शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

निराधार योजनेचे अध्यक्षपद नाकारले

By admin | Updated: August 20, 2014 23:46 IST

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

मुकेश इंगोले - दारव्हाकाँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शिफारसीवरून त्यांची नियुक्ती झाली. मात्र उशिरा नियुक्ती मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी पद नाकारले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.निराधारांना आधार देणाऱ्या निराधार योजनेचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे सदर पद इतके दिवस रिक्त होते. कुणाचीही नियुक्ती केली जात नव्हती. आता आघाडी सरकारचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगन पाटील कदम यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. परंतु त्यांनी थोड्या दिवसासाठी उपकार नको म्हणत पद नाकारल्याची माहिती आहे.निराधार योजनेचे यापूर्वी बबनराव ठाकरे अध्यक्ष होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे पद रिक्त होते. या पदावर नियुक्ती करण्याची मागणी जगन कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने ही नियुक्ती रखडली होती. आपल्याच तालुक्यातील पक्षांतर्गत वाद सोडविण्यात खुद्द प्रदेशाध्यक्षांना अपयश आल्याने महत्त्वाच्या समितीला तब्बल दीड ते दोन वर्ष अध्यक्षच मिळू शकला नाही.जगन कदम हे काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. या परिसरात त्यांची सज्जन राजकारणी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण हयात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणून घालविले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. त्यातूनच त्यांनी अध्यक्षपदाची मागणी केली. या पदाच्या माध्यमातून निराधारांचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा मानस होता. तालुक्यातील अनेक गरीब, वृद्ध, विधवा यांना कोणताही आधार नाही. या योजनेतून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कदम प्रयत्न करणार होते. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे पद रिक्त राहिले. वरिष्ठांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. शेवटी आघाडी सरकारचा कालावधी संतप आला असताना अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आले. परंतु जगन कदम यांनी सदर पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आता निवडणुकीच्या तोंडावर पद घेवून काम काय करू, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.आपल्या तालुक्यातील व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व त्याच पक्षाचे राज्यात सरकार आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसेल तर करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे.