शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीसाठी आशांचे ‘बेमुदत कामबंद’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद ...

ठळक मुद्देतिरंगा चौकात धरणे : आश्वासनावरच बोळवण करणाऱ्या शासनाचा निषेध, इतर राज्यात भरघोस मानधन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाने वारंवार आश्वासन देऊनही मानधनवाढ न मिळाल्याने जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.ग्रामीण भागात राबणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात यावे, तसेच मानधनवाढ लागू करण्यात यावी, या मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात मंगळवारपासून राज्यभरातच आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील आशा सेविकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आशा सेविका आणि गटप्रवर्तकांना वेठबिगारासारखे राबवून घेतले जात आहे. काही राज्यांमध्ये दहा हजार रुपये मानधन असताना महाराष्ट्रात केवळ २५०० रुपये दिले जात आहे. मंत्र्यांनी बैठका घेतल्यानंतरही मानधनवाढीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आशासेविका संतप्त झाल्या आहेत. केवळ आश्वासनावर बोळवण करणाºया शासनाचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने मानधनवाढीचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष दिवाकर नागपुरे यांनी दिली.मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. मात्र कोणताही तोडगा न निघाल्याने शंभरावर आशासेविका मंगळवारी रात्रीही आंदोलनस्थळीतच होत्या.

टॅग्स :Strikeसंप