शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

सौरऊर्जा पंपाने शाश्वत सिंचनाचा प्रयोग

By admin | Updated: August 23, 2015 02:34 IST

राज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे.

शेतकऱ्यांचा हिस्सा पाच टक्के : पाच वर्षांपर्यंत होणार मोफत देखभाल आणि दुरुस्तीही सुरेंद्र राऊत  यवतमाळराज्य शासनाकडून प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा पंप शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ हजार ४२० सौरपंप वितरित केले जाणार आहे. सौरपंपामुळे शाश्वत सिंचनाचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. या पंपासाठी महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातून अर्ज वितरण करण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सौरपंप निवडण्यासाठी एसी आणि डीसी पंप, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. शासनस्तरावरून सौरपंप वितरणासाठी काही कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. या कंपनीकडूनच शेतकऱ्यांना सौरपंप देखभाल दुरुस्तीची सेवा मिळणार आहे. शासन सौरपंपाचा मोबदला हा दोन टप्प्यात देणार आहे. पहिल्या टप्प्यात पंपाच्या ६० टक्के रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित ४० टक्के रक्कम पाच वर्षात सुलभ हप्त्याने दिली जाणार आहे. देखभाल दुरूस्ती सेवा नियमित मिळावी यासाठी ही सोय शासनाने केली आहे. शेतकऱ्यांना या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परंपरागत विजेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सौरपंपामुळे भारनियमनाच्या कटकटीतून सुटका होणार आहे. शेतकऱ्यांना तीन, पाच आणि सात एचपीचा पंप केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरून मिळणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरत असलेल्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयातून अर्ज घेणे सुरू केले आहे. या अर्जावर सौरपंपाचे एसी आणि डीसी पंप असे दोन पर्याय ठेवले आहे. या दोन प्रकाराच्या पंपात मोठा फरक आहे. अश्वशक्तीसोबतच त्यातून दर तासाला होणार पाण्याचा विसर्ग यावरून या दोन पंपामध्ये फरक आहे. सूर्य प्रकाशापासून तयार झालेल्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करणाराच पंप योग्य ठरणार आहे. नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे शेतकऱ्यामध्येही कुतूहल आहे. कमी उन्हातही पंप चालला पाहिजे, योग्य दाबात पुरवठा कसा होईल, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्याचे निराकरण करण्यासाठी प्रिमीयर सोलार सिस्टीम हैदराबादचे अध्यक्ष सुरेंद्र पालसिंग सालुजा यांनी शंकाचे निरासन केले आहे. केंद्र सरकारच्या प्रयोग शाळेतून या सौरपंपाची तपासणी करून त्याला प्रमाणित केले असणे आवश्यक आहे. सध्या राजस्थानमध्ये ४०० डीसी पंप, ओरिसामध्ये ३०० आणि उत्तर प्रदेशात २००० हजार डीसी सौरपंप कार्यरत असल्याचे सालुजा यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी साधारणत: पाच एचपीचा सबमर्सीबल डीसी पंप वापरावा असेही त्यांनी सांगितले. या पंपाची किंमत जास्त असली तरी देखभाल दुरूस्ती खर्च कमी आहे. या तांत्रिक बाजू शेतकऱ्यांनी समजूनच पंपाची निवड करावी, असे सालुजा यांनी सांगितले. डीसी आणि एसी पंपात असा आहे फरकडीसी पंप म्हणजे, ज्यात सौर पॅनलवरून तयार झालेली ऊर्जा थेट पंपाला मिळते. याच ऊर्जेवर हा पंप काम करतो. सकाळी आठ नंतरच्या उन्हातही हा पंप सुरू होऊ शकतो. सायंकाळी उशिरापर्यंत हा पंप काम करू शकतो. एसी पंपामध्ये सौर पॅनलपासून आलेली ऊर्जा थेट पंपमध्ये जात नाही. मध्ये इनव्हर्टर बसविण्यात येतो. या इनव्हर्टरमध्ये पॅनलमधून आलेला डीसी प्रवाह हा एसीमध्ये रुपांतरीत केला जातो. त्यानंतर हा पंप सुरू होतो. सकाळच्या कोवळ््या उन्हात हा पंप सुरू होण्यासाठी वेळे घेतो. सायंकाळीसुध्दा लवकरच बंद होतो. दोन्ही पंपामधून एका तासाला सारखेच पाणी विसर्ग होते. डीसीपंप हा बोअरमध्येही काम करू शकतो.