारण शंका वाढीस लागणे याबाबी मानसिक तणावाला कारणीभूत ठरत आहे. त्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नाही. आपले विचार स्वच्छ आणि मन संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय अध्यात्म शैलीत परमात्मा चिंतन, मनाच्या स्थिरतेसाठी ध्यान करणे क्रमप्राप्त झाले आहे. डोके थंड ठेवणे, वाणीची मधुरता, परस्परांविषयी प्रेम भावना जोपासून विचाराने काम केले तर तणावमुक्ती साधता येईल. प्रवचन ऐकण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (प्रतिनिधी)विद्यार्थिनींचे संस्कृती नृत्यपाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवचक म्हणून माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या डॉ.प्रभाबहन मिश्रा, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, व्यापारी संघाचे नारायणदास भट्टड उपस्थित होते. डॉ.प्रभा मिश्रा यावेळी म्हणाल्या, आपण शरीरालाच सर्वस्व मानून बसलो. मी एक आत्मा आहे, हे विसरलो. आपण बाह्य प्रगती खूप केली. परंतु आंतरिक प्रगती थांबवली. त्यामुळेच आज सगळे जण ताण-तणावात जगत आहेत. आपल्यातील आक्रोश आध्यात्मिक विचार अवलंबूनच घालवता येतील. यावेळी स्थानिक विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर आकर्षक नृत्य सादर केले. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.