शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

By admin | Updated: February 28, 2017 01:27 IST

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे.

प्रभा मिश्रा : उमरखेड येथे ‘तणावमुक्ती व उपाय’ विषयावर अध्यात्मिक प्रवचन उमरखेड : जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे. हा तणाव दुसऱ्या कुणी निर्माण केला नसून चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले संकट होय. आपल्यातील वहम म्हणजे अनाठायी शंका आणि अहम म्हणजे अहंकार हेच प्रचंड मानसिक तणावाला कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रभाबहण मिश्रा (माऊंटअबू) यांनी केले. येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘तणावमुक्ती एवम् सफलता के पांच कदम’ या विषयावर त्यांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उमरखेड सेवा केंद्रातर्फे हे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिर होत आहे. पहिल्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुख्य प्रवचक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तणावग्रस्त अवस्थेतूनही विचाराने आणि धैर्याने मार्ग काढला पाहिजे. सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीसाठी अविचाराने अवलंबलेल्या मार्गामुळे समस्या वाढून माणूस तणावग्रस्त होत आहे. अनाठायी स्पर्धा, दुसऱ्यांच्याप्रती इर्षा, अनाठायी अहंकार आणि परस्परांविषयी विनाकारण शंका वाढीस लागणे याबाबी मानसिक तणावाला कारणीभूत ठरत आहे. त्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नाही. आपले विचार स्वच्छ आणि मन संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय अध्यात्म शैलीत परमात्मा चिंतन, मनाच्या स्थिरतेसाठी ध्यान करणे क्रमप्राप्त झाले आहे. डोके थंड ठेवणे, वाणीची मधुरता, परस्परांविषयी प्रेम भावना जोपासून विचाराने काम केले तर तणावमुक्ती साधता येईल. प्रवचन ऐकण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (प्रतिनिधी)विद्यार्थिनींचे संस्कृती नृत्यपाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवचक म्हणून माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या डॉ.प्रभाबहन मिश्रा, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, व्यापारी संघाचे नारायणदास भट्टड उपस्थित होते. डॉ.प्रभा मिश्रा यावेळी म्हणाल्या, आपण शरीरालाच सर्वस्व मानून बसलो. मी एक आत्मा आहे, हे विसरलो. आपण बाह्य प्रगती खूप केली. परंतु आंतरिक प्रगती थांबवली. त्यामुळेच आज सगळे जण ताण-तणावात जगत आहेत. आपल्यातील आक्रोश आध्यात्मिक विचार अवलंबूनच घालवता येतील. यावेळी स्थानिक विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर आकर्षक नृत्य सादर केले. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.