शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

उपविभागात अनधिकृत खाणावळींना उधाण

By admin | Updated: June 6, 2014 00:14 IST

वणी, मारेगाव झरजामणी तालुक्यात सध्या अनधिकृत खाणावळींना उधाण आले आहे. शासनाची परवानगी नसताना खाणावळी, हॉटेल मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.

वणी : वणी, मारेगाव झरजामणी तालुक्यात सध्या अनधिकृत खाणावळींना उधाण आले आहे. शासनाची परवानगी नसताना खाणावळी, हॉटेल मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. वणी, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात परवाना प्राप्त मोजक्याच खाणावळी, रेस्टॉरंट व लॉजींग-बोर्डींंंग अस्तित्वात आहेत. त्यात वणी तालुक्य़ात सर्वाधिक खाणवळी आहेत. त्या खालोखाल मारेगाव व झरी तालुक्यात खाणावळी आणि रेस्टॉरंट आहेत. वणी तालुक्यात १0, तर मारेगाव व झरीजामणी तालुक्यात प्रत्येकी एक लॉजिंग व बोर्डींंग आहे. मात्र प्रत्यक्षात या तिनही तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत खाणावळी, हॉटेल, नाश्ता, चहाची  दुकाने अस्तित्वात आहे. खाणावळ, चहा, नाश्ता आदी खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी पाण्यासाठी मातीचे माठ, सिमेंटचे टाके, प्लॉस्टिकच्या डब्यांचा वापर केला जात आहे. त्यात पाणी साठवून तेच ग्राहकांना दिले जाते. यातील कित्येक व्यावसायीक पाणी साठवून ठेवण्याचे साहित्य हे भांडी धुण्याच्या ठिकाणी ठेवतात. तेथे अत्यंत गलीच्छ वातावरण असते. हे ठिकाण घाणीच्या विळख्यात असते. तेथेच पिण्याचे पाणी ठेवून ते ग्राहकांना दिले जाते. या अशुध्द पाण्यामुळे ग्राहकांचे आरोग्यच आता धोक्यात सापडले आहे.हा सर्व प्रकार संबंधित प्रशासन उघड्या डोळ्य़ांनी पाहात आहे. मात्र एकाही अनधिकृत खाणावळ व्यावसायीकाविरुद्ध कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. कुठेही आणि कोणतीही खाणावळ सुरू करण्यापूर्वी खाणावळ चालकास अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून वणी, मारेगाव व झरी तालुक्यात अनेक अनधिकृत खाणावळींचे पेव फुटले आहे.या अनधिकृत खाणावळींमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. तेथील शिळे व उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते. परिणामी परिसरात दुर्गंंंधी पसरते. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. त्यांचे आरोग्यही धोक्यात सापडते. बहुतांश अनधिकृत खाणावळींमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळतो. जेथे खाणावळींचाच परवाना सतोत, तेथे दारू पिण्याचा परवाना त्यांना कुणी दिला, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. हा सर्व प्रकार संबंधित प्रशासनाच्या मूक संमतीनेच सुरू आहे. या अनधिकृत व नियमबाह्य खाणावळींचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतो. बहुतांश हॉटेल, खाद्य पदार्थांंंच्या दुकानांमध्येही अशुध्द पाण्याचा वापर होतो. हे सर्व चित्र उघड्या डोळ्यांनी बघूनसुध्दा प्रशासन अद्याप सुस्तच का आहे, हे एक कोडेच आहे. त्यामुळे जनतेत उलटसुलट चर्चा होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)