शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत

By admin | Updated: October 5, 2014 23:14 IST

खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे.

महागाव : खरीप हंगामाच्या सुरुवातीला मोठ्या विश्वासाने खरेदी केलेल्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे आता उघडकीस येत आहे. अनेक कृषी केंद्रातून अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचे पुढे आले आहे. कृषी विभागाने या प्रकरणी कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली. मात्र त्यांनी केराची टोपली दाखविली. तसेच कृषी विभागाच्यावतीने आयोजित ग्रामसभा, मेळावेही कागदोपत्रीच दिसत आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. पावसाच्या प्रतीक्षेत बी-बियाण्यांची खरेदी लांबली. पाऊस आला तेव्हा बियाण्यांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. यात महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसगत झाल्याचे पुढे येत आहे. अनेकांनी पेरलेले सोयाबीन उगविलेच नाही. तर काही ठिकाणी शेंगाच लागल्या नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेतली. परंतु त्यांनीही केवळ बोळवणच केली आहे. कृषी केंद्रांवर पंचायत समितीचा कृषी विभाग मेहरनजर असल्याचे दिसत आहे. अप्रमाणित बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असताना कृषी केंद्र चालकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. कृषी केंद्राच्या तपासण्याच होत नसल्याने अप्रमाणित बियाणे विक्रीला उधाण आले होते. कृषी केंद्र संचालकांनी सारे नियम पायदळी तुडविले. कृषी केंद्रात दर्शनी भागावर भाव फलक, उपलब्ध खत, औषधी साठा, मुदत संपलेली औषधी, बियाणे प्रमाणित असल्याबाबत पुरावे आदी अपवादानेच पहायला मिळतात. पाच कृषी केंद्रातून विकलेले बियाणे अप्रमाणित निघाले. या पाचही कृषी केंद्र संचालकांना कृषी विभागाने १७ सप्टेंबर रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली. परंतु पंधरवाडा उलटला तरी या नोटीसला उत्तर दिले नाही. महागाव तालुक्यात सातत्याने बनावट बियाणे विकले जात असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तालुक्यात ७२ कृषी केंद्र कार्यरत असून महागाव आणि मुडाणा येथील घाऊक दुकानातून तालुक्यातील इतर कृषी केंद्रांना मालाचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांची फसवणूक होऊनही कृषी केंद्रांवर ठोस कारवाई केली जात नाही. तालुक्यातील २० हजार हेक्टरवरील सोयाबीन विविध रोगाला बळी पडले आहे. काही ठिकाणी बनावट बियाणे निघाले आहे. मात्र कृषी अधिकारी कार्यालय आणि शेतकरी यांच्यात समन्वय दिसत नाही. कृषी विभागाने शेतकरी मार्गदर्शन मेळावे घेतल्याचा गाजावाजा केला. परंतु प्रत्यक्षात सरपंचानाही या मेळाव्याची माहिती दिसत नाही. एकंदरित कृषी विभागाच्या या धोरणाचे शेतकरी मात्र बळी ठरत आहे. (शहर प्रतिनिधी)