शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उंट अळीचे आक्रमण सोयाबीनची चाळणी

By admin | Updated: September 29, 2014 23:12 IST

यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाचा लहरीपणा कायम होता. पावसाने मध्यंतरी लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून कसेबसे सावरत

हिवरी : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापासून पावसाचा लहरीपणा कायम होता. पावसाने मध्यंतरी लांबलचक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले. त्यातून कसेबसे सावरत शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा लागवण केली. पावसाळ््याच्या अखेरीस का होईना, परंतु पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतात पिके दिसायला लागली. आता मात्र सोयाबीन पिकांवर उंट अळीने अक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकरी खचला आहे. हिवरी परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनवर उंट अळीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव पाहता ८० टक्के सोयाबीन पिके धोक्यात आली आहे. खरीपाचा हंगाम सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला. सोयाबीनची पेरणी ९० टक्के शेतकऱ्यांना दोन ते तीन टप्प्यात करावी लागली. यामध्ये पहिल्या टप्प्यातील पेरणीतील पिके समाधानकारक आहेत. परंतु तब्बल एक महिन्यानंतर दुबार व तिबार पेरणी झालेले सोयाबीन पीक सध्या फुलांच्या अवस्थेत आहे. या पिकांवर हिरवळ व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगाने वेळीच नियंत्रण मिळविणे गरजे आहे. या रोगांच्या किडींवर नियंत्रण मिळविण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. यावर्षी जवळपास एक ते दीड महिने पावसाला उशिरा सुरूवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीही उशिराच केली. पेरणीनंतर पावसाने पुन्हा दडी मारली, यामुळे तालुक्यातील पिके कोमेजू लागली होती. आता रिमझीम पावसाने सोयाबीनच्या पिकांवर बुरशीजन्य रोगांची वाढ होत आहे. या रोगांमुळे सोयाबीन पीक पिवळे पडत आहे. त्यामुळे पिकांची वाढ ही खुंटली आहे. सोयाबीनला फुले कमी लागत आहेत. यामुळे उत्पादनात मोठ्याप्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खोड अळीमुळे झाडाचे आयुष्य कमी होत आहे. यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाने या परिसरातील शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करने गरजेचे आहे. परंतु कृषी विभागाकडून परिसरातील कोणाच्याही सोयाबीन पिकांची पाहणी अद्याप झाली नाही. त्यामळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)