शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत

By admin | Updated: October 5, 2014 23:14 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे.

महागाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाने या प्रकरणी कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली. मात्र त्यांनी केराची टोपली दाखविली. तसेच कृषी विभागाच्यावतीने आयोजित ग्रामसभा, मेळावेही कागदोपत्रीच दिसत आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. पावसाच्या प्रतीक्षेत बी-बियाण्यांची खरेदी लांबली. पाऊस आला तेव्हा बियाण्यांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. यात महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याचे पुढे येत आहे. अनेकांनी पेरलेले सोयाबीन उगविलेच नाही. तर काही ठिकाणी शेंगाच लागल्या नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. परंतु त्यांनीही केवळ बोळवणच केली आहे. कृषी केंद्रांवर पंचायत समितीचा कृषी विभाग मेहरनजर असल्याचे दिसत आहे. अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असताना कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी केंद्राच्या तपासण्याच होत नसल्याने अप्रमाणित बियाणे विक्रीला उधाण आले होते. कृषी केंद्र संचालकांनी सारे नियम पायदळी तुडविले. कृषी केंद्रात दर्शनी भागावर भाव फलक, उपलब्ध खत, औषधी साठा, मुदत संपलेली औषधी, बियाणे प्रमाणित असल्याबाबत पुरावे आदी अपवादानेच पहायला मिळतात. पाच कृषी केंद्रातून विकलेले बियाणे अप्रमाणित निघाले. या पाचही कृषी केंद्र संचालकांना कृषी विभागाने १७ सप्टेंबर रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली. परंतु पंधरवाडा उलटला तरी या नोटीसला उत्तर दिले नाही. महागाव तालुक्यात सातत्याने बनावट बियाणे विकले जात असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तालुक्यात ७२ कृषी केंद्र कार्यरत असून महागाव आणि मुडाणा येथील घाऊक दुकानातून तालुक्यातील इतर कृषी केंद्रांना मालाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांची फसवणूक होऊनही कृषी केंद्रांवर ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील सोयाबीन विविध रोगाला बळी पडले आहे. काही ठिकाणी बनावट बियाणे निघाले आहे. मात्र कृषी अधिकारी कार्यालय आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नाही. कृषी विभागाने शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेतल्याचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात सरपंचानाही या मेळाव्याची माहिती दिसत नाही. एकंदरित कृषी विभागाच्या या धोरणाचे शेतकरी मात्र बळी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)