शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

कॅरिबॅग टाळून कापडी पिशवीचा वापर करा

By admin | Updated: July 22, 2015 00:13 IST

कॅरीबॅग व प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. भविष्यात यामुळे अनेक वाईट प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे.

सचिंद्रप्रताप सिंह : प्लास्टिक निर्मूलनासाठी सामाजिक संस्थांची बैठक, पदाधिकाऱ्यांनी सुचविले उपाययवतमाळ : कॅरीबॅग व प्लास्टिक पिशवीच्या वापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. भविष्यात यामुळे अनेक वाईट प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हुन कॅरिबॅग तथा प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी, कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. जिल्ह्यातून कॅरिबॅग निर्मूलनासाठी सामाजिक संघटनांसोबत गार्डन हॉल येथे बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, एसटीचे विभाग नियंत्रक एस.एस. जगताप, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे, जिल्हा प्रशासन अधिकारी एस.एस. धुपे यांच्यासह सामाजिक संघटनांचे दत्ता कुलकर्णी, अजय मुंधडा, राजु पडगीलवार, अशोक ठाकरे, प्रशांत दर्यापूरकर, प्रशांत बनगिनवार, जीवन कडू, डॉ. आलोक गुप्ता, डॉ. चेतन दरणे, देवेंद्र गुप्ता, मंगेश खुने, स्वप्नील बोमेनवार, सुबोध काळपांडे, प्रकाश धुमाळ, प्रा. घनश्याम दरणे, संजय चाफले, अश्विन सव्वालाखे, निखिल परोपटे आदी उपस्थित होते. प्लास्टिक निर्मूलनसाठी विविध सामाजिक संघटनांच्या संकल्पना आणि त्यासाठी प्रशासनाची लागणारी मदत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनांची मते जाणून घेतली. काही संघटनांनी यासाठी निर्माण केलेल्या आराखड्यावर चर्चा केली. प्लास्टिक निर्मूललनासाठी कायद्याप्रमाणे कार्यवाही केली जात आहे. परंतु यासाठी जनजागृतीही फार महत्वाची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. प्लास्टिक निर्मूलनामुळे पर्यावरणाला हातभार लागण्यासोबतच प्रत्येकाने कापडी किंवा कागदी पिशवी वापरल्यास अशा पिशवी निमार्णातून अनेकांच्या हाताला रोजगार मिळणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले. प्रत्येकाने घरून निघताना पिशवी सोबत घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)