शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचे अध्यक्षपद नाकारले

By admin | Updated: August 20, 2014 23:46 IST

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

मुकेश इंगोले - दारव्हाकाँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शिफारसीवरून त्यांची नियुक्ती झाली. मात्र उशिरा नियुक्ती मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी पद नाकारले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.निराधारांना आधार देणाऱ्या निराधार योजनेचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे सदर पद इतके दिवस रिक्त होते. कुणाचीही नियुक्ती केली जात नव्हती. आता आघाडी सरकारचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगन पाटील कदम यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. परंतु त्यांनी थोड्या दिवसासाठी उपकार नको म्हणत पद नाकारल्याची माहिती आहे.निराधार योजनेचे यापूर्वी बबनराव ठाकरे अध्यक्ष होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे पद रिक्त होते. या पदावर नियुक्ती करण्याची मागणी जगन कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने ही नियुक्ती रखडली होती. आपल्याच तालुक्यातील पक्षांतर्गत वाद सोडविण्यात खुद्द प्रदेशाध्यक्षांना अपयश आल्याने महत्त्वाच्या समितीला तब्बल दीड ते दोन वर्ष अध्यक्षच मिळू शकला नाही.जगन कदम हे काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. या परिसरात त्यांची सज्जन राजकारणी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण हयात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणून घालविले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. त्यातूनच त्यांनी अध्यक्षपदाची मागणी केली. या पदाच्या माध्यमातून निराधारांचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा मानस होता. तालुक्यातील अनेक गरीब, वृद्ध, विधवा यांना कोणताही आधार नाही. या योजनेतून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कदम प्रयत्न करणार होते. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे पद रिक्त राहिले. वरिष्ठांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. शेवटी आघाडी सरकारचा कालावधी संतप आला असताना अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आले. परंतु जगन कदम यांनी सदर पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आता निवडणुकीच्या तोंडावर पद घेवून काम काय करू, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.आपल्या तालुक्यातील व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व त्याच पक्षाचे राज्यात सरकार आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसेल तर करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे.