शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पुसदमध्ये अवेळी पाणी

By admin | Updated: April 21, 2017 02:19 IST

असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या ुपुसदकरांना आता नळाच्या पाण्यासाठीही तासन्तास प्रतीक्षा करावी लागते.

नागरिक त्रस्त : पूस धरणात २६ टक्के साठा पुसद : असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या ुपुसदकरांना आता नळाच्या पाण्यासाठीही तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. गत दोन आठवड्यांपासून शहरात अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांची धांदल उडत आहे. तर वेळ चुकल्यास पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. पुसद शहराला पूस धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २० एप्रिल रोजी पूस धरणात २६ टक्के जलसाठा होता. सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून पाणी वितरण करण्यासंदर्भात गांभीर्याने प्रयत्न होत नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. पुसद शहरातील १५ प्रभागाला नगरपरिषद प्रशासन पाणीपुरवठा करते. सध्या दोन पाण्याच्या टाक्या असून तिसऱ्या टाकीचे काम पूर्णत्वावर आहे. पाणीपुरवठ्याबाबत नगरपरिषद प्रशासनाने वेळापत्रक जारी केले असले तरी गेल्या १५-२० दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. नळाला पाणी केव्हा येईल हे कुणीही सांगू शकत नाही. शंकरनगर, डुबेवार ले-आऊट, मोतीनगर या भागात रोज सकाळी ८.३० वाजता पाणीपुरवठा होत होता. आता कधी १० वाजता तर कधी ११ वाजता नळाला पाणी येते. अशीच अवस्था शहरातील इतरही भागात झाली आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यास उशीर होतो. अवेळी पाणीपुरवठा होत असल्याने महिलांना तासन्तास घरी बसावे लागते. नगरपरिषद विविध प्रभागात पाणी सोडताना त्यात दुजाभाव करीत असल्याचे चित्रही काही भागात दिसत आहे. शहरात काही ठिकाणी अर्धा-पाऊणतास तर काही ठिकाणी दोन-दोन तास पाणीपुरवठा केला जातो. कमी पाणी आलेल्या भागातील नागरिकांना पिण्याऐवढेही पाणी मिळत नाही. तर अधिक प्रमाणात पाणी सुटणाऱ्या भागातील पाणी रस्त्याने वाहून जाते. काही भागात रात्रीच्यावेळी पाणीपुरवठा होतो. त्यामुळे महिलांना रात्रभर जागावे लागते. एकीकडे पूस धरणात मुबलक पाणी असताना अवेळी पाण्याने त्रस्त करून सोडले आहे. (तालुका प्रतिनिधी)पाण्याचा अपव्यय टाळा-नगरपरिषदपुसद शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला नाही. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मागणी जास्त असल्याने पाण्याच्या टाकीतील पातळी पाहून शहराला पुरवठा करावा लागतो. २४ तास पाण्याच्या टाक्या भरल्या जातात. विशेष म्हणजे येत्या उन्हाळ्यात पुसदकरांना नियमित पाणीपुरवठा होणार असून सध्या तिसऱ्या टाकीचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. चार महिन्यात पुसद शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सभापती राजू दुधे यांनी केले आहे.