शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

उंट अळीचे आक्रमण सोयाबीनची चाळणी

By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST

यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाचा लहरीपणा कायम होता. पावसाने मध्यंतरी लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून कसेबसे सावरत

हिवरी : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाचा लहरीपणा कायम होता. पावसाने मध्यंतरी लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवण केली. पावसाळ््याच्या अखेरीस का होईना, परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतात पिके दिसायला लागली. आता मात्र सोयाबीन पिकांवर उंट अळीने अक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. हिवरी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनवर उंट अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव पाहता ८० टक्के सोयाबीन पिके धोक्यात आली आहे. खरीपाचा हंगाम सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला. सोयाबीनची पेरणी ९० टक्के शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात करावी लागली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पेरणीतील पिके समाधानकारक आहेत. परंतु तब्बल एक महिन्यानंतर दुबार व तिबार पेरणी झालेले सोयाबीन पीक सध्या फुलांच्या अवस्थेत आहे. या पिकांवर हिरवळ व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाने वेळीच नियंत्रण मिळविणे गरजे आहे. या रोगांच्या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यावर्षी जवळपास एक ते दीड महिने पावसाला उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीही उशिराच केली. पेरणीनंतर पावसाने पुन्हा दडी मारली, यामुळे तालुक्यातील पिके कोमेजू लागली होती. आता रिमझीम पावसाने सोयाबीनच्या पिकांवर बुरशीजन्य रोगांची वाढ होत आहे. या रोगांमुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे पिकांची वाढ ही खुंटली आहे. सोयाबीनला फुले कमी लागत आहेत. यामुळे उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोड अळीमुळे झाडाचे आयुष्य कमी होत आहे. यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने या परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करने गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाकडून परिसरातील कोणाच्याही सोयाबीन पिकांची पाहणी अद्याप झाली नाही. त्यामळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)