जोडमोहा व कोळंबी केंद्र : वादळाचा तडाखा, कृषिपंपांचा वीजपुरवठा अद्यापही खंडितचयवतमाळ : वादळी पावसामुळे जोडमोहा व कोळंबी केंद्रातील तब्बल ६३ गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पाच दिवसानंतर हा वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले आहे. यामुळे प्रामुख्याने गावातील वीज व पाणीपुरवठ्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अद्याप कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत झाला नसून ते काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवार, ५ मे रोजी जोडमोहा व कोळंबी परिसरात वादळी पाऊस झाला. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेच्या खांबांची पडझड झाली. अनेक ठिकाणी वीज तारांवर झाडे कोसळल्याने शेकडो गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याचा फटका कृषिपंप आणि पाणीपुरवठ्यालाही बसला. त्यानंतर वीज कंपनीने तातडीने या सर्व गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये प्रामुख्याने गावातील वीज आणि पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. यवतमाळ ग्रामीण उपविभागामधील जोडमोहा व कोळंबी केंद्राला याचा फटका बसला होता. यामध्ये जोडमोहा केंद्रातील जोडमोहासह सोनखास, देवनाळा, मंजरा, नांझा, चिचघाट, मेटीखेडा, गांधीनगर, खटेश्वर, शिवणी, रुंझा, पालोती, अंतरगाव, पोफळणी, धरमगाव, वडनेर, खानगाव, पार्डी नकटी, डोंगरखर्डा, पिलखाना, तळेगाव, येरद, श्रद, मोहदरी, माजरा आणि कोळंबी केंद्रांतर्गत धानोरा, गणेशपूर, कोळंबी, पिंपरी, मांजर्डा, अकोलाबाजार, भांबोरा, सालोड, डांगरगाव, अंजी नाईक, अंजी कारेगाव, कामठवाडा, बोरगाव पुंजी, कुऱ्हा, कुऱ्हाड, कोळी, लिंगी, कारेगाव, येवती, जवळा, वरझडी, तळणी, बोरीसिंह, झुली, चौकी, वरूड, नामापूर तांडा, नस्करी पार्डी, खैरगाव, घाटाना, हादगाव, बारडगाव, वडगाव, चिंचोली, कोळी बु., बारड तांडा आदी गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा पुरवठा पूर्ववत करण्यात आला असला तरी अद्याप कृषिपपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)सर्वप्रथम आम्ही गावठाण आणि पाणीपुरवठ्याच्या विजेवर लक्ष देवून ती सुरळीत केली. जोडमोहा व कोळंबी केंद्रातील जवळपास सर्व गावातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. येत्या चार-पाच दिवसात कृषिपंपांचाही वीजपुरवठा सुरळीत होईल.- विवेक राऊत, उपकार्यकारी अभियंता, यवतमाळ ग्रामीण
६३ गावातील खंडित वीजपुरवठा पूर्ववत
By admin | Updated: May 13, 2016 02:37 IST