शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

By admin | Updated: February 28, 2017 01:27 IST

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे.

प्रभा मिश्रा : उमरखेड येथे ‘तणावमुक्ती व उपाय’ विषयावर अध्यात्मिक प्रवचन उमरखेड : जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे. हा तणाव दुसऱ्या कुणी निर्माण केला नसून चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले संकट होय. आपल्यातील वहम म्हणजे अनाठायी शंका आणि अहम म्हणजे अहंकार हेच प्रचंड मानसिक तणावाला कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रभाबहण मिश्रा (माऊंटअबू) यांनी केले. येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘तणावमुक्ती एवम् सफलता के पांच कदम’ या विषयावर त्यांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उमरखेड सेवा केंद्रातर्फे हे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिर होत आहे. पहिल्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुख्य प्रवचक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तणावग्रस्त अवस्थेतूनही विचाराने आणि धैर्याने मार्ग काढला पाहिजे. सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीसाठी अविचाराने अवलंबलेल्या मार्गामुळे समस्या वाढून माणूस तणावग्रस्त होत आहे. अनाठायी स्पर्धा, दुसऱ्यांच्याप्रती इर्षा, अनाठायी अहंकार आणि परस्परांविषयी विनाकारण शंका वाढीस लागणे याबाबी मानसिक तणावाला कारणीभूत ठरत आहे. त्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नाही. आपले विचार स्वच्छ आणि मन संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय अध्यात्म शैलीत परमात्मा चिंतन, मनाच्या स्थिरतेसाठी ध्यान करणे क्रमप्राप्त झाले आहे. डोके थंड ठेवणे, वाणीची मधुरता, परस्परांविषयी प्रेम भावना जोपासून विचाराने काम केले तर तणावमुक्ती साधता येईल. प्रवचन ऐकण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (प्रतिनिधी)विद्यार्थिनींचे संस्कृती नृत्यपाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवचक म्हणून माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या डॉ.प्रभाबहन मिश्रा, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, व्यापारी संघाचे नारायणदास भट्टड उपस्थित होते. डॉ.प्रभा मिश्रा यावेळी म्हणाल्या, आपण शरीरालाच सर्वस्व मानून बसलो. मी एक आत्मा आहे, हे विसरलो. आपण बाह्य प्रगती खूप केली. परंतु आंतरिक प्रगती थांबवली. त्यामुळेच आज सगळे जण ताण-तणावात जगत आहेत. आपल्यातील आक्रोश आध्यात्मिक विचार अवलंबूनच घालवता येतील. यावेळी स्थानिक विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर आकर्षक नृत्य सादर केले. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.